शहरं
Join us  
Trending Stories
1
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
2
सासरचे इतका त्रास देत होते तर मुलीला माहेरी का नेले नाही? उत्तर देताना निक्की भाटीच्या वडिलांच्या डोळ्यांत आलं पाणी
3
Lalbaugcha Raja 2025 : 'ही शान कोणाची... लालबागच्या राजाची!!"; बाप्पाच्या सजावटीत यंदा खास काय?
4
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
5
अमेरिकेत ट्रकचा भीषण अपघात, भारतीय चालकाला 'इतक्या' वर्षांची शिक्षा होणार? कुटुंबाने मागितली भारत सरकारची मदत!
6
लाडकी बहीण योजनेच्या गैरवापराची चौकशी करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
7
Bigg Boss 19: बॉलिवूडचे सुपरस्टार्स ते टीव्हीवरचे कलाकार; पाहा 'बिग बॉस १९'च्या स्पर्धकांची संपूर्ण यादी
8
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
9
Bigg Boss 19 Premiere : नव्या पर्वाची दणक्यात सुरुवात! 'ही' आहे पहिली स्पर्धक
10
Bigg Boss 19: घरात होणार गँगवॉर! 'गँग्स ऑफ वासेपूर' फेम अभिनेत्याची 'बिग बॉस'मध्ये एन्ट्री
11
महिन्याला १ लाख कमवायची निक्की; तरीही का बंद केला ब्युटी पार्लरचा व्यवसाय? वडिलांनी सांगितलं कारण, म्हणाले...
12
पूजाचं ऐकलं अन् पुजारानं हा निर्णय घेतला! निवृत्तीनंतर स्वत: शेअर केली 'अनटोल्ड स्टोरी'
13
सुनेला जाळून मारण्यात मुलाची केली मदत; दिल्लीच्या निक्की भाटी प्रकरणात सासूला अटक!
14
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे
15
विद्यार्थ्याचा पाय घसरला, शिक्षक वाचवायला गेले; वेरुळच्या जोगेश्वरी कुंडात बुडून दोघांचा मृत्यू 
16
'कभी खुशी कभी गम' फेम अभिनेत्री झाली आई, ३४व्या वर्षी दिला गोंडस लेकीला जन्म
17
'सन्मानजनक निरोप द्यायला हवा होता...', पुजाराच्या निवृत्तीवर शशी थरुर यांची भावनिक पोस्ट
18
Ganpati 2025: शिव ठाकरेच्या घरी वाजत गाजत आले गणपती बाप्पा, इतकी सुंदर मूर्ती की नजरच हटेना, पाहा व्हिडीओ
19
Asia Cup 2025: आशिया चषकात सर्वाधिक सामने जिंकणारे टॉप-५ कर्णधार!
20
भारतानंतर आता युरोपचाही अमेरिकेला मोठा धक्का; 'या' दोन देशांनी 'एफ ३५' फायटर जेट्स खरेदीला दिला नकार!

पाकिस्तान पडले तोंडघशी!

By admin | Updated: October 6, 2016 05:57 IST

नियंत्रण रेषेपलीकडील पाकव्याप्त काश्मीरमध्ये भारताने दहशतवाद्यांच्या तळांवर गेल्या आठवड्यात केलेल्या सर्जिकल स्ट्राइकबाबत भारतात शंका व्यक्त होत असली

नवी दिल्ली : नियंत्रण रेषेपलीकडील पाकव्याप्त काश्मीरमध्ये भारताने दहशतवाद्यांच्या तळांवर गेल्या आठवड्यात केलेल्या सर्जिकल स्ट्राइकबाबत भारतात शंका व्यक्त होत असली, तरी असे स्ट्राइक्स झाले होते, असे पाकव्याप्त काश्मीरमधील जनतेनेच नव्हे, तर तेथील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यानेही मान्य केले आहे. किंबहुना, स्ट्राइक्सच्या वृत्ताला त्यांनीच दुजोरा दिला आहे. भारतीय लष्करानेही स्ट्राइक्सचे व्हिडीओ फुटेज केंद्राकडे सादर केले असून, ते जारी करण्यास हरकत नसल्याचे म्हटले आहे.पाकव्याप्त काश्मीरमध्ये भारताने स्ट्राइक्स केले नाहीत, असा दावा करीत असतानाच, लिपी, भिंबेर भागातील पोलीस अधीक्षकांनी आपल्या भागात दहशतवादी तळांवर हल्ले झाले आणि त्यात किमान १२ दहशतवादी ठार झाले, असे स्पष्ट केले आहे. पाकव्याप्त काश्मीरमध्ये अन्यत्र झालेल्या हल्ल्यात ठार झालेल्या सहा दहशतवाद्यांचे मृतदेह ट्रकमध्ये घालून दुसरीकडे नेण्यात आले आणि अज्ञात ठिकाणी पुरले, असे तेथील रहिवाशांनी सांगितले आहे. २९ सप्टेंबर उजाडायच्या आधी झालेल्या या हल्ल्यानंतर उडालेल्या चकमकीत ठार झालेल्यांचे मृतदेह अज्ञात ठिकाणी पुरण्यासाठी ट्रक्समध्ये कसे भरून नेण्यात आले, याचे वर्णन रहिवाशांनी केले. हल्ल्यामुळे थोडा वेळच, पण जोरदार गोळीबार झाल्याचे व त्यात जिहादींना राहण्यासाठी बनविलेल्या तात्पुरत्या इमारतीं कशा नाहीशा झाल्या, याचे वर्णन या साक्षीदारांनी केले. एका इंग्रजी दैनिकाने त्या रहिवाशांशी बोलून हे वृत्त दिले आहे. एका इंग्रजी वृत्तवाहिनीच्या वार्ताहराने लिपी, भिंबेर भाग जिथे आहे, त्या मिरपूरचे पोलीस अधीक्षक गुलाम अकबर यांचे स्टिंग आॅपरेशन केले. इंग्रजी वृत्तवाहिनीच्या वार्ताहराने आपण पोलीस महानिरीक्षक मुश्ताक बोलतोय, असे सांगून, अधीक्षक गुलाम अकबर यांच्याकडून ‘सर्जिकल स्ट्राइक्स’ची सविस्तर माहिती घेतली.केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीआधी भारतीय लष्करातर्फे सर्जिकल स्ट्राइक्सचा व्हिडीओ केंद्राला सादर करण्यात आला. तो संपादित स्वरूपात सर्वांसाठी खुला करावा, त्यामुळे शंका उपस्थित करणाऱ्यांचे, तसेच पाकिस्तानचे तोंड बंद होईल, असे भाजपाचे नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी म्हटले आहे. मात्र, भाजपा नेत्यांनी आपले तोंड बंद ठेवावे, अशा सूचना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्या आहेत.या सर्जिकल स्ट्राइकमध्ये कोणत्या ठिकाणांना लक्ष्य करण्यात आले होते, याचा तपशीलही त्यांनी दिला. भारत आणि पाकिस्तानने मात्र, या ठिकाणांची माहिती जाहीर केलेली नाही. प्रत्यक्ष साक्षीदार आणि गुप्तचर खात्याकडील माहितीच्या आधारे या कारवाईत किमान ३८ व कमाल ५० जण ठार झाले आहेत. याशिवाय पाकचे पाच सैनिक ठार व ९ जखमी झाल्याचे पोलीस अधीक्षकांनी मान्य केले.आम्हाला शांतता हवी : पाकिस्तानला युद्ध नव्हे, तर शांतता हवी आहे. भारताशी चर्चा करून काश्मीरसह सर्व प्रश्न सोडविण्यास आमची तयारी आहे. मात्र, पाकिस्तान धमक्यांना जुमानणार नाही. राष्ट्रीय सुरक्षा धोक्यात आल्यास, तुल्यबळ प्रत्युत्तर देऊन देशाचे रक्षण करण्यास पाकिस्तानची सैन्यदले व जनता तत्पर आहे. - नवाज शरीफ, पंतप्रधान, पाकिस्तानआपल्या भागांत १२ दहशतवाद्यांना भारतीय कमांडोजनी ठार मारल्याचे सांगितले. त्या दहशतवाद्यांचे मृतदेह नंतर अन्यत्र नेण्यात आले. ते कुठे नेले, हे आपणास माहीत नाही. बहुधा त्यांच्या गावाला पाठवण्यात आले असावेत, असेही पोलीस अधीक्षकाने सांगितले.