शहरं
Join us  
Trending Stories
1
आता दोघांनीही थांबावे; डोनाल्ड ट्रम्प यांची भारत-पाकिस्तानमध्ये पुन्हा मध्यस्थीची ऑफर
2
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
3
भारताच्या एअर स्ट्राईकमुळे पाकिस्तानमध्ये कितीजण मृत्युमुखी पडले? आकडा आला समोर  
4
बहावलपूरवरील हल्ला पाकिस्तानी सैन्याच्या लागलाय जिव्हारी, कापलं गेलंय नाक, कारण काय?
5
पाकिस्तानच्या गोळीबारात भारतीय जवान शहीद; डॉक्टरांनी वाचविण्याचा खूप प्रयत्न केला...
6
नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून आगळीक, भारतीय नागरिकांच्या मृत्यूनंतर चोख प्रत्युत्तर देण्याचे लष्कराला आदेश 
7
‘ऑपरेशन सिंदूर’ला नागपुरातील ‘नागास्त्र-१’चे बळ ? टेहळणीसोबतच लक्ष्याचा भेद करण्याची क्षमता
8
पॉवरप्लेमध्ये अर्धा संघ तंबूत परतल्यावरही CSK नं काढली मॅच; प्लेऑफ्स शर्यतीत KKR तळ्यात मळ्यात
9
Operation Sindoor 2.0: पाकिस्तानला सहजासहजी सोडणार नाही भारत, आणखी काय-काय घडणार?
10
Thank You Rohit Sharma! हिटमॅनच्या कसोटी निवृत्तीनंतर कोण काय म्हणाले? वाचा सविस्तर
11
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचे अवसान गळाले, आता म्हणतात, "आम्ही संयम पाळू, तणाव आणखी वाढता नये’’  
12
मुरिदकेमध्ये बड्या दहशतवाद्याचा खात्मा? पाकिस्तानी सैन्यातील अधिकाऱ्यांची अंत्ययात्रेला हजेरी   
13
Mumbai Local: मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मुंबई लोकल सेवा विस्कळीत, प्रवाशांची गैरसोय
14
'ऑपरेशन सिंदूर'बद्दल पंतप्रधान मोदींनी कालच दिले होते संकेत? 'त्या' वाक्यावरून रंगलीये चर्चा
15
Rohit Sharma: रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
16
Operation Sindoor Live Updates: पंजाबमधील अमृतसरमध्ये ब्लॅकआउट, लोकांना घरातच राहण्याचे आवाहन
17
"मारुतीरायाच्या आदर्शांचं पालन केलं, आम्ही त्यांनाच मारलं ज्यांनी…’’, राजनाथ सिंह यांचं मोठं विधान  
18
"दहशतवाद्यांना माफी नाही"; 'ऑपरेशन सिंदूर'वर इंग्लंडचे माजी PM ऋषी सुनक यांची रोखठोक प्रतिक्रिया
19
अजिंक्य रहाणेचं अर्धशतक हुकलं; पण IPL मध्ये ५ हजार धावांचा पल्ला गाठत मारली खास क्लबमध्ये एन्ट्री
20
Operation Sindoor : "कलमाबद्दल विचारणाऱ्यांना भारतीय सैन्याने महाभारत सुनावलं, आपल्या शांत झोपेमागे..."

पाकिस्तानकडून पुन्हा शस्त्रसंधीचे उल्लंघन, लष्कराचे चोख प्रत्युत्तर

By admin | Updated: June 1, 2017 11:08 IST

सीमेपलिकडील देशातून होणा-या कुरापती दिवसेंदिवस वाढतच चालल्या आहेत. पाकिस्ताननं गुरुवारी सकाळी पुन्हा शस्त्रसंधीचं उल्लंघन केले आहे.

ऑनलाइन लोकमत
श्रीनगर, दि. 1 - सीमेपलिकडील देशातून होणा-या कुरापती दिवसेंदिवस वाढतच चालल्या आहेत. पाकिस्ताननं गुरुवारी सकाळी पुन्हा शस्त्रसंधीचं उल्लंघन केले आहे. सकाळी जवळपास 8 वाजण्याच्या सुमारास केजी आणि नौशेरा सेक्टर परिसरात पाकिस्तानकडून उखळी तोफांचा मारा आणि मोठ्या प्रमाणात गोळीबार करण्यात आला. आताही पाकिस्तानकडून गोळीबार सुरू असल्याची माहिती समोर येत आहे. 
 
पाकिस्ताननं नौशेरमधील भारतीय लष्कराच्या 8 पोस्टना टार्गेट करत गोळीबार सुरू केला.  पाकिस्ताननं कुरापती सुरू केल्यानंतर भारतीय जवानांनी त्यांच्या भ्याड हल्ल्याला जशास तसं चोख प्रत्युत्तर दिले.
 
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तानकडून वारंवार शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात येत आहे. यामुळे सीमेलगत असलेल्या गावांमधील स्थानिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहेत. सतत होणा-या हल्ल्यांमुळे येथील स्थानिकांना जीव वाचवण्यासाठी आपले राहतं घर सोडावे लागत आहे. 
 
(जम्मू काश्मीरमध्ये 2 दहशतवाद्यांचा खात्मा)
तर दुसरीकडे, गुरुवारी (1 जून) पहाटेपासूनच जम्मू काश्मीरमधील सोपोर येथील नाथी पोरा परिसरात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये  चकमक सुरू आहे. या चकमकीत जवानांनी दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. 
चकमकीनंतर परिसरात सध्या शोधमोहीम सुरू आहे. राष्ट्रीय रायफल्स आणि जम्मू-काश्मीर पोलिनी संयुक्तरित्या ही कारवाई केली आहे.  
 
दरम्यान,  बुधवारी (31 मे) सोपोरमध्ये पोलीस दलावर ग्रेनेड फेकण्यात आले होते. या भ्याड हल्ल्यात चार पोलीस जखमी झाले होते. पेट्रोलिंग करत असताना पोलिसांवर हल्ला करण्यात आला. बुधवारी दुपारी 4.10 वाजण्याच्या सुमारास सोपोर येथे एका बँकेजवळ तैनात पोलिसांच्या गटावर ग्रेनेड फेकण्यात आल्याने चार पोलीस जखमी झाल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले. यानंतर जखमी पोलिसांना तातडीनं उपचारांसाठी जवळील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. 
(हिजबुल कमांडरसह १० दहशतवादी ठार)
तत्पूर्वी काश्मीर खोऱ्यात 27 मे रोजी तीन वेगवेगळ्या चकमकींमध्ये 10 दहशतवादी ठार झाले असून, त्यात हिजबुल मुजाहिद्दीनचा कमांडर सबजार अहमद भट्ट हाही ठार झाला होता. बुरहाननंतर सबजार भट्ट दहशतवादी संघटनेची जबाबदारी सांभाळत होता. त्राल येथे करण्यात आलेल्या कारवाईत सबजार आणि त्याचा साथीदार मारला गेला.
 
सबजार भट्ट मारला गेल्याचे वृत्त पसरताच, काश्मीरच्या अनेक भागांत तणाव निर्माण झाला होता. किमान ५0 ठिकाणी दगडफेक करण्यात आली होती.