शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

पाकच्या कुरापती कायम; दोन जवानांना वीरमरण

By admin | Updated: July 13, 2017 05:57 IST

हिजबुल मुजाहिद्दिनच्या तीन अतिरेक्यांचा खात्मा केल्यानंतर पाकिस्तानने बुधवारी दुपारी पुन्हा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले.

श्रीनगर : अमरनाथ यात्रेकरूंवरील हल्ल्यानंतर काश्मीरमधील सुरक्षा प्रचंड प्रमाणात वाढवल्यानंतर आणि हिजबुल मुजाहिद्दिनच्या तीन अतिरेक्यांचा खात्मा केल्यानंतर पाकिस्तानने बुधवारी दुपारी पुन्हा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. पाकिस्तानने केलेल्या बेछूट गोळीबारात भारताच्या दोन जवानांना वीरमरण प्राप्त झाले.कुपवाडा जिल्ह्याच्या केरन क्षेत्रात पाकिस्तानी लष्कराने जोरदार गोळीबार व तोफांचा मारा केला. यात भारताचे दोन जवान हुतात्मा झाले असल्याची माहिती लष्कराने दिली असली तरी त्या दोघांची नावे मात्र जाहीर करण्यास नकार दिला आहे. भारतीय जवानांचे गस्ती पथक व पाकिस्तानी लष्कर यांच्यात चकमक होऊ न, हे जवान शहीद झाल्याचे आधी सांगण्यात येत होते. केरन क्षेत्रातील फुरकिया गली भागात हा गोळीबार झाला. तो पाकिस्तानी लष्कराने केला की पाकच्या बॉर्डर अ‍ॅक्शन टीमने (बॅट) केला, हे स्पष्ट झालेले नाही. मात्र फुरकिया गली भागातून पाकिस्तानी दहशतवादी नेहमी घुसण्याचा प्रयत्न करीत असतात आणि त्या वेळी बॅटतर्फे गोळीबार केला जातो. आजही तसे घडले का, हे सांगण्यात आलेले नाही. (वृत्तसंस्था)>आझादीच्या घोषणाहा प्रकार घडण्याच्या काही तास आधीच भारतीय सुरक्षा दलांनी बडगाम जिल्ह्यात तीन दहशतवाद्यांचा खातमा केला होता. त्यातील एका दहशतवाद्याच्या अंत्ययात्रेच्या वेळी जमलेल्या हजारो लोकांनी काश्मीरच्या आझादीच्या घोषणा दिल्या आणि सुरक्षा दलाच्या जवानांवर दगडफेकही केली. >राहुल यांचे टीकास्त्र : नवी दिल्ली : देशाची सुरक्षा व्यवस्था धोक्यात आलेली असताना भाजपा एका व्यक्तीच्या प्रतिमा संवर्धनात मग्न आहे. अमरनाथ यात्रेकरूंवर झालेला दहशतवादी हल्ला आत्ममग्नतेचे ढळढळीत उदाहरण आहे, असा हल्ला काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केला. सुरक्षेतील चूक मान्य होणारी नाही. मोदी यांना ही जबाबदारी घ्यावी लागेल व पुन्हा असे घडणार नाही याची व्यवस्था करावी लागेल, असे गांधी म्हणाले.ते म्हणाले की, गुप्तचर यंत्रणांनी केंद्र सरकारला ईदनंतर मोठ्या दहशतवादी हल्ल्याची तयारी सुरू आहे व अमरनाथ यात्रा हे त्यांचे लक्ष्य आहे, असे आधीच सांगितले होते. असे असतानाही सरकारने सुरक्षेची पूर्ण उपाययोजना का केली नाही?मोदी यांच्या वैयक्तिक लाभापायी निष्पाप भारतीयांचे बलिदान सुरू आहे. भाजपाने क्षणिक राजकीय लाभासाठी पीडीपीशी जी युती केली, त्याची मोठीच किंमत देश मोजत आहे.>भाजपाचा प्रतिहल्लाकाश्मीरमधील दहशतवादाची समस्या ही नेहरू-गांधी परिवाराने निर्माण केली आहे, असा प्रतिहल्ला केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी राहुल गांधी यांच्यावर चढवला. परदेशातून आल्यानंतर राहुल यांनी दहशतवाद्यांचा नव्हे, तर नरेंद्र मोदी यांचा निषेध केला, यातूनच सारेकाही स्पष्ट झाले आहे, असेही त्यांनी बोलून दाखवले.>काश्मीरमधील अतिरेक्यांना आम्ही संपवत आणले असून, येथील दहशतवाद लवकरच पूर्णपणे संपेल, असा दावा पंतप्रधान कार्यालयातील राज्यमंत्री जीतेंद्र सिंग यांनी येथे केला.