शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

सीमेवर पाकचा रात्रभर गोळीबार

By admin | Updated: January 2, 2015 02:18 IST

५० ते ६० अतिरेकी भारतात घुसण्याच्या तयारीत असून त्यांना घुसखोरी करता यावी यासाठी पाक सीमेवर गोळीबार करीत असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

जम्मू : पाकिस्तानने गुरुवारी पुन्हा एकदा शस्त्रसंधीचा भंग करीत सांबा सेक्टरमधील भारताच्या १३ सीमा चौक्यांवर तुफान गोळीबार केला़ सीमेपलीकडून वारंवार होणाऱ्या शस्त्रसंधीच्या उल्लंघनाबाबत भारत पाकिस्तानकडे तीव्र आक्षेप नोंदवणार आहे़ ५० ते ६० अतिरेकी भारतात घुसण्याच्या तयारीत असून त्यांना घुसखोरी करता यावी यासाठी पाक सीमेवर गोळीबार करीत असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.बुधवारी पाकिस्तानच्या मुजोरीला भारतीय सीमा सुरक्षा दलाने (बीएसएफ) ठोस प्रत्युत्तर देत चार पाकिस्तानी रेंजरला ठार मारले होते़ भारतीय जवानांनी गोळीबार थांबवावा, यासाठी पाकिस्तानी सैन्याला पांढरे निशाण फडकवावे लागले होते़ भारताचाही जवान या गोळीबारात शहीद झाला होता़ गेल्या तीन दिवसांत पाकिस्तानने तिसऱ्यांदा आणि आठवडाभरात सातव्यांदा शस्त्रसंधी उल्लंघन केले आहे़सीमा सुरक्षा दलाचे महानिरीक्षक राकेश शर्मा यांनी यासंदर्भात पत्रकारांना सांगितले की, पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय सीमेवर नियमभंग केला आहे़ आम्ही शस्त्रसंधी भंगाबाबत पाकिस्तानकडे कठोर विरोध नोंदवू़ पाकिस्तानी रेंजरनी रात्रभर सांबा सेक्टरच्या आंतरराष्ट्रीय सीमेवर गोळीबार केला़भारतीय जवानांनीही प्रत्युत्तर दिले़ सकाळी ६ वाजेपर्यंत दोन्ही बाजूंनी हा गोळीबार सुरू होता़ या गोळीबारात प्राणहानी झाली नाही़ सुमारे ५० ते ६० अतिरेकी पाकिस्तानातून भारतीय सीमेत घुसखोरी करण्याच्या तयारीत असल्याचेही त्यांनी सांगितले़दरम्यान, पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन थांबवायला हवे़ दोन्ही देशाचे अधिकारी या मुद्यासंदर्भात संपर्कात आहेत. सीमेवरील स्थिती लवकरच सामान्य होईल, असे केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह गुरुवारी म्हणाले़ (वृत्तसंस्था)शहीद साथी... आंतरराष्ट्रीय सीमेजवळ पाकिस्तानी सैनिकांनी बुधवारी केलेल्या गोळीबारात सीमा सुरक्षा दलाचे जवान राम गवारिया हे हुतात्मा झाले. त्यांच्या मृतदेहावर जम्मूतील सीमा सुरक्षा दलाच्या मुख्यालयात गुरुवारी सीमा सुरक्षा दलाच्या अधिकाऱ्याने पुष्पचक्र अर्पण केले. च्जम्मू : आंतरराष्ट्रीय सीमेवर भारत पाकिस्तानवर स्वत:हून कधी गोळीबार करीत नाही मात्र पाककडून असा गोळीबार होत असेल तर त्या देशानेही जशास तशा उत्तरासाठी तयार राहावे असा इशारा सीमा सुरक्षा दलाचे जम्मू फ्रंटियरचे (बीएसएफ) महासंचालक राकेश शर्मा यांनी येथे दिला आहे. च्जर पाकिस्तानी रेंजर्सनी आमच्यावर गोळीबार केला तर अम्हीही त्याला प्रत्युत्तर देऊ. पाकने बुधवारी आंतरराष्ट्रीय सीमेवर शस्त्रसंधीचे उल्लंघन करीत बीएसएफच्या गस्त पथकावर गोळीबार केला होता. त्यात कॉन्स्टेबल राम गवारिया हे शहीद झाले होते. त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आयोजित सभेत शर्मा बोलत होते.