शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Rains: रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा, २४ तासांत १२९.३ मिमी पावसाची नोंद, अनेक मार्ग ठप्प!
2
स्विस बँकांमध्ये भारतीयांच्या ठेवींमध्ये तीन पट वाढ! २०२१ नंतर विक्रमी पातळी गाठली
3
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
4
Air India Plane Crash: विमान अपघातातील २१५ मृतांची ओळख पटली, १९८ मृतदेह कुटुंबांकडे
5
Share Market Today: आधी फ्लॅट सुरुवात, नंतर Sensex ची २५५ अंकांनी उसळी; PSU बँकांमध्ये जोरदार खरेदी
6
इराणच्या अस्थिरतेला पाकिस्तान घाबरला! म्हणाला,'इस्रायली हल्ला आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन'
7
पॅन कार्ड बनवण्यासाठी आता आवश्यक झालं 'हे' डॉक्युमेंट, आधार लिंक करायची अखेरची तारीखही जाणून घ्या
8
झोपडपट्टीधारकांना मुंबईबाहेर काढू शकत नाही- मुंबई उच्च न्यायालय
9
Air India Plane Crash: एअर होस्टेस रोशनीच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार!
10
Eknath Shinde: "...हे पाप तुमचे आहे!" एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
11
आमिर खानसोबत फोटोसाठी पोझ देत होती जिनिलीया, बाजूला उभा राहून बघत होता रितेश, अन् मग...
12
"शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड पुसून टाकण्याचा प्रयत्न कराल तर नामोनिशान पुसून टाकू"
13
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
14
Mumbai Local: मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार, रेल्वेमंत्र्यांची लोकल ट्रेनबाबत मोठी घोषणा
15
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
16
रॅपिडो, उबर बाइक टॅक्सीविरुद्ध गुन्हा, नेमकं प्रकरण काय?
17
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, भावुक झाली करिश्मा, मुलांना अश्रू अनावर
18
samruddhi mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर अपघातात दोघांचा मृत्यू, जीपचालकाला डुलकी लागल्याने दुर्घटना!
19
Bombay High Court: ‘त्या’ एसआरए योजनेत ३५ टक्के जागा खुल्या ठेवा
20
MSRTC: ऐन हंगामात एसटीकडे प्रवाशांची पाठ, उत्पन्नात मोठी घट!

काश्मिरात हिंसेला पाकच जबाबदार!

By admin | Updated: July 19, 2016 04:53 IST

काश्मीरमधील हिंसाचाराला पाकिस्तानच पूर्णपणे कारणीभूत असून, पाकच्या या नापाक कारवाया मोडून काढल्या जातील,

नवी दिल्ली : काश्मीरमधील हिंसाचाराला पाकिस्तानच पूर्णपणे कारणीभूत असून, पाकच्या या नापाक कारवाया मोडून काढल्या जातील, अशी ग्वाही देतानाच, केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी सोमवारी राज्यसभेत काश्मिरातील संतप्त जमावांना पांगवण्यासाठी शस्त्रांचा वापर करताना अधिकाधिक संयम बाळगण्याच्या आणि मनुष्यहानी टाळण्याच्या सूचना सुरक्षा दलाला देण्यात आल्या आहेत. मात्र काश्मीर प्रश्नाचे कोणीही राजकारण करू नये, या प्रश्नाबाबत सर्व राजकीय पक्षांशी केंद्र सरकार तयार आहे, असे स्पष्ट केले.काश्मिरातील स्थिती दिवसेंदिवस अधिकाधिक बिघडत असल्याबद्दल झालेल्या चर्चेमध्ये सर्वच पक्षांच्या सदस्यांनी चिंता व्यक्त करताना पाकिस्तानच्या कारवाया हाणून पाडल्या पाहिजेत, असे मत व्यक्त केले. मात्र तेथील स्थिती हाताळण्यात केंद्र सरकारला पूर्णपणे अपयश आल्याची टीका सर्वच विरोधी सदस्यांनी केली. काश्मीर प्रश्न गोळीबाराने आणि सशस्त्र सैनिकांच्या मदतीने सुटणार नाही. त्यासाठी देशातील आणि काश्मीरमधील सर्व पक्ष आणि गट यांच्याशी केंद्राने चर्चा सुरू करावी. चर्चेतूनच हा प्रश्न सुटू शकेल, असेही प्रतिपादन अनेक सदस्यांनी केले. सरकारने काश्मिरी जनतेला अतिरेकी वा दहशतवादी समजू नये आणि जनतेला तसे वागवू नये, असे मत अनेक सदस्यानी व्यक्त केले. राष्ट्रवादीचे प्रफुल फटेल म्हणाले की, काश्मीरमध्ये सध्या जे सुरू आहे, ते अतिशय भयावह आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)>‘चाय पे चर्चा’त मतलब नाहीकाश्मीर जळत असताना आपण पाकिस्तानशी चाय पे चर्चा करण्यात मतलब नाही. काश्मीरचा प्रश्न हा एका राज्याचा प्रश्न नाही. तो भारताच्या सुरक्षेचा प्रश्न आहे, हे समजून सरकारने वागणे गरजेचे आहे.- संजय राऊत, शिवसेना