शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

पाकिस्तान म्हणजे नेपाळ आणि भूतान नाही- मुशर्रफ

By admin | Updated: September 28, 2016 16:15 IST

उरीमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे भारत आणि पाकिस्तानमधले संबंध ताणले गेले आहेत.

ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 28 - उरीमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे भारत आणि पाकिस्तानमधले संबंध ताणले गेले आहेत. या हल्ल्याविरोधात भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर निषेध करत पाकिस्तानला खडेबोल सुनावले आहेत. इस्लामाबादमध्ये होणा-या सार्क परिषदेला भारत अनुपस्थित राहणार आहे.

पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी भारतानं सार्क परिषदेतून माघार घेतली आहे. मात्र सर्व प्रकारावर पाकिस्तानचे माजी राष्ट्रपती परवेझ मुशर्रफ यांनी भारतासह पंतप्रधान मोदींवर टीका केली आहे. भारताचे पंतप्रधान नेहमीच पाकिस्तानसोबत युद्धाची भाषा करत असतात. त्यांनी आम्हाला नेपाळ आणि भूतानसारखी वागणूक देण्याचं टाळलं पाहिजे. काश्मीर मुद्दा व्यवस्थितरीत्या हाताळल्यास दहशतवादाचंही उच्चाटन होईल, असे ते म्हणाले आहेत.

माजी पंतप्रधान वाजपेयी आणि मनमोहन सिंग यांनी भारत आणि पाकिस्तानमध्ये नेहमीच शांततेची भूमिका घेतली होती. मात्र सध्याचे पंतप्रधान या प्रकरणात तशी भूमिका घेत नाहीत. ते पाकिस्तानवर कुरघोडी करत असतात. परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज वाजपेयींच्या काळात मंत्रिपदी असताना पाकिस्तानबाबत शांततापूर्ण भूमिका घेत होत्या. मात्र आता मोदी सरकारच्या काळात त्या संयुक्त राष्ट्रात पाकिस्तानवर टीका करत कुरघोडी करत आहेत, असंही मुशर्रफ म्हणाले आहेत. भारतानं उचललेल्या बलुचिस्तानच्या मुद्द्यामुळे अफगाणिस्तानसोबत आमचे संबंध खराब होत असल्याचं वक्तव्य मुशर्रफ यांनी केलं आहे.

 आणखी वाचा

भारताच्या संयमाला पाकिस्ताननं गृहीत धरू नये, अमेरिकन प्रसारमाध्यमांनी खडसावलं