शहरं
Join us  
Trending Stories
1
India Pakistan Tension: पाकिस्तानने किती वाजता केला हायस्पीड मिसाईल हल्ला? लष्कराने सांगितलं ९-१० मेच्या रात्री काय घडलं?
2
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तान दहशतवादी देश, त्यामुळे भारत आता थांबणार नाही - देवेंद्र फडणवीस
3
...तर पाकिस्तानला बसेल मोठा फटका, सोन्याचे भांडार हातातून जाईल; किती मोठी आहे इकॉनॉमी?
4
भारतीय सैन्यानं केली पाकची फजिती; पत्रकार परिषदेत फोटो दाखवत खोट्या दाव्याची पोलखोल
5
'ऑपरेशन सिंदूर'वर सिनेमाची घोषणा, पोस्टर पाहून भडकले नेटकरी, म्हणाले- "लाज वाटत नाही?"
6
आकाश डिफेन्स सिस्टमनं काढली PAKISTAN ची हवा, दुसरीकडे हे बनवणाऱ्या कंपनीचे शेअर्सही सुस्साट 
7
Narasimha Jayanti 2025: 'नृसिंह म्हणजे समाजातून सिंहासरखा उभा ठाकलेला वीर!'-प.पू.आठवले शास्त्री
8
भारताच्या हल्ल्यानंतर झालेलं नुकसान लपवण्यासाठी पाकिस्तानची धडपड, काय काय करतंय वाचाच 
9
भारताच्या हल्ल्याने पाकिस्तान बिथरला! पंतप्रधान शाहबाज यांचं आणखी एक नापाक पाऊल; अण्वस्त्रांशी थेट संबंध
10
कॅश, एटीएम, युपीआय... पाकिस्तानसोबतच्या तणावादरम्यान सीतारामन यांचे बँकांना अलर्ट राहण्याचे निर्देश
11
Vikram Gaikwad Death: राष्ट्रीय पुरस्कार विजेते मेकअप आर्टिस्ट विक्रम गायकवाड यांचं निधन
12
India vs Pakistan : जीडीपी, जॉब आणि डेव्हलपमेंटमध्ये पाकिस्तानची दूरपर्यंत भारताशी तुलना नाही; पाहा 'ही' आकडेवारी
13
India Pakistan Tension : पाकिस्तानच्या मिसाईलचे तुकडे हरियाणाच्या शेतात! सेनेने घेतले ताब्यात; दिल्लीवर होता निशाणा 
14
शिवाजी साटम यांच्या कमबॅकनंतर पार्थ समथानची CID 2 मधून एक्झिट; म्हणाला, "हे आधीच..."
15
India Pakistan: आणखी एक घाव! भारतीय लष्कराने पाकिस्तानच्या चौक्या आणि दहशतवादी लॉन्चिंग पॅड्स उडवले, व्हिडीओ बघा
16
India Pakistan Tension : खेळ महत्त्वाचा; पण आधी देश! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा खास संदेश
17
भारताविरोधात पाकिस्तानचं ऑपरेशन 'बुनयान उल मरसूस'; काय आहे या शब्दाचा अर्थ?
18
पाकिस्तानकडून भारताच्या नागरी वस्त्यांवर भ्याड हल्ले; घरांचे नुकसान, काही जखमी
19
Tarot Card: एकावेळी एका गोष्टीवर लक्ष द्या, नाहीतर तारांबळ उडेल; आगामी आठवडा संयम पाहणारा!
20
Virat Kohli Test Retirement: रोहित शर्मानंतर विराट कोहलीचाही कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय? BCCI ला दिली माहिती

पठाणकोट हल्ल्याप्रकरणी पाकिस्तानने शब्द फिरवत शांतता चर्चा थांबवली

By admin | Updated: April 8, 2016 09:57 IST

पठाणकोट दहशतवादी हल्ल्याचा तपास करण्यासाठी भारतीय अधिका-यांना पाकिस्तानात येऊन पुरावे गोळा करण्यासाठी परवानगी देण्यात येणार नाही असं पाकिस्तानचे उच्चायुक्त अब्दुल बसित यांनी सांगितलं आहे

ऑनलाइन लोकमत - 
नवी दिल्ली, दि. ८ - पठाणकोट दहशतवादी हल्ल्याचा तपास करण्यासाठी भारतीय अधिका-यांना पाकिस्तानात येऊन पुरावे गोळा करण्यासाठी परवानगी देण्यात येणार नाही असं पाकिस्तानचे उच्चायुक्त अब्दुल बसित यांनी सांगितलं आहे. पाकिस्तानचं तपास पथक भारतात येऊन तपास करुन गेले असताना पाकिस्तानचे उच्चायुक्त अब्दुल बसित यांनी हे वक्तव्य केलं आहे. याअगोदरही पाकिस्तानच्या संयुक्त तपास पथकाने (जेआयटी) कोलांटी उडी मारत पठाणकोट हल्ला म्हणजे पाकला बदनाम करण्यासाठी भारतानेच रचलेले नाटक होते असा आरोप केला होता.
 
पाकिस्तानी तपास पथकाचा दौरा ही देवाण घेवाण नव्हती असं अब्दुल बसित  बोलले आहेत. तसंच भारतासोबत सुरु असलेली शांतता चर्चादेखील रद्द केल्याचं त्यांनी सांगितलं आहे. पाकिस्तानने आपला शब्द फिरवल्यामुळे केंद्र सरकार कोंडीत सापडण्याची शक्यता असून विरोधकांनी टीका करण्यास सुरुवात केली आहे. पठाणकोट दहशतवादी हल्ल्याच्या तपासासाठी पाकिस्तानचं तपास पथक भारतात येईल आणि त्या बदल्यात राष्ट्रीय तपास यंत्रणेचे (एनआयए) अधिकारी पाकिस्तानात जाऊन तपास करतील असं ठरल होतं अशी माहिती सरकारने दिली आहे. 
 
पाकिस्तानने घेतलेल्या या निर्णयामुळे त्यांची भुमिका पुन्हा एकदा स्पष्ट झाली आहे. परराष्ट्र सचिवांशी यासंदर्भात चर्चा होण्यासाठी प्रयत्न सुरु असल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयाने दिली आहे. पठाणकोट दहशतवाही हल्ल्यानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी भारताने दिलेल्या पुराव्यांच्या आधारे जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मसूद अजहरचा सहभाग आहे की नाही याची चौकशी करण्यासाठी विशेष पथक नेमलं होतं.