शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
3
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
4
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
5
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
6
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
7
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
8
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण
9
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
10
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
11
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
12
बाजार सपाट पातळीवर बंद; रिलायन्सचा शेअर पुन्हा आला धावून, 'या' सेक्टरवर दबाव
13
ATM मधून वारंवार पैसे काढायची सवय असेल तर ती बदला, नाहीतर १ मे पासून होईल नुकसान
14
अण्वस्त्रांची धमकी देणाऱ्या पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचे तोंड भारताने केले बंद; एक्स अकाउंटवर घातली बंदी
15
Viral Video: बिबट्या थेट पोलीस ठाण्यातच आला! पोलिसाने पाहिलं, पण नंतर काय घडलं?
16
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
17
...म्हणून मुलाचं नाव बॉबी ठेवलं! किशोरी शहाणेंनी सांगितलं कारण, म्हणाल्या- "मी मराठी, नवरा पंजाबी आणि सासू..."
18
Mumbai Accident: ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
19
पाकिस्तानने कुठे लपवलाय अण्वस्त्रांचा साठा? 'या' अहवालाने केली पाकची पोलखोल...
20
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?

पाकने डिवचू नये, अन्यथा प्रत्येक हल्ल्याला चोख प्रत्युत्तर मिळेल!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2018 06:33 IST

रमझान काळात जम्मू-काश्मीरमध्ये पाळण्यात येणाऱ्या शस्त्रसंधीचा भारतीय लष्कर नक्कीच आदर करते. मात्र सीमेपलीकडून होणा-या प्रत्येक हल्ल्याला तितकेच चोख वा त्याहून आक्रमकपणे प्रत्युत्तर दिले जाईल.

नवी दिल्ली : रमझान काळात जम्मू-काश्मीरमध्ये पाळण्यात येणाऱ्या शस्त्रसंधीचा भारतीय लष्कर नक्कीच आदर करते. मात्र सीमेपलीकडून होणा-या प्रत्येक हल्ल्याला तितकेच चोख वा त्याहून आक्रमकपणे प्रत्युत्तर दिले जाईल. हल्ला झाला आणि आम्ही गप्प बसलो, असे कदापि घडणार नाही, असा इशारा केंद्रीय संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांनी पाकिस्तानचे नाव न घेता दिला आहे.मोदी सरकारला चार वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त मंगळवारी पत्रकार परिषदेमध्ये त्या म्हणाल्या की, सीमेपलीकडून हल्ले झाले तर त्याला चोख प्रत्युत्तर देण्याचे अधिकार लष्कराला देण्यात आले आहेत. भारताच्या सीमा सुरक्षित ठेवणे हे आमचे कर्तव्यच आहे. आमच्यावर हल्ले करणाºया आणि आम्हाला डिवचणाºयांना त्याच भाषेत उत्तर दिले जाईल.रमझानच्या काळात शस्त्रसंधी पाळण्याची भारताने केलेली घोषणा व दोन्ही देशांच्या लष्करी मोहीमविषयक विभागाच्या महासंचालकांमध्ये (डीजीएमओ) हॉटलाइनवरून झालेल्या चर्चेनंतरही पाकिस्तानने भारतीय हद्दीत हल्ले करण्याचे काही प्रकार घडले आहेत. तसेच काश्मीर खोºयात या आठवडाभरात दहशतवाद्यांनी किमान बारा ग्रेनेड हल्ले केले. या पार्श्वभूमीवर त्या म्हणाल्या की, जम्मू-काश्मीरमध्ये रमझान काळात पाळण्यात येणारी शस्त्रसंधी यशस्वी होते की नाही हे पाहणे संरक्षण मंत्रालयाचे काम नाही.या शस्त्रसंधीची मुदत वाढविली जाऊ शकते का, या प्रश्नावर सीतारामन यांनी सांगितले की, ही घोषणा केवळ रमझानपुरती आहे. काश्मीरमध्ये रमझानकाळात दहशतवाद्यांविरोधात कारवाई करणार नाही, असे सरकारने जाहीर केले होते. या एकतर्फी शस्त्रसंधीची सुरुवात १७ मेपासून झाली होती.रशियाकडून भारत विमाने घेणारचभारताने आमच्याखेरीज अन्य कोणत्याही देशांकडून शस्त्रखरेदी करू नये, असे अमेरिकेचे म्हणणे आहे. तसे करणाºया देशांवर निर्बंध घालण्यात येतील, असा इशाराही अमेरिकेने दिला आहे. भारताने रशियाकडून लढाऊ विमाने घेण्याचा करार केला असून, तोही रद्द करण्यात यावा, अशी अमेरिकेची इच्छा आहे. त्याबाबत सीतारामन म्हणाल्या की, भारत व रशिया यांचे संबंध अतिशय जुने आहेत. आम्ही अनेक वर्षांपासून त्या देशाकडून युद्धसामग्री घेत आलो आहोत. अमेरिकेने निर्बंधांची भाषा आमच्याशी करू नये.पाकिस्तानशी चर्चा नाहीपाकिस्तानशी चर्चा करणार का, या प्रश्नावर सीतारामन यांनी सुषमा स्वराज यांनी अलीकडेच केलेल्या वक्तव्याचा दाखला दिला. दहशतवाद व चर्चा एकाच वेळी होऊ शकत नाही, असे स्वराज म्हणाल्या होत्या. गेल्या काही महिन्यांपासून पाकिस्तानकडून सीमाभागात मोठ्या प्रमाणावर हल्ले चढविण्यात येत आहेत. या वर्षी आतापर्यंत पाकिस्तानने सीमेवर व नियंत्रणरेषेवर ९०८ वेळा हल्ले केले आहेत.राफेलच्या खरेदीत घोटाळा नाहीराफेल लढाऊ विमानांच्याखरेदी व्यवहारात कोणताही घोटाळा झालेला नाही. फ्रान्सकडून ही विमाने घेण्यात येणार आहेत. या प्रकरणी होत असलेले आरोप राजकीय हेतूने प्रेरित आहेत.इतर देशांची खरेदी किंमत व भारत देणार असलेली किंमत यांची चुकीची व खोटारडी तुलना काही जण करतात, असा टोला सीतारामन यांनी काँग्रेसचे नाव न घेता लगावला.

टॅग्स :Nirmala Sitaramanनिर्मला सीतारामन