शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

पाकिस्तानकडून काश्मीरमध्ये नव्या दहशतवादी संघटनेची उभारणी?

By admin | Updated: May 20, 2017 09:16 IST

काश्मीर खो-यात फुटीरतावादी हर्रियतचे नेते आणि दहशतवादी गटांमध्ये विसंवाद वाढत चाललला आहे. झाकीर मुसासारख्या दहशतवाद्याने खुलेआम फुटीरतवाद्यांना धमकी दिली.

 ऑनलाइन लोकमत 

श्रीनगर, दि. 20 - काश्मीर खो-यात फुटीरतावादी हुर्रियतचे नेते आणि दहशतवादी गटांमध्ये विसंवाद वाढत चालला आहे. झाकीर मुसासारख्या दहशतवाद्याने खुलेआम फुटीरतवाद्यांना धमकी देताना हिंसाचाराचे समर्थन केले होते. झाकीरची भाषा पाकिस्तानच्या काश्मीर धोरणाला अनुकूल अशीच आहे. त्यामुळे पाकिस्तानमध्ये बसलेले दहशतवाद्यांचे मोहोरके झाकीर सारख्या दहशतवाद्यांना हाताशी पकडून काश्मीरमध्ये नव्या दहशतवादी संघटनेची उभारणी करत असावेत असा संशय भारतीय गुप्तचर यंत्रणांनी व्यक्त केला आहे.  
 
फुटीरतावाद्यांना इस्लामिक संघर्ष म्हणा अन्यथा मुंडकी छाटू अशी धमकी देणा-या झाकीर मुसाने हिजबुल मुजाहिद्दीनबरोबर संबंध तोडले आहेत. फुटीरतवाद्यांबद्दल झाकीरने जे वक्तव्य केले त्याला पाठिंबा द्यायला हिजबुलने नकार दिला. त्यावरुन झाकीर आणि संघटनेमध्ये मतभेद झाल्याने तो हिजबुलमधून बाहेर पडला. झाकीरने काश्मीरमध्ये बुरहान वानीची जागा घेतली आहे. 
 
नव्वदच्या दशकात काश्मीरमध्ये जे वातावरण होते तसेच वातावरण आता आहे. तरुण मोठया प्रमाणावर दहशतवादाकडे वळले आहे. एकूणच या परिस्थितीचा फायदा उचलण्यासाठी पाकिस्तान 1990 च्या दशकातील आपली काश्मीर रणनिती राबवू शकतो. त्यावेळी पाकिस्तानने पडद्यामागे राहून काश्मीर खो-यात मोठया प्रमाणावर दहशतवाद निर्माण केला होता. त्यावेळी जम्मू अँड काश्मीर लिबरेशन फ्रंट ही एकच दहशतवादी संघटना होती. पण पुढच्या तीन-चार वर्षात पाकिस्तानने तिथे अनेक दहशतवादी संघटना उभ्या केल्या होत्या. 
 
मुसाने फुटीरतावाद्यांना दिलेल्या धमकीमध्ये काश्मीरमध्ये 27 वर्ष जो सशस्त्र लढा चालू आहे, तो इस्लामिक लढा आहे. त्याला राजकीय संघर्षाचे नाव देऊ नका. अन्यथा लाल चौकात तुमची मुंडकी छाटू असे त्याने म्हटले होते. काश्मीरमध्ये दहशतवादी संघटनांनी इस्लामिक दृष्टीने जी आखणी केलीय त्यात ढवळाढवळ करु नका. तुम्हाला काश्मीरचा संघर्ष राजकीय वाटतो तर, मशिदी. इस्लामिक चिन्ह आणि घोषणांचा वापर करु नका असा त्याने फुटीरतवाद्यांना इशारा दिला होता. सय्यद अली गिलानी, मीरवाईज उमर फारुख आणि यासीन मलिक हे काश्मीरमधील फुटीरतवादी गटाचे नेते आहेत. मागच्यावर्षी सैन्याबरोबर झालेल्या चकमकीत बुरहान वानी मारला गेल्यानंतर काश्मीरमध्ये मोठा हिंसाचार झाला होता. त्यानंतर इथली परिस्थिती अधिकच बिघडत गेली.