शहरं
Join us  
Trending Stories
1
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
2
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
3
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
4
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
5
"तमीज से खेलने के चक्कर में..." कडक खेळी शिवाय पंतची 'मन की बात' चर्चेत (VIDEO)
6
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
7
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
8
इराणने अशी कोणती मिसाईल डागली? इस्रायलमध्ये ना अलर्ट आला ना सायरन वाजला; हायफावर कोसळली...
9
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
10
"वाटलं भारताने अण्वस्त्र हल्लाच केला, पाकिस्तानकडे फक्त...', नेमकं काय म्हणाले बिलावल भुट्टो
11
KL राहुलनं शतकी खेळीसह साधला विक्रमी डाव! लिटल मास्टर गावसकरांसह द्रविडलाही टाकले मागे
12
'मी राज्यसभेवर जाणार नाही...', स्वतः अरविंद केजरीवालांनी लावला चर्चांना पूर्णविराम
13
इराण-इस्त्रायल युद्ध पेटले! ४० मिनिटे इस्रायलवर क्षेपणास्त्रांचा मारा, थरकाप उडवणारे व्हिडिओ व्हायरल!
14
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
15
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार
16
“विकासासाठीचा प्रत्येक रुपया सर्वसामान्यांपर्यंत पोहोचला पाहिजे”: DCM एकनाथ शिंदे
17
तिसऱ्या महायुद्धाला तोंड फुटण्याची भीती...! इराण इस्रायल युद्धात आणखी एका देशाची उडी; कुणाला देणार साथ?
18
“भास्कर जाधव नौटंकी, जनताच संन्यास देणार, तो काही एवढा मोठा माणूस नाही”; कुणी केली टीका?
19
गोव्याला जायचा प्लान करताय? ‘मुंबई-गोवा वंदे भारत’ट्रेनच्या शेकडो फेऱ्या रद्द; कारण आले समोर
20
क्रूरतेच कळस! हुंड्यात कार न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीला मारलं, मणक्याचं हाड तोडलं अन्... 

भारत-चीन युद्धाची खोटी बातमी प्रसारित करतंय पाकिस्तानी चॅनेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2017 09:59 IST

पाकिस्तानी टीव्ही चॅनेल दुनया न्यूजनं असा दावा केला आहे की, चिनी सैनिकांकडून करण्यात आलेल्या रॉकेट हल्ल्यात भारतीय लष्कराचे 158 सैनिक शहीद झाले आहेत.

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 18 - भारत व चीनमध्ये सीमावाद व डोकलाम विवादावर तणावाची परिस्थिती सुरू आहे. भारत व चीन दोन्ही देश आपल्या दृष्टीकोनामध्ये बदल करण्यास तयार नाहीत. यादरम्यान पाकिस्तान उद्दामपणा केला आहे. पाकिस्तानातील एका टीव्ही चॅनेल भारताविरोधात चुकीची माहिती पसरवत आहे.
 
पाकिस्तानी टीव्ही चॅनेल दुनया न्यूजनं असा दावा केला आहे की, चिनी सैनिकांकडून करण्यात आलेल्या रॉकेट हल्ल्यात भारतीय लष्कराचे 158 सैनिक शहीद झाले आहेत. याशिवाय सोमवारी झालेल्या हल्ल्यात अन्य सैनिक जखमी झाल्याचीही खोटी बातमी या पाकिस्तानी चॅनेलनं प्रसारित केली. इतकंच नाही तर या पाकिस्तानी टीव्ही चॅनेलनं आपल्या वेबसाइटवर हल्ल्यासंदर्भातील फोटो पोस्ट करुन हद्दच पार केली. मात्र भारतीय लष्करानं फोटो बनावट असल्याचे सांगत वृत्त फेटाळून लावले आहे.
 
पाकिस्तानी टीव्ही चॅनेलनं दावा केला आहे की, सिक्कीम मुद्यावरुन भारत व चीनमध्ये चकमक सुरू झाली आहे. ज्यानंतर चीननं भारतीय सैनिकांवर रॉकेट हल्ला केला. ज्यात भारतीय लष्करातील 150 जवान शहीद झाले असून अन्य जवान जखमी झाले आहेत.  या टीव्ही चॅनेलनं असाही कांगावा केला आहे की, विवादाची सुरुवात भारताकडून करण्यात आली होती. याला प्रत्युत्तर देताना चीननं भारतीय सैनिकांवर रॉकेट हल्ला केला. 
 
 
चिनी न्यूज चॅनेलचा हवाला
दुनया न्यूजनं दावा केला आहे की, या हल्ल्याचं दोन मिनिटांचं फुटेज चाइन सेंट्रल टेलिव्हिजनवर प्रसारित करण्यात आलं होतं. चिनी सैनिकांनी रॉकेट लॉन्चर, मशिनगन व अन्य शस्त्रांचा वापर करुन भारतीय सैनिकांवर हल्ला केल्याचं या व्हिडीओमध्ये दाखवण्यात आले आहे. भारत व चीननं दोन मोठ्या व काही छोट्या भागांवर वर्चस्व असल्याचा आपआपला दावा करत आहेत,ज्यामुळे ही बाब गेल्या दशकांपासून दोघांमध्ये विवादाचा मुद्दा बनला आहे. 
 
दरम्यान, डोकलाममध्ये चीन सेन्यांकडून रस्ता बांधण्याचा प्रयत्न करण्यात आला होता,  ज्याला भारतानं विरोध करत रस्ता बांधण्यापासून चीनला रोखले होते.  या क्षेत्रावर चीन स्वतःचा दावा करत आला आहे.  तर दुसरीकडे भारत या क्षेत्राला भुतानचा भाग मानून भुतानच्या दाव्याचं समर्थन करत आला आहे.  भारतानं डोकलाम क्षेत्रातून मागे हटावं, अशी चीनचं म्हणणं आहे. मात्र अशा परिस्थितीत मागे हटण्यास भारत तयार नाही. या उलट भारतीय सैनिकांनी अधिक सैन्य तेथे तैनात केले आहे. 
 
फोटो आहेत बनावट - भारतीय लष्कर 
भारतीय लष्करानं हे फोटो बनावट असल्याचे सांगत म्हटले आहे की, हे फोटो अपघाताचे आहेत. हा अपघात अरुणाचल प्रदेशात सेनेच्या एका ट्रेनिंगदरम्यान झाला होता. या घटनेचे फोटो कित्येक महिन्यापूर्वींचे आहेत.