शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

भारताच्या सर्वात उंचावरील तिरंग्यामध्ये पाकिस्तानला दिसते हेरगिरी

By admin | Updated: March 7, 2017 08:44 IST

पंजाबमधील अटारी येथील भारत-पाकिस्तान सीमेवर भारताने सोमवारी सर्वात उंच तिरंगा झेंडा फडकवला. अगदी पाकिस्तानच्या लाहोर शहरातूनही हा तिरंगा डौलाने फडकताना दिसतो.

 ऑनलाइन लोकमत 

अमृतसर, दि. 7 - पंजाबमधील अटारी येथील भारत-पाकिस्तान सीमेवर भारताने सोमवारी सर्वात उंच तिरंगा झेंडा फडकवला. अगदी पाकिस्तानच्या लाहोर शहरातूनही हा तिरंगा डौलाने फडकताना दिसतो. या तिरंग्यामुळे समस्त भारतीयांच्या मनात अभिमानाची भावना असली तरी, पाकिस्तानच्या पोटात दुखण्यास सुरुवात झाली आहे. 
 
पाकिस्तानमध्ये या तिरंग्याबद्दल अस्वस्थततेची भावना असून, पाकिस्तानी रेंजर्सनी आपली नाराजी सीम सुरक्षा दलाला (BSF) कळवली आहे. सीमेवरुन हा झेंडा दुसरीकडे हलवण्याची मागणी पाकिस्तानने केली आहे. भारत या झेंडयाचा उपयोग हेरगिरीसाठी करु शकतो अशी भिती पाकिस्तानला आहे. 
 
तिरंगा फडकवण्यात आलेल्या ध्वजस्तंभाची उंची ११० मीटर (३६० फूट), रुंदी २४ मीटर आणि वजन ५५ टन आहे. रांचीतील ९१.४४ मीटर (३०० फूट) उंच ध्वज स्तंभाला या ध्वजाने मागे टाकले आहे. सीमेपासून १५० मीटर अंतरावर हा झेंडा स्थापन करण्यात आला आहे. सूर्यास्ताच्या वेळी येथे जमणाऱ्या हजारो पर्यटकांसाठी हा झेंडा आकर्षणाचे केंद्र बनला आहे. 
 
पंजाब सरकारच्या अमृतसर सुधार न्यास प्राधिकरणाने ३.५० कोटी रुपये खर्च करून ही योजना आकाराला आणली आहे. राज्यात अद्यापही विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता सुरू आहे. त्यामुळे उद्घाटनासाठी निवडणूक आयोगाकडून विशेष मंजुरी घेण्यात आली होती.