शहरं
Join us  
Trending Stories
1
अबब! ३५ लाख जप्त, २० लाखांची रोकड जाळली; सरकारी इंजिनिअरचा 'काळा' प्रताप उघड, नेमकं काय घडलं?
2
ऑनलाइन फॅन्टसी गेमिंगवर अखेर बंदी; नवीन विधेयकावर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची मोहोर
3
भारतावरील 'टॅरिफ'वरून' ट्रम्प यांच्यावर टीका केली, माजी अमेरिकन राष्ट्रीय सुरक्षा सल्लागाराच्या घरावर एफबीआयचा छापा
4
'पाकिस्तान अजूनही डंपर, असीम मुनीरनेही कबूल केले', राजनाथ सिंह यांनी मर्सिडीजच्या विधानाची खिल्ली उडवली
5
"मुख्यमंत्र्यांनी मला फोन केला होता, मात्र मी त्यांना..."; फडणवीसांसोबत शरद पवारांचा काय झाला संवाद?
6
Video: सुप्रीम कोर्टाचा निकाल लागला अन् नाशिकमधला राडा समोर आला; कुत्र्याने बिबट्यावरच केला हल्ला
7
लवकरच ममता बॅनर्जींचे सरकार जाणार अन्..; कोलकात्यातून PM मोदींचा हल्लाबोल
8
पुणे हादरले! 'तुला किंमत चुकवावी लागेल', मानलेल्या बहिणीच्या प्रियकरानेच केली इंजिनिअर सौरभची हत्या
9
बीडमध्ये खळबळ! सरकारी वकिलाने कोर्टातच संपवले आयुष्य, न्यायाधीशासह दोघांवर गुन्हा; प्रकरण काय?
10
चीनची मोठी तयारी! या देशाविरोधात लढणार,समुद्रात १४ लढाऊ जहाजे उतरवले; लष्कर हाय अलर्टवर
11
६० कोटींचा सायबर फ्रॉड, ९४३ बँक खात्यांचा वापर; मुंबई पोलिसांनी १२ आरोपींना घेतले ताब्यात
12
संपूर्ण देशाची फेव्हरिट बनली ही ₹9 लाखाहून कमी किंमतीची SUV; नेक्सन, पंच, फ्रोंक्सला टाकलं मागे; विक्री घटूनही ठरली नं. 1
13
विवाह नोंदणी कार्यालयात हायव्होल्टेज ड्रामा; मेहुणीसोबत दाजी करणार होता लग्न, तितक्यात...
14
भारतीय ड्रायव्हर्संना डोनाल्ड ट्रम्प यांचा झटका! वर्कर व्हिसा मिळणार नाही, अमेरिकेतील नोकऱ्या जाणार
15
या मल्टीबॅगर स्टॉकला मिळालं 499.95 कोटींचं काम, रेल्वे सेक्टरशी संबंधित आहे नवी वर्क ऑर्डर; जाणून घ्या सविस्तर
16
Pune: हनी ट्रॅप प्रकरणातील प्रफुल लोढाचे आणखी एक कांड; पिंपरी पोलिसांनी केली अटक; महिलेच्या तक्रारीत काय?
17
जोधपूरला जाणारे एअर इंडियाचे विमान अचानक परतले, मुंबई विमानतळावर गोंधळ! नेमकं झालं काय?
18
'कॅस्पियन समुद्र' गायब होतोय का? पाच वर्षात ३ फूट पाणी कमी झालं; 'या' ५ देशांना धोका, कारण...
19
डी-गँगच्या 'ड्रग्ज फॅक्टरी'वर धाड, 92 कोटींचे एमडी ड्रग्ज जप्त, मुंबई-ठाण्याचंही कनेक्शन
20
Rain Alert : गणपतीच्या आगमनाला पावसाचा 'ताशा'! पुढचे काही दिवस 'मुसळधार' कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना इशारा?

संयुक्त राष्ट्रांच्या खुलाशामुळे पाकिस्तान पुन्हा पडला तोंडघशी

By admin | Updated: May 25, 2017 13:24 IST

आंतरराष्ट्रीय कोर्ट त्यापाठोपाठ नियंत्रण रेषेवर भारताकडून मात खाल्ल्यानंतर संयुक्त राष्ट्राने पुन्हा एकदा पाकिस्तानला सणसणीत चपराक लगावली आहे.

ऑनलाइन लोकमत 

नवी दिल्ली, दि. 25 - आंतरराष्ट्रीय कोर्ट त्यापाठोपाठ नियंत्रण रेषेवर भारताकडून मात खाल्ल्यानंतर संयुक्त राष्ट्रांनी पुन्हा एकदा पाकिस्तानला सणसणीत चपराक लगावली आहे. नियंत्रण रेषेजवळ संयुक्त राष्ट्रांच्या वाहनावर भारतीय सैन्याने गोळीबार केल्याचा पाकिस्तानचा दावा संयुक्त राष्ट्रांनीच फेटाळून लावला आहे. त्यामुळे खोटेपणा करणारा पाकिस्तान पुन्हा एकदा तोंडघशी पडला आहे. 
 
खंजर सेक्टरमध्ये संयुक्त राष्ट्रांच्या निरीक्षकांच्या वाहनाला भारतीय सैन्याने लक्ष्य केल्याचे वृत्त  पाकिस्तानी माध्यमांनी दिले होते. पाकिस्तानी लष्कराच्या मीडिया विंगच्या हवाल्याने त्यांनी ही बातमी दिली होती. संयुक्त राष्ट्रांच्या निरीक्षकांना लक्ष्य करुन भारताने शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. पाकिस्ताननेही लगेचच या गोळीबाराला चोख प्रत्युत्तर दिले अशी बातमी पाकिस्तानी माध्यमांमध्ये सुरु होती. 
 
त्यावर बुधवारी रात्री संयुक्त राष्ट्रांच्या प्रवक्त्याने पत्रकारपरिषद घेऊन या बातमीचे खंडन केले. प्रत्यक्षात असे काही घडले नसल्याचे त्यांनी सांगितले. भीमबेर जिल्ह्यात संयुक्त राष्ट्राचे निरीक्षक गेले होते. त्यावेळी पाकिस्तानी लष्कराची वाहनेसुद्धा सोबत होती. यावेळी परिसरात गोळीबाराचे आवाज ऐकू आले. खास संयुक्त राष्ट्राच्या प्रतिनिधींना लक्ष्य करण्याच्या हेतूने हा गोळीबार झाल्याचा कुठलाही पुरावा नाही. कोणीही या गोळीबारात जखमी झालेले नाही असे संयुक्त राष्ट्राच्या प्रवक्त्याने सांगितले. संयुक्त राष्ट्राच्या या खुलाशामुळे पाकिस्तान पुन्हा एकदा तोंडघशी पडला आहे. 
 
भारतीय सैन्याने मंगळवारी दुपारी नौशेरा सेक्टरमधील पाकिस्तानी लष्कराच्या चौक्या उद्ध्वस्त केल्याचा व्हिडीओ सार्वजनिक केल्यापासून पाकिस्तानचा जळफळाट सुरु आहे. भारतासमोर नाचक्की झाल्याने पाकिस्तानने खोटा कांगावा सुरु केला आहे. काल पाकिस्तानी वायू दलाच्या विमानांनी सियाचीनमध्ये भारतीय सीमेजवळून उड्डाण करुन कुरापत काढण्याचा प्रयत्न केला तसेच आपणही भारतीय चौक्या कशा नष्ट केल्या त्याचा बनावट व्हिडीओ जारी केला. एकूणच पाकिस्तानच्या या सर्व कृती त्यांची अस्वस्थतता दाखवून देणा-या आहेत.  
 
संबंध बिघडण्याची शक्यता
भारतीय लष्कराने पाक चौक्यांवर केलेल्या हल्ल्यानंतर दोन देशांमध्ये तणाव निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर पाकला आंतरराष्ट्रीय स्तरावर वेगळे पाडून त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्याचा विचार भारत करत आहे, अशी माहिती संरक्षण गुप्तचर विभागाचे संचालक ले. जनरल विन्सेंट स्टिवॉर्ट यांनी दिली.
 
भारतीय लष्कराने पाक चौक्यांवर केलेल्या हल्ल्यानंतर दोन देशांमध्ये तणाव निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर पाकला आंतरराष्ट्रीय स्तरावर वेगळे पाडून त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्याचा विचार भारत करत आहे, अशी माहिती संरक्षण गुप्तचर विभागाचे संचालक ले. जनरल विन्सेंट स्टिवॉर्ट यांनी दिली.