शहरं
Join us  
Trending Stories
1
२०१४ मध्येच भाजपा शिवसेनेला हात दाखवणार होती,पण...; प्रफुल्ल पटेलांचा १० वर्षांनी गौप्यस्फोट
2
Russia Ukrain War : डोनाल्ड ट्रम्प युक्रेनचे दोन तुकडे करणार? क्रिमिया अन् दोन मोठी शहरे रशियाला मिळणार
3
तरुण वयात ₹१०० ची बचत वृद्धापकाळात देऊ शकते ३ कोटींची रक्कम; SIP मध्ये गुंतवणुकीसाठी वापरू शकता 'हा' फॉर्म्युला
4
Mumbai Local: मुंबईत मुसळधार पाऊस! हार्बर आणि मध्य मार्गावरील लोकल सेवा विस्कळीत
5
आभाळ फाटले! मुखेड तालुक्यातील सहा गावांत पाणी शिरले; बेपत्ता १२ जणांचा शोध सुरु
6
Mumbai Rain Alert: मुंबईत रेड अलर्ट; तीन ते चार तासात 'अतिमुसळधार' कोसळणार, शाळांना सुट्टी जाहीर
7
परळी हादरलं! लग्नावरून परतताना जीप पुरात वाहून गेली; तिघे बचावले, एकाचा मृत्यू
8
School Holiday: मुंबईत शाळांना सुट्टी जाहीर, पाणी साचल्याने अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प; ४८ तासांसाठी रेड अलर्ट जारी
9
Video: टोलनाक्यावरील कर्मचारी की गुंड; लष्कराच्या जवानावर तुटून पडले, खांबाला बांधून दांडक्याने मारले
10
चेकच्या मागच्या बाजूला सही का करतात? ९०% लोकांना या प्रश्नाचे उत्तर माहित नसणार
11
‘मत चोरी’चा वाद वाढला, विरोधक मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात महाभियोग प्रस्ताव आणण्याच्या तयारीत 
12
Technology: ATM मधून पैसे काढल्यानंतर तुमचा PIN सुरक्षित राहतो का? 'अशी' घ्या काळजी!
13
Asia Cup India Squad : गंभीरनं 'फिल्डिंग' लावली तर गिल खेळणार; नाहीतर... आगरकर हे ३ मोठे निर्णय घेणार?
14
धक्कादायक! रणथंभोर व्याघ्र प्रकल्पात पर्यटकांची गाडी अचानक पडली बंद आणि मग...
15
श्रावणातला शेवटचा आठवडा; 'या' दिशेला लावा बेलाचे झाड, घरात धन, समृद्धी, पैसा येईल अपार
16
"सिनेमाच्या नावाखाली अभिनेते मजा..." कमी वयाच्या अभिनेत्रींसोबत काम करण्यावर आर माधवनचं भाष्य
17
सतर्क राहा: कोकण, पश्चिम महाराष्ट्रात १८-१९ ऑगस्टला मुसळधार पाऊस; कुठे-कुठे 'रेड अलर्ट'?
18
अहिल्यानगरमध्ये फर्निचरच्या दुकानात अग्नितांडव; अख्खं कुटुंब संपलं, दोन चिमुकल्यांसह पाच जणांचा मृत्यू
19
भाडे देऊन लाखोंचे नुकसान की EMI देऊन घर खरेदी करावे? ५० लाखांच्या घराचं आर्थिक गणित समजून घ्या
20
फ्लॉप शोचा सिलसिला संपेना! अन् म्हणे; सलमानचा पाक संघ आशिया कपमध्ये टीम इंडियासमोर हिट ठरेल

पाकिस्तान म्हणजे नेपाळ आणि भूतान नाही- मुशर्रफ

By admin | Updated: September 28, 2016 16:15 IST

उरीमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे भारत आणि पाकिस्तानमधले संबंध ताणले गेले आहेत.

ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 28 - उरीमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे भारत आणि पाकिस्तानमधले संबंध ताणले गेले आहेत. या हल्ल्याविरोधात भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर निषेध करत पाकिस्तानला खडेबोल सुनावले आहेत. इस्लामाबादमध्ये होणा-या सार्क परिषदेला भारत अनुपस्थित राहणार आहे.

पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी भारतानं सार्क परिषदेतून माघार घेतली आहे. मात्र सर्व प्रकारावर पाकिस्तानचे माजी राष्ट्रपती परवेझ मुशर्रफ यांनी भारतासह पंतप्रधान मोदींवर टीका केली आहे. भारताचे पंतप्रधान नेहमीच पाकिस्तानसोबत युद्धाची भाषा करत असतात. त्यांनी आम्हाला नेपाळ आणि भूतानसारखी वागणूक देण्याचं टाळलं पाहिजे. काश्मीर मुद्दा व्यवस्थितरीत्या हाताळल्यास दहशतवादाचंही उच्चाटन होईल, असे ते म्हणाले आहेत.

माजी पंतप्रधान वाजपेयी आणि मनमोहन सिंग यांनी भारत आणि पाकिस्तानमध्ये नेहमीच शांततेची भूमिका घेतली होती. मात्र सध्याचे पंतप्रधान या प्रकरणात तशी भूमिका घेत नाहीत. ते पाकिस्तानवर कुरघोडी करत असतात. परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज वाजपेयींच्या काळात मंत्रिपदी असताना पाकिस्तानबाबत शांततापूर्ण भूमिका घेत होत्या. मात्र आता मोदी सरकारच्या काळात त्या संयुक्त राष्ट्रात पाकिस्तानवर टीका करत कुरघोडी करत आहेत, असंही मुशर्रफ म्हणाले आहेत. भारतानं उचललेल्या बलुचिस्तानच्या मुद्द्यामुळे अफगाणिस्तानसोबत आमचे संबंध खराब होत असल्याचं वक्तव्य मुशर्रफ यांनी केलं आहे.

 आणखी वाचा

भारताच्या संयमाला पाकिस्ताननं गृहीत धरू नये, अमेरिकन प्रसारमाध्यमांनी खडसावलं