शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वी शिंदेसेनेला धक्का? १५ माजी नगरसेवक नाराजीची चर्चा
2
सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय, वक्फ कायद्याला अभय; बोर्डात ३ गैर मुस्लीम सदस्य बनू शकतात, परंतु...
3
Acharya Devvrat: आचार्य देवव्रत यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून घेतली शपथ 
4
पाकिस्तान फायनलमध्ये हवीय...! प्लीज भारताने पुढला सामना बॉयकॉट करावा; पाकिस्तानी चाहत्यांची मागणी
5
"...तर माझ्या वडिलांचा जीव वाचला असता"; नवजोत सिंग यांच्या मुलाने केला गंभीर आरोप
6
ITR भरण्याची अंतिम मुदत वाढणार? सोशल मीडियावर चर्चा; आयकर विभागाने केलं स्पष्ट
7
"आपण कधी काळी तोडले गेलो, पण तेही परत मिळवू"; सरसंघचालक मोहन भागवत यांचे मोठे विधान
8
टीम इंडियाने हस्तांदोलन नाकारल्याने पाकिस्तानचा तीळपापड, पत्रक जारी करत नोंदवला निषेध
9
बाबाचं लक्ष फोनमध्ये, आई चेंजिंगरूममध्ये; स्विमिंग पूलमध्ये पडलेल्या ४ वर्षांच्या मुलीकडे कुणी पाहिलच नाही अन्...
10
Ameesha Patel : "९० टक्के सेलिब्रिटी पैसे देऊन..."; अमिषा पटेलने उलगडलं बॉलिवूड इंडस्ट्रीचं गुपित, सांगितलं 'ते' सत्य
11
शेवटी आईच ती! स्वत:ला झोकून दिले आणि लेकीला मगरीच्या जबड्यातून सोडवले, पण... 
12
४ महिन्यापूर्वी लग्न झालेल्या विवाहितेचा संशयास्पद मृत्यू; हुंड्यासाठी छळ करून केली हत्या? 
13
यह नया भारत है..., टीम इंडियाने पाकिस्तानला नमवल्यानंतर भाजपाने विरोधकांना डिवचले  
14
२२ सप्टेंबरपासून टीव्ही, फ्रीज, एसीसह इलेक्ट्रॉनिक वस्तू स्वस्त होणार; किती रुपयांची बचत होईल?
15
Cloudburst In Maharashtra: अहिल्यानगर जिल्ह्यात ढगफुटी, अनेक गावांना फटका; छोटा तलाव फुटला
16
कहानी में ट्विस्ट! नवऱ्याने बायकोचं बॉयफ्रेंडसोबत लग्न लावलं, आता 'त्याचं' भलतंच सत्य समोर आलं
17
सचिनला तुम्ही सीनिअर आहात?, मिश्कील प्रश्नावर दिलीप प्रभावळकरांना आलं हसू; मग म्हणाले...
18
दबावाखाली बाजार: ऑक्टोबर ‘ब्रेकआउट’ देईल की ‘ब्रेक’ घ्यावा लागेल?
19
झारखंडमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई; तीन माओवादी ठार, एकावर एक कोटी रुपयांचे बक्षीस
20
अहिल्यानगरमध्ये भूकंपाचे धक्के! बोटा, घारगाव परिसर हादरला; लोकांमध्ये भीतीचे वातावरण

पाकिस्तानकडून पुन्हा शस्त्रसंधीचे उल्लंघन, लष्कराचे चोख प्रत्युत्तर

By admin | Updated: June 1, 2017 11:08 IST

सीमेपलिकडील देशातून होणा-या कुरापती दिवसेंदिवस वाढतच चालल्या आहेत. पाकिस्ताननं गुरुवारी सकाळी पुन्हा शस्त्रसंधीचं उल्लंघन केले आहे.

ऑनलाइन लोकमत
श्रीनगर, दि. 1 - सीमेपलिकडील देशातून होणा-या कुरापती दिवसेंदिवस वाढतच चालल्या आहेत. पाकिस्ताननं गुरुवारी सकाळी पुन्हा शस्त्रसंधीचं उल्लंघन केले आहे. सकाळी जवळपास 8 वाजण्याच्या सुमारास केजी आणि नौशेरा सेक्टर परिसरात पाकिस्तानकडून उखळी तोफांचा मारा आणि मोठ्या प्रमाणात गोळीबार करण्यात आला. आताही पाकिस्तानकडून गोळीबार सुरू असल्याची माहिती समोर येत आहे. 
 
पाकिस्ताननं नौशेरमधील भारतीय लष्कराच्या 8 पोस्टना टार्गेट करत गोळीबार सुरू केला.  पाकिस्ताननं कुरापती सुरू केल्यानंतर भारतीय जवानांनी त्यांच्या भ्याड हल्ल्याला जशास तसं चोख प्रत्युत्तर दिले.
 
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तानकडून वारंवार शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात येत आहे. यामुळे सीमेलगत असलेल्या गावांमधील स्थानिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहेत. सतत होणा-या हल्ल्यांमुळे येथील स्थानिकांना जीव वाचवण्यासाठी आपले राहतं घर सोडावे लागत आहे. 
 
(जम्मू काश्मीरमध्ये 2 दहशतवाद्यांचा खात्मा)
तर दुसरीकडे, गुरुवारी (1 जून) पहाटेपासूनच जम्मू काश्मीरमधील सोपोर येथील नाथी पोरा परिसरात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये  चकमक सुरू आहे. या चकमकीत जवानांनी दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. 
चकमकीनंतर परिसरात सध्या शोधमोहीम सुरू आहे. राष्ट्रीय रायफल्स आणि जम्मू-काश्मीर पोलिनी संयुक्तरित्या ही कारवाई केली आहे.  
 
दरम्यान,  बुधवारी (31 मे) सोपोरमध्ये पोलीस दलावर ग्रेनेड फेकण्यात आले होते. या भ्याड हल्ल्यात चार पोलीस जखमी झाले होते. पेट्रोलिंग करत असताना पोलिसांवर हल्ला करण्यात आला. बुधवारी दुपारी 4.10 वाजण्याच्या सुमारास सोपोर येथे एका बँकेजवळ तैनात पोलिसांच्या गटावर ग्रेनेड फेकण्यात आल्याने चार पोलीस जखमी झाल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले. यानंतर जखमी पोलिसांना तातडीनं उपचारांसाठी जवळील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. 
(हिजबुल कमांडरसह १० दहशतवादी ठार)
तत्पूर्वी काश्मीर खोऱ्यात 27 मे रोजी तीन वेगवेगळ्या चकमकींमध्ये 10 दहशतवादी ठार झाले असून, त्यात हिजबुल मुजाहिद्दीनचा कमांडर सबजार अहमद भट्ट हाही ठार झाला होता. बुरहाननंतर सबजार भट्ट दहशतवादी संघटनेची जबाबदारी सांभाळत होता. त्राल येथे करण्यात आलेल्या कारवाईत सबजार आणि त्याचा साथीदार मारला गेला.
 
सबजार भट्ट मारला गेल्याचे वृत्त पसरताच, काश्मीरच्या अनेक भागांत तणाव निर्माण झाला होता. किमान ५0 ठिकाणी दगडफेक करण्यात आली होती.