शहरं
Join us  
Trending Stories
1
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
2
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
3
IND vs ENG :मियाँ मॅजिक! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये विकट; KL राहुलनं एक कॅच सोडला
4
१७,००० कोटींचा घोटाळा! अनिल अंबानींच्या डोकेदुखीत वाढ, ED आता 'या' लोकांची चौकशी करणार
5
Post Office ची ५० वर्ष जुनी सेवा होणार बंद, तुमच्यावर काय परिणाम होणार?
6
नव्या प्रभाग रचनेला आव्हान देणाऱ्या याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या; स्थानिक निवडणुकांना हिरवा कंदील
7
६ ऑगस्टला बच्चू कडू राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता; शेतकरी आंदोलनाला मनसेचं पाठबळ मिळणार?
8
लॉटरी लागली! टाटांच्या 'या' शेअरचे होणार १० तुकडे, १०० शेअर्सचे थेट १००० होणार, रेकॉर्ड डेट कधी?
9
मैत्रिणीचा संसार मोडला, नंतर तिच्याच नवऱ्याशी केलं लग्न; आता ३ वर्षांतच अभिनेत्रीवर घटस्फोट घेण्याची वेळ
10
Nagpur: नागपुरात मद्यधुंद अवस्थेत कार चालवणाऱ्या जवानानं ३० जणांना उडवलं, व्हिडीओ व्हायरल!
11
बदल्याची आग! आईने वडिलांना फसवून दुसरं लग्न केलं, संतापलेल्या मुलाने तिला कारने चिरडलं
12
"मराठीच्या आधी हिंदी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळाला, तेव्हा महाराष्ट्रही अस्तित्वात नव्हता"
13
कैदी नंबर १५,५२८, प्रज्वल रेवण्णाचा तुरुंगातील दिनक्रम आला समोर, दररोज करावं लागेल एवढं काम   
14
Putrada Ekadashi 2025: पुत्रदा एकादशीला 'हे' नियम पाळले तरच होतो संतानसुखाचा लाभ!
15
एकनाथ शिंदेंनी केला करेक्ट कार्यक्रम, बेळगावात पक्ष बळकट होणार; अनेक मठाधिपती शिवसेनेत
16
४० व्या वर्षीही करू शकता गुंतवणुकीचा श्रीगणेशा; रिटायरमेंटच्या वेळी होऊ शकता कोट्यधीश, महिन्याला किती कराल गुंतवणूक
17
'किमान माणसासारखी तरी वागणूक...' IT अभियंता तरुणीची पोस्ट व्हायरल, म्हणाले मॅनेजरसमोरच मी...
18
Mumbai: बलात्कारानंतर गर्भवती राहिलेल्या अल्पवयीन मेहुणीची घरीच प्रसूती; भाऊजींसह बहिणीलाही अटक
19
“हिंदूंना बदनाम करण्याच्या आव्हाडांच्या आरोपांशी उद्धव ठाकरे सहमत आहेत का?”; भाजपाचा सवाल

काश्मिरात हिंसेला पाकच जबाबदार!

By admin | Updated: July 19, 2016 04:53 IST

काश्मीरमधील हिंसाचाराला पाकिस्तानच पूर्णपणे कारणीभूत असून, पाकच्या या नापाक कारवाया मोडून काढल्या जातील,

नवी दिल्ली : काश्मीरमधील हिंसाचाराला पाकिस्तानच पूर्णपणे कारणीभूत असून, पाकच्या या नापाक कारवाया मोडून काढल्या जातील, अशी ग्वाही देतानाच, केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी सोमवारी राज्यसभेत काश्मिरातील संतप्त जमावांना पांगवण्यासाठी शस्त्रांचा वापर करताना अधिकाधिक संयम बाळगण्याच्या आणि मनुष्यहानी टाळण्याच्या सूचना सुरक्षा दलाला देण्यात आल्या आहेत. मात्र काश्मीर प्रश्नाचे कोणीही राजकारण करू नये, या प्रश्नाबाबत सर्व राजकीय पक्षांशी केंद्र सरकार तयार आहे, असे स्पष्ट केले.काश्मिरातील स्थिती दिवसेंदिवस अधिकाधिक बिघडत असल्याबद्दल झालेल्या चर्चेमध्ये सर्वच पक्षांच्या सदस्यांनी चिंता व्यक्त करताना पाकिस्तानच्या कारवाया हाणून पाडल्या पाहिजेत, असे मत व्यक्त केले. मात्र तेथील स्थिती हाताळण्यात केंद्र सरकारला पूर्णपणे अपयश आल्याची टीका सर्वच विरोधी सदस्यांनी केली. काश्मीर प्रश्न गोळीबाराने आणि सशस्त्र सैनिकांच्या मदतीने सुटणार नाही. त्यासाठी देशातील आणि काश्मीरमधील सर्व पक्ष आणि गट यांच्याशी केंद्राने चर्चा सुरू करावी. चर्चेतूनच हा प्रश्न सुटू शकेल, असेही प्रतिपादन अनेक सदस्यांनी केले. सरकारने काश्मिरी जनतेला अतिरेकी वा दहशतवादी समजू नये आणि जनतेला तसे वागवू नये, असे मत अनेक सदस्यानी व्यक्त केले. राष्ट्रवादीचे प्रफुल फटेल म्हणाले की, काश्मीरमध्ये सध्या जे सुरू आहे, ते अतिशय भयावह आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)>‘चाय पे चर्चा’त मतलब नाहीकाश्मीर जळत असताना आपण पाकिस्तानशी चाय पे चर्चा करण्यात मतलब नाही. काश्मीरचा प्रश्न हा एका राज्याचा प्रश्न नाही. तो भारताच्या सुरक्षेचा प्रश्न आहे, हे समजून सरकारने वागणे गरजेचे आहे.- संजय राऊत, शिवसेना