शहरं
Join us  
Trending Stories
1
क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंविरोधात अटक वॉरंट, कोणत्याही क्षणी अटक होणार, आमदारकीही जाणार?
2
राजकीय सूडबुद्धीतून रचलेले प्रकरण, ईडी-सीबीआयचा गैरवापर; 'नॅशनल हेराल्ड'वरुन खरगेंची मोदी-शाहांवर टीका
3
...अन् त्यावेळी राष्ट्रपती बनण्याचा प्रस्ताव वाजपेयींनी नाकारला; 'अटल संस्मरण' पुस्तकात दावा
4
“मातोश्रीबाबत मनात आदर कायम, पण...”; शिंदे गटात प्रवेश करताच बड्या नेत्याने सगळेच सांगितले
5
Video - हार्ट अटॅकमुळे वेदनेने तडफडत होता पती; पत्नीने जोडले हात, पण कोणीच केली नाही मदत
6
शेतकऱ्यांसाठी मोठा अलर्ट! फार्मर आयडीशिवाय पीएम किसानचे पैसे येणार नाहीत; अशी तयार करा ID
7
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दागिने घेताना १०० वेळा विचार करावा लागणार; चांदी २ लाखांच्या पार, सोन्याच्या दरातही मोठी तेजी
8
‘मी काही चुकीचं बोललो नाही, माफी मागण्याचा प्रश्नच नाही..’, पृथ्वीराज चव्हाण ऑपरेशन सिंदूरबाबतच्या वक्तव्यावर ठाम  
9
BMC ELections: मुंबईत अजित पवार पडले एकटे, राष्ट्रवादीची किती जागांवर लढण्याची तयारी, बैठकीत काय झाला निर्णय? 
10
‘ते’ विधान भोवणार, संजय राऊत अडचणीत येणार?; गृहराज्यमंत्री म्हणाले, “…तर गुन्हा दाखल करू”
11
Video - लग्नात राडा! नवरदेवाच्या मित्रांनी नवरीला घातली 'स्नो स्प्रे'ने आंघोळ, मेकअपच गेला वाया
12
क्रेडिट कार्ड वापरताय? मग 'या' ७ चुका टाळा, अन्यथा बसेल आर्थिक फटका!
13
IPL मधील ऑक्शनची संपूर्ण रक्कम घरी नेतात का खेळाडू? पाहा टॅक्स, सॅलरी आणि इनहँड रकमेचा कसा असतो हिशोब
14
‘टायगर स्टेट’समोर गंभीर आव्हान! एका आठवड्यात 6 तर, वर्षभरात 54 वाघांचा मृत्यू; शिकारीचा संशय
15
शाल, गळ्यात रुद्राक्षांची माळ आणि डोक्यावर टिळा, अनंत अंबानींसोबत वनतारामध्ये दिसलं मेसीचं भारतीय रूप
16
कर्माची फळं इथेच भोगली! 'धुरंधर'मधील खनानी होता सगळ्यात खुंखार; भारतात पाठवायचा खोट्या नोटा, मिळाला खतरनाक मृत्यू
17
किडन्या फेल, डायलिसिससाठी पैसेच नाहीत; ७० दिवस 'डिजिटल अरेस्ट' करुन ५३ लाखांचा गंडा
18
Saif Ali Khan : "पॅरेलाइज होऊ शकलो असतो..."; सैफ अली खानने सांगितला हल्ल्याचा थरार, आजही वाटतेय भीती
19
"कायदा यांच्या कोठीवर नाचतोय, जोवर दिल्लीत आणि निवडणूक आयोगात हरामखोरांचं राज्य, तोवर...;" संजय राऊतांची जीभ घसरली!
Daily Top 2Weekly Top 5

काश्मिरात हिंसेला पाकच जबाबदार!

By admin | Updated: July 19, 2016 04:53 IST

काश्मीरमधील हिंसाचाराला पाकिस्तानच पूर्णपणे कारणीभूत असून, पाकच्या या नापाक कारवाया मोडून काढल्या जातील,

नवी दिल्ली : काश्मीरमधील हिंसाचाराला पाकिस्तानच पूर्णपणे कारणीभूत असून, पाकच्या या नापाक कारवाया मोडून काढल्या जातील, अशी ग्वाही देतानाच, केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी सोमवारी राज्यसभेत काश्मिरातील संतप्त जमावांना पांगवण्यासाठी शस्त्रांचा वापर करताना अधिकाधिक संयम बाळगण्याच्या आणि मनुष्यहानी टाळण्याच्या सूचना सुरक्षा दलाला देण्यात आल्या आहेत. मात्र काश्मीर प्रश्नाचे कोणीही राजकारण करू नये, या प्रश्नाबाबत सर्व राजकीय पक्षांशी केंद्र सरकार तयार आहे, असे स्पष्ट केले.काश्मिरातील स्थिती दिवसेंदिवस अधिकाधिक बिघडत असल्याबद्दल झालेल्या चर्चेमध्ये सर्वच पक्षांच्या सदस्यांनी चिंता व्यक्त करताना पाकिस्तानच्या कारवाया हाणून पाडल्या पाहिजेत, असे मत व्यक्त केले. मात्र तेथील स्थिती हाताळण्यात केंद्र सरकारला पूर्णपणे अपयश आल्याची टीका सर्वच विरोधी सदस्यांनी केली. काश्मीर प्रश्न गोळीबाराने आणि सशस्त्र सैनिकांच्या मदतीने सुटणार नाही. त्यासाठी देशातील आणि काश्मीरमधील सर्व पक्ष आणि गट यांच्याशी केंद्राने चर्चा सुरू करावी. चर्चेतूनच हा प्रश्न सुटू शकेल, असेही प्रतिपादन अनेक सदस्यांनी केले. सरकारने काश्मिरी जनतेला अतिरेकी वा दहशतवादी समजू नये आणि जनतेला तसे वागवू नये, असे मत अनेक सदस्यानी व्यक्त केले. राष्ट्रवादीचे प्रफुल फटेल म्हणाले की, काश्मीरमध्ये सध्या जे सुरू आहे, ते अतिशय भयावह आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)>‘चाय पे चर्चा’त मतलब नाहीकाश्मीर जळत असताना आपण पाकिस्तानशी चाय पे चर्चा करण्यात मतलब नाही. काश्मीरचा प्रश्न हा एका राज्याचा प्रश्न नाही. तो भारताच्या सुरक्षेचा प्रश्न आहे, हे समजून सरकारने वागणे गरजेचे आहे.- संजय राऊत, शिवसेना