शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
2
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
3
राज ठाकरे-उद्धव ठाकरे बैठक संपली, अडीच तास 'शिवतीर्थ'वर खलबतं; शिवसेना-मनसे युतीचा मुहूर्त ठरला?
4
युक्रेननंतर आता रशियाने पोलंडवर हल्ला केला? रशियन ड्रोनच्या प्रवेशामुळे नाटो देशांमध्ये घबराट
5
मागे धगधगतं संसद भवन अन् पुढ्यात Gen-Z आनंदोलनकर्त्याचे ठुमके! नेपाळमधील Viral Video
6
Ghibli चे दिवस गेले! Nano banana model/BANDAI-style ट्रेंडिंग इमेज ट्राय केली का? 'हा' घ्या Prompt
7
भारतीय क्रिकेटरने स्वत:च्या हानिमून ट्रिपला रिंकू सिंगलाही नेलं होतं सोबत, वाचा धमाल किस्सा
8
११ वर्षांच्या मुलीने असा लावला नेपाळमधील ओली सरकारला सुरुंग, तो अपघात घडला आणि....
9
Urban Company IPO लाँच, जबरदस्त ग्रोथ आणि अधिक मूल्यांकन; काय आहे अधिक माहिती, गुंतवणूक करावी का? 
10
नेपाळमध्ये निदर्शने, सत्तापालट सुरू असतानाच आता पाकिस्तानच्या या प्रांतात बंद, जनता संतापली
11
'सरकारचे कौतुक, पण धोका दिल्यास सोडणार नाही': मनोज जरांगेंचा सरकारला थेट इशारा
12
भारताबाबत ट्रेड डीलवर ट्रम्प यांची एक पोस्ट आणि 'या' शेअर्समध्ये सुस्साट तेजी; खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
13
भारत-नेपाळ सीमेवरून घुसखोरीचा प्रयत्न; नेपाळच्या तुरुंगातून पळालेल्या ५ कैद्यांचा अटक
14
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंसह २ प्रमुख नेते 'शिवतीर्थ'वर दाखल; मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची घेतली भेट
15
सुलतानी संकटाचे बळी! एका महिन्यात १०१ शेतकऱ्यांची मृत्यूला मिठी; दोन जिल्ह्यांतच ६७ घटना
16
"सामान्य भक्तांना धक्काबुक्की, मारहाण हाच त्यांचा खरा चेहरा...", 'लालबागचा राजा' मंडळाला मराठी अभिनेत्रीच्या नवऱ्याने सुनावलं
17
संकष्ट चतुर्थी 2025: पितृपक्षातील संकष्टीला चंद्रोदय कधी? पहा गणेश पूजन विधी आणि शुभ मुहूर्त
18
अ‍ॅपलने आयफोन १६ चे दोन मॉडेल बंद करून टाकले; किंमत कमी झाली म्हणून घ्यायला जाल तर...
19
सीबीआयपाठोपाठ आता ईडीचीही एन्ट्री! २,९२९ कोटी रुपयांच्या बँक फसवणुकीप्रकरणी अनिल अंबानींवर कारवाई
20
जगदीप धनखड यांना किती मते मिळाली होती?; उपराष्ट्रपती निवडणुकीत विरोधकांची मते यंदा दुपटीनं वाढली

पाक व्याप्त काश्मीर हा भारताचाच भाग !

By admin | Updated: August 13, 2016 06:18 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकव्याप्त काश्मीर हा भारताचाच भाग आहे, असे शुक्रवारी सर्वपक्षीय बैठकीत ठासून सांगून जम्मू-काश्मीर प्रश्नाला नवे वळण दिले. पाकव्याप्त काश्मीर

- हरीश गुप्ता, नवी दिल्ली

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकव्याप्त काश्मीर हा भारताचाच भाग आहे, असे शुक्रवारी सर्वपक्षीय बैठकीत ठासून सांगून जम्मू-काश्मीर प्रश्नाला नवे वळण दिले. पाकव्याप्त काश्मीर आणि बलुचिस्तानात नागरिकांवर पाकिस्ताकडून होत असलेले अत्याचार भारतीयांनी जगासमोर आणावेत, असे मोदी म्हणाले.मोदी म्हणाले की जम्मू आणि काश्मीर हा तीन नव्हे तर चार प्रांतांचा मिळून बनला आहे. पाकव्याप्त काश्मीर हा भारताचाच भाग आहे. पाकव्याप्त काश्मीर हा भारताचा भाग आहे असा पहिला उल्लेख इतर कोणी नाही तर पीडीपीचे खासदार मुज्जफर बेग यांनी सर्व पक्षीय बैठकीत केला होता. बेग म्हणाले की, पाकव्याप्त काश्मी भारताचाच भाग आहे. त्यामुळे कोणीही पाकव्याप्त काश्मीर कोणाच्याही हाती जाता कामा नये. डोळ्यांत अंजन घालणारे भाषण- या परिस्थितीत सर्वपक्षीय शिष्टमंडळ काश्मीरमध्ये न पाठविण्याचा निर्णय बैठकीत झाला. तेथील सरकारशी चर्चा करूनच त्याची वेळ आणि तारीख ठरविली जाईल. - मुज्जफर बेग यांचे भाषण बैठकीत डोळ््यांत अंजन घालणारे ठरले. ते म्हणाले खोऱ्यातील परिस्थितीत आमुलाग्र बदल झालेला आहे. - सीताराम येचुरी (माकप) यांनी मोदी यांना त्यांनी पंतप्रधान नवाज शरीफ यांच्याशी असलेल्या ‘हॉटलाईन’चा वापर करून काही तरी आवश्यक करावे, असे म्हटले.काश्मीरमध्ये पॅलेट् गन्सचा वापर थांबवा खोऱ्यात शांतता पुन:स्थापन करण्यासाठी सगळ््या पक्षांनी सरकारला पाठिंबा दिला. परंतु निदर्शने मोडून काढण्यासाठी होत असलेला पॅलेट् गन्सचा वापर थांबविण्यात यावा, असे मत सर्वांनीच व्यक्त केले. वातावरण पोषक नाही दोन नेत्यांनी चर्चा फुटीरवाद्यांसह सर्वांशी चर्चा करण्याची सूचना केली. आर्म्ड फोर्सेस अ‍ॅक्ट मागे घेणे कितपत परिणामकारक ठरते हे बघण्यासाठी एखाद्या छोट्याशा नागरी वसाहतीतून तो मागे घ्यावा अशी सूचना केली. मात्र अर्थमंत्री अरुण जेटली म्हणाले की ही वेळ तो उपाय करण्यास पोषक नाही. मी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांच्याशी बोललो. तेथील परिस्थिती गंभीर आहे. आधी लोक काश्मिरी ओळखीबद्दल बोलत. आता तरुण मुले इसिसकडे चालली आहेत. हुरियतच्या हातातून नेतृत्व निसटून गेले आहे. त्यामुळे तेथील तापलेली परिस्थिती निवळण्यासाठी उपाय आवश्यक आहे.- प्रफुल्ल पटेल, राष्ट्रवादीआपण काश्मिरी जनतेची काळजी करणारे आहोत हे केंद्र सरकारने दाखविणे आवश्यक आहे. - मनमोहनसिंग परिस्थितीत सुधारणा झाली व सरकारने पावले उचलली तरच आमचे समाधान होईल. - गुलाम नबी आझाद