शहरं
Join us  
Trending Stories
1
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
2
आजचे राशीभविष्य: बुधवार १३ ऑगस्ट २०२५; बोलण्यावर ताबा ठेवा, खर्च वाढणार नाही याकडे लक्ष द्या, कामात यश मिळेल
3
उद्धवसेना, शरद पवार गटाला खिंडार; पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा अजित पवार गटात प्रवेश
4
पालिकांमध्ये 'एक वॉर्ड-एक नगरसेवक' पद्धत लागू करा; मनसेची राज्य निवडणूक आयुक्तांकडे मागणी
5
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
6
सुवर्णयुगाचा अंत! 'देवदास' फेम बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रीचं निधन, सिनेसृष्टीवर शोककळा
7
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
8
गणेश मंडळे दंड भरणार नाही, खड्यावर सरकारलाच दंड लावा
9
आलिशान कारमधून ३१ कोटींची ड्रग्ज तस्करी; ठाणे पालिकेचा लोगो लावून कारमधून सुरू होता कारभार
10
अग्रलेख: भटक्यांचा 'अनाथाश्रम'; कल्पना यशस्वी झाली तर मोकळेपणाने करता येईल संचार
11
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
12
आधार कार्ड, मतदार ओळखपत्र नागरिकत्वाचा पुरावा नाहीत! मतदार यादीतून वगळण्याचा अधिकार निवडणूक आयोगालाच
13
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
14
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
15
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
16
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
17
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
18
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
19
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
20
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं

भारताबरोबरचा व्यापार थांबवण्याच्या प्रयत्नात पाकिस्तान

By admin | Updated: October 28, 2016 14:07 IST

भारताबरोबरचा व्यापार थांबण्याचा विचार पाकिस्तान करत असल्याचे वृत्त पाकिस्तानी वृत्तपत्र डॉनने दिले आहे.

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 28 - भारत आणि पाकिस्तानमधील तणाव दिवसेंदिवस अधिकच वाढत आहे. नियंत्रण रेषेवर दोन्ही देशांच्या सुरक्षा दलांकडून मोठ्या प्रमाणावर गोळीबार सुरू असतानाच आता या तणावाचा परिणाम दोन्ही देशांमधील व्यापारावर होताना दिसत असून, भारताबरोबरचा व्यापार थांबण्याचा विचार पाकिस्तान करत असल्याचे वृत्त पाकिस्तानी वृत्तपत्र डॉनने दिले आहे. 
 दोन्ही देशांमधील सध्याचे तणावाचे वातावरण पाहता भारतासोबतचा व्यापार थांबवण्याचा निर्णय घेण्यात येऊ शकतो, असे पाकिस्तानच्या मुख्य औद्योगिक संघनेने सांगितल्याचे या वृत्तात म्हटले आहे. पाकिस्तान चेंबर्स ऑफ कॉमर्स आणि उद्योग संघटनेच्या समुहाचे अध्यक्ष अब्दुल रौफ आलम म्हणाले, "उपखंडातील तणावाचे वातावरण पाहता पाकिस्तानी व्यपार समूह कुठलाही निर्णय एकत्रितपणे घेऊ शकतात. तसेच सध्याची स्थिती पाहता भारतासोबतचा व्यापार सुरू ठेवणे योग्य नाही."
(भारतीय चौक्यांवर पाकिस्तानचा भ्याड हल्ला) 
मात्र पाकिस्तानी व्यापाऱ्यांनी दिलेल्या या धमकीमुळे भारतावर परिणाम होण्याची शक्यता नाही. कारण दोन्ही देशांमधील व्यापार हा भारताच्या एकूण जागतिक व्यापाराच्या अर्ध्या टक्क्याहून कमी  आहे. "भारत आणि पाकिस्तानमध्ये होणारा व्यापार हा भारताच्या एकूण जागतिक व्यापाराच्या अर्ध्या टक्क्याहून कमी आहे," असे असोचेमचे महासचिव डी. एस. रावत यांनी म्हटले आहे.