शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
2
Video: पाहुणचाराचा 'गोडवा'! श्रद्धा कपूरने घरच्या पुरणपोळीने केलं इन्स्टाग्रामच्या CEOचं स्वागत
3
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
4
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
5
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
6
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
7
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
8
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
9
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
10
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
11
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
12
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 
13
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
14
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?
15
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र
16
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
17
लग्न ठरलं, साखरपुडा झाला, शरीरसंबंधही ठेवले, त्यानंतर... मुंबई इंडियन्सकडून खेळलेल्या खेळाडूवर गंभीर आरोप  
18
पहलगाममधील हल्ल्याचं निमित्त, पूजा करायची असल्याचे सांगून पुजाऱ्याला गंडा, बँक खातं केलं साफ     
19
“जातनिहाय जनगणनेचा मुद्दाही सुप्रीम कोर्टात जाईल, १० वर्षे तरी...”; वकिलांनी कायदाच सांगितला
20
OLA Electric ची डोकेदुखी वाढली, इनसाइडर ट्रेडिंग प्रकरणी SEBI कडून तपास; प्रकरण काय?

पाकिस्तान पडले तोंडघशी!

By admin | Updated: October 6, 2016 05:57 IST

नियंत्रण रेषेपलीकडील पाकव्याप्त काश्मीरमध्ये भारताने दहशतवाद्यांच्या तळांवर गेल्या आठवड्यात केलेल्या सर्जिकल स्ट्राइकबाबत भारतात शंका व्यक्त होत असली

नवी दिल्ली : नियंत्रण रेषेपलीकडील पाकव्याप्त काश्मीरमध्ये भारताने दहशतवाद्यांच्या तळांवर गेल्या आठवड्यात केलेल्या सर्जिकल स्ट्राइकबाबत भारतात शंका व्यक्त होत असली, तरी असे स्ट्राइक्स झाले होते, असे पाकव्याप्त काश्मीरमधील जनतेनेच नव्हे, तर तेथील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यानेही मान्य केले आहे. किंबहुना, स्ट्राइक्सच्या वृत्ताला त्यांनीच दुजोरा दिला आहे. भारतीय लष्करानेही स्ट्राइक्सचे व्हिडीओ फुटेज केंद्राकडे सादर केले असून, ते जारी करण्यास हरकत नसल्याचे म्हटले आहे.पाकव्याप्त काश्मीरमध्ये भारताने स्ट्राइक्स केले नाहीत, असा दावा करीत असतानाच, लिपी, भिंबेर भागातील पोलीस अधीक्षकांनी आपल्या भागात दहशतवादी तळांवर हल्ले झाले आणि त्यात किमान १२ दहशतवादी ठार झाले, असे स्पष्ट केले आहे. पाकव्याप्त काश्मीरमध्ये अन्यत्र झालेल्या हल्ल्यात ठार झालेल्या सहा दहशतवाद्यांचे मृतदेह ट्रकमध्ये घालून दुसरीकडे नेण्यात आले आणि अज्ञात ठिकाणी पुरले, असे तेथील रहिवाशांनी सांगितले आहे. २९ सप्टेंबर उजाडायच्या आधी झालेल्या या हल्ल्यानंतर उडालेल्या चकमकीत ठार झालेल्यांचे मृतदेह अज्ञात ठिकाणी पुरण्यासाठी ट्रक्समध्ये कसे भरून नेण्यात आले, याचे वर्णन रहिवाशांनी केले. हल्ल्यामुळे थोडा वेळच, पण जोरदार गोळीबार झाल्याचे व त्यात जिहादींना राहण्यासाठी बनविलेल्या तात्पुरत्या इमारतीं कशा नाहीशा झाल्या, याचे वर्णन या साक्षीदारांनी केले. एका इंग्रजी दैनिकाने त्या रहिवाशांशी बोलून हे वृत्त दिले आहे. एका इंग्रजी वृत्तवाहिनीच्या वार्ताहराने लिपी, भिंबेर भाग जिथे आहे, त्या मिरपूरचे पोलीस अधीक्षक गुलाम अकबर यांचे स्टिंग आॅपरेशन केले. इंग्रजी वृत्तवाहिनीच्या वार्ताहराने आपण पोलीस महानिरीक्षक मुश्ताक बोलतोय, असे सांगून, अधीक्षक गुलाम अकबर यांच्याकडून ‘सर्जिकल स्ट्राइक्स’ची सविस्तर माहिती घेतली.केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीआधी भारतीय लष्करातर्फे सर्जिकल स्ट्राइक्सचा व्हिडीओ केंद्राला सादर करण्यात आला. तो संपादित स्वरूपात सर्वांसाठी खुला करावा, त्यामुळे शंका उपस्थित करणाऱ्यांचे, तसेच पाकिस्तानचे तोंड बंद होईल, असे भाजपाचे नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी म्हटले आहे. मात्र, भाजपा नेत्यांनी आपले तोंड बंद ठेवावे, अशा सूचना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्या आहेत.या सर्जिकल स्ट्राइकमध्ये कोणत्या ठिकाणांना लक्ष्य करण्यात आले होते, याचा तपशीलही त्यांनी दिला. भारत आणि पाकिस्तानने मात्र, या ठिकाणांची माहिती जाहीर केलेली नाही. प्रत्यक्ष साक्षीदार आणि गुप्तचर खात्याकडील माहितीच्या आधारे या कारवाईत किमान ३८ व कमाल ५० जण ठार झाले आहेत. याशिवाय पाकचे पाच सैनिक ठार व ९ जखमी झाल्याचे पोलीस अधीक्षकांनी मान्य केले.आम्हाला शांतता हवी : पाकिस्तानला युद्ध नव्हे, तर शांतता हवी आहे. भारताशी चर्चा करून काश्मीरसह सर्व प्रश्न सोडविण्यास आमची तयारी आहे. मात्र, पाकिस्तान धमक्यांना जुमानणार नाही. राष्ट्रीय सुरक्षा धोक्यात आल्यास, तुल्यबळ प्रत्युत्तर देऊन देशाचे रक्षण करण्यास पाकिस्तानची सैन्यदले व जनता तत्पर आहे. - नवाज शरीफ, पंतप्रधान, पाकिस्तानआपल्या भागांत १२ दहशतवाद्यांना भारतीय कमांडोजनी ठार मारल्याचे सांगितले. त्या दहशतवाद्यांचे मृतदेह नंतर अन्यत्र नेण्यात आले. ते कुठे नेले, हे आपणास माहीत नाही. बहुधा त्यांच्या गावाला पाठवण्यात आले असावेत, असेही पोलीस अधीक्षकाने सांगितले.