शहरं
Join us  
Trending Stories
1
ब्रिटनमध्ये 'नो एन्ट्री' : व्हिसाचे नियम कडक; ६७ टक्क्यांची मोठी कपात, आयटी, हेल्थ प्रोफेशनल्सना मोठा झटका!
2
आजचे राशीभविष्य, १७ डिसेंबर २०२५: चांगली बातमी मिळेल,शक्यतो आज वाद टाळावेत
3
'गांधीजी का ये अपमान नहीं सहेगा हिंदुस्तान'; विरोधकांचा तीव्र आक्षेप, खासदारांची निदर्शने
4
अनंत अंबांनींच्या वनताराला भेटीने मेस्सी आनंदी; प्राण्यांची काळजी घेण्याची पद्धत पाहून प्रभावी
5
धुक्यात थांबला होता 'काळ' : ७ बस, ३ कार एकमेकांना धडकून १३ जण खाक
6
दुचाकी, ट्रॅक्टरसह साडेतीन एकर शेतीही विकली, तरीही व्याजाचा डोंगर वाढताच... सावकाराचा तगादा; शेतकऱ्याने विकली किडनी
7
नॅशनल हेराल्ड केस : ईडीला धक्का; राहुल, सोनिया गांधी यांना दिलासा
8
एकच उच्चशिक्षणासाठी नियामक मंडळ असेल तर... मूल्यांकन होईल 'डिजिटल' आणि पारदर्शक!
9
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉने लिलाव सुरू असताना केलेली मोठी चूक, नंतर करावं लागलं 'हे' काम
10
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
11
VIDEO : अनसोल्ड परदेशी खेळाडूसाठी काव्या मारननं पर्समधून १३ कोटी काढले; संजीव गोएंका बघतच राहिले!
12
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
13
मेस्सीची 'वनतारा भेट'! महाआरती, शिवाभिषेक, बाप्पाचरणी नतमस्तक अन् वाघ-सिंहाशी धमाल (Photos)
14
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
15
स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा
16
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
17
पतसंस्था अध्यक्षाला ग्राहक आयोगाने सुनावली दोन वर्षांच्या कारावास, दंडाची शिक्षा
18
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
19
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
20
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
Daily Top 2Weekly Top 5

पाक व्याप्त काश्मीर हा भारताचाच भाग !

By admin | Updated: August 13, 2016 06:18 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकव्याप्त काश्मीर हा भारताचाच भाग आहे, असे शुक्रवारी सर्वपक्षीय बैठकीत ठासून सांगून जम्मू-काश्मीर प्रश्नाला नवे वळण दिले. पाकव्याप्त काश्मीर

- हरीश गुप्ता, नवी दिल्ली

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकव्याप्त काश्मीर हा भारताचाच भाग आहे, असे शुक्रवारी सर्वपक्षीय बैठकीत ठासून सांगून जम्मू-काश्मीर प्रश्नाला नवे वळण दिले. पाकव्याप्त काश्मीर आणि बलुचिस्तानात नागरिकांवर पाकिस्ताकडून होत असलेले अत्याचार भारतीयांनी जगासमोर आणावेत, असे मोदी म्हणाले.मोदी म्हणाले की जम्मू आणि काश्मीर हा तीन नव्हे तर चार प्रांतांचा मिळून बनला आहे. पाकव्याप्त काश्मीर हा भारताचाच भाग आहे. पाकव्याप्त काश्मीर हा भारताचा भाग आहे असा पहिला उल्लेख इतर कोणी नाही तर पीडीपीचे खासदार मुज्जफर बेग यांनी सर्व पक्षीय बैठकीत केला होता. बेग म्हणाले की, पाकव्याप्त काश्मी भारताचाच भाग आहे. त्यामुळे कोणीही पाकव्याप्त काश्मीर कोणाच्याही हाती जाता कामा नये. डोळ्यांत अंजन घालणारे भाषण- या परिस्थितीत सर्वपक्षीय शिष्टमंडळ काश्मीरमध्ये न पाठविण्याचा निर्णय बैठकीत झाला. तेथील सरकारशी चर्चा करूनच त्याची वेळ आणि तारीख ठरविली जाईल. - मुज्जफर बेग यांचे भाषण बैठकीत डोळ््यांत अंजन घालणारे ठरले. ते म्हणाले खोऱ्यातील परिस्थितीत आमुलाग्र बदल झालेला आहे. - सीताराम येचुरी (माकप) यांनी मोदी यांना त्यांनी पंतप्रधान नवाज शरीफ यांच्याशी असलेल्या ‘हॉटलाईन’चा वापर करून काही तरी आवश्यक करावे, असे म्हटले.काश्मीरमध्ये पॅलेट् गन्सचा वापर थांबवा खोऱ्यात शांतता पुन:स्थापन करण्यासाठी सगळ््या पक्षांनी सरकारला पाठिंबा दिला. परंतु निदर्शने मोडून काढण्यासाठी होत असलेला पॅलेट् गन्सचा वापर थांबविण्यात यावा, असे मत सर्वांनीच व्यक्त केले. वातावरण पोषक नाही दोन नेत्यांनी चर्चा फुटीरवाद्यांसह सर्वांशी चर्चा करण्याची सूचना केली. आर्म्ड फोर्सेस अ‍ॅक्ट मागे घेणे कितपत परिणामकारक ठरते हे बघण्यासाठी एखाद्या छोट्याशा नागरी वसाहतीतून तो मागे घ्यावा अशी सूचना केली. मात्र अर्थमंत्री अरुण जेटली म्हणाले की ही वेळ तो उपाय करण्यास पोषक नाही. मी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांच्याशी बोललो. तेथील परिस्थिती गंभीर आहे. आधी लोक काश्मिरी ओळखीबद्दल बोलत. आता तरुण मुले इसिसकडे चालली आहेत. हुरियतच्या हातातून नेतृत्व निसटून गेले आहे. त्यामुळे तेथील तापलेली परिस्थिती निवळण्यासाठी उपाय आवश्यक आहे.- प्रफुल्ल पटेल, राष्ट्रवादीआपण काश्मिरी जनतेची काळजी करणारे आहोत हे केंद्र सरकारने दाखविणे आवश्यक आहे. - मनमोहनसिंग परिस्थितीत सुधारणा झाली व सरकारने पावले उचलली तरच आमचे समाधान होईल. - गुलाम नबी आझाद