शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला दिला स्पष्ट संदेश
2
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
3
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
4
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
5
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
6
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
7
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
8
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
9
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
10
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
11
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
12
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
13
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
14
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
15
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
16
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
17
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
18
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
19
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
20
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका

पाकच्या उलट्या बोंबा!

By admin | Updated: April 12, 2017 00:44 IST

कोणताही पुरवा नसताना भारतीय नागरिक कुलभूषण जाधव यांना फाशीची शिक्षा सुनावणाऱ्या पाकिस्तानने आता उलट्या बोंबा मारणे सुरू केले आहे. सगळ््या शेजारी

इस्लामाबाद : कोणताही पुरवा नसताना भारतीय नागरिक कुलभूषण जाधव यांना फाशीची शिक्षा सुनावणाऱ्या पाकिस्तानने आता उलट्या बोंबा मारणे सुरू केले आहे. सगळ््या शेजारी देशांशी विशेषत: शेजाऱ्यांशी चांगले संबंध असावे, असे वाटत असल्याचे पवित्रा पंतप्रधान नवाज शरीफ यांनी म्हटले आहे.रेडिओ पाकिस्तानने दिलेल्या वृत्तानुसार पाकिस्तानच्या लष्करी न्यायालयाने भारतीय नागरिक कुलभूषण जाधव यांना हेरगिरी केल्याच्या आरोपावरून फाशीची शिक्षा सुनावल्यानंतर उभय देशांतील संबधांत तणाव निर्माण झाल्यानंतर शरीफ यांनी वरील मत व्यक्त केले. खैबर पख्तुनख्वॉमधील असघर खान येथे पाकिस्तान हवाई दल संस्थेतील पदवीधरांना ते मार्गदर्शन करीत होते.पाकिस्तानचे लष्कर कोणत्याही धोक्याला तोंड द्यायला पूर्णपणे सज्ज व सक्षम असल्याचे शरीफ म्हणाले. सशस्त्र दलांवर देशाचा पूर्ण विश्वास असून आधुनिक काळातील आव्हानांना तोंड देण्यासाठी सरकार या दलांना साहित्य व उपकरणांचा पूर्ण पाठिंबा देईल, असे आश्वासनही त्यांनी दिले. देशाच्या सुरक्षिततेची संकल्पना आता खूप बदलली असून तो केवळ लष्करी दलांचा विषय राहिलेला नाही, असे ते म्हणाले. जाधव यांना फाशी दिली गेल्यास ती ठरवून केलेली हत्या समजली जाईल, असा इशारा भारताने पाकिस्तानचे उच्चायुक्त अब्दुल बासित यांना बोलावून दिल्याबद्दल शरीफ यांनी तीव्र आक्षेप घेतला. पाकिस्तान हा शांततेवर प्रेम करणारा देश असून त्याने नेहमीच सगळ््या देशांशी विशेषत: शेजाऱ्यांशी मित्रत्वाचे संबंध राखणारे धोरण अवलंबले आहे, असेही शरीफ म्हणाले. शिक्षेचे राजनैतिक दुष्परिणाम- हेरगिरी केल्याच्या आरोपावरूनभारतीय नागरिक कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानच्या लष्करी न्यायालयाने सुनावलेल्या देहदंडाच्या शिक्षाचे पाकिस्तानी प्रसारमाध्यमांनी मंगळवारी ‘अभूतपूर्व’ अशा शब्दांत वर्णन केले. या शिक्षेचे राजनैतिक दुष्परिणाम असतील, असे भाकीतही त्यांनी केले. - उजव्या विचारसरणीच्या ‘द नेशन’या इंग्रजी दैनिकाने पहिल्या पानावर ‘हेराला देहदंडाच्या शिक्षेमुळे तणाव टोकदार होणार’ असे म्हटले. राजकीय व संरक्षण विश्लेषक डॉ. हास्सन अस्कारी यांनी जाधव यांना फाशी दिली गेल्यास उभय देशांतील तणाव आणखी वाढणार असल्याचे म्हटल्याचे वृत्तात म्हटले आहे. - ‘एक्स्प्रेस ट्रिब्युन’नेही पहिल्या पानावर दिलेल्या मोठ्या बातमीत देहदंडाच्या शिक्षेचे अभूतपूर्व असेच वर्णन केले. ‘डॉन’ दैनिकाने शिक्षा ही ‘दुर्मिळ पाऊल’ असल्याचे म्हटले. उभय देशांतील तणाव आधीच शिगेला गेलेले असताना ही शिक्षा दिली गेल्याचे डॉनने म्हटले. भारताकडून कडक प्रतिक्रिया व्यक्त होईल, असे काहींना वाटते तर इतरांना संबंधांत काहीही नाट्यमय बदल होणार नसल्याचे वाटते.