शहरं
Join us  
Trending Stories
1
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
2
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
3
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
4
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
5
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
6
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
7
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
8
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
9
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
10
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
11
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
12
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
13
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
14
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
15
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
16
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
17
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
18
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
19
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
20
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
Daily Top 2Weekly Top 5

पाकच्या कुरापती कायम; दोन जवानांना वीरमरण

By admin | Updated: July 13, 2017 05:57 IST

हिजबुल मुजाहिद्दिनच्या तीन अतिरेक्यांचा खात्मा केल्यानंतर पाकिस्तानने बुधवारी दुपारी पुन्हा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले.

श्रीनगर : अमरनाथ यात्रेकरूंवरील हल्ल्यानंतर काश्मीरमधील सुरक्षा प्रचंड प्रमाणात वाढवल्यानंतर आणि हिजबुल मुजाहिद्दिनच्या तीन अतिरेक्यांचा खात्मा केल्यानंतर पाकिस्तानने बुधवारी दुपारी पुन्हा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. पाकिस्तानने केलेल्या बेछूट गोळीबारात भारताच्या दोन जवानांना वीरमरण प्राप्त झाले.कुपवाडा जिल्ह्याच्या केरन क्षेत्रात पाकिस्तानी लष्कराने जोरदार गोळीबार व तोफांचा मारा केला. यात भारताचे दोन जवान हुतात्मा झाले असल्याची माहिती लष्कराने दिली असली तरी त्या दोघांची नावे मात्र जाहीर करण्यास नकार दिला आहे. भारतीय जवानांचे गस्ती पथक व पाकिस्तानी लष्कर यांच्यात चकमक होऊ न, हे जवान शहीद झाल्याचे आधी सांगण्यात येत होते. केरन क्षेत्रातील फुरकिया गली भागात हा गोळीबार झाला. तो पाकिस्तानी लष्कराने केला की पाकच्या बॉर्डर अ‍ॅक्शन टीमने (बॅट) केला, हे स्पष्ट झालेले नाही. मात्र फुरकिया गली भागातून पाकिस्तानी दहशतवादी नेहमी घुसण्याचा प्रयत्न करीत असतात आणि त्या वेळी बॅटतर्फे गोळीबार केला जातो. आजही तसे घडले का, हे सांगण्यात आलेले नाही. (वृत्तसंस्था)>आझादीच्या घोषणाहा प्रकार घडण्याच्या काही तास आधीच भारतीय सुरक्षा दलांनी बडगाम जिल्ह्यात तीन दहशतवाद्यांचा खातमा केला होता. त्यातील एका दहशतवाद्याच्या अंत्ययात्रेच्या वेळी जमलेल्या हजारो लोकांनी काश्मीरच्या आझादीच्या घोषणा दिल्या आणि सुरक्षा दलाच्या जवानांवर दगडफेकही केली. >राहुल यांचे टीकास्त्र : नवी दिल्ली : देशाची सुरक्षा व्यवस्था धोक्यात आलेली असताना भाजपा एका व्यक्तीच्या प्रतिमा संवर्धनात मग्न आहे. अमरनाथ यात्रेकरूंवर झालेला दहशतवादी हल्ला आत्ममग्नतेचे ढळढळीत उदाहरण आहे, असा हल्ला काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केला. सुरक्षेतील चूक मान्य होणारी नाही. मोदी यांना ही जबाबदारी घ्यावी लागेल व पुन्हा असे घडणार नाही याची व्यवस्था करावी लागेल, असे गांधी म्हणाले.ते म्हणाले की, गुप्तचर यंत्रणांनी केंद्र सरकारला ईदनंतर मोठ्या दहशतवादी हल्ल्याची तयारी सुरू आहे व अमरनाथ यात्रा हे त्यांचे लक्ष्य आहे, असे आधीच सांगितले होते. असे असतानाही सरकारने सुरक्षेची पूर्ण उपाययोजना का केली नाही?मोदी यांच्या वैयक्तिक लाभापायी निष्पाप भारतीयांचे बलिदान सुरू आहे. भाजपाने क्षणिक राजकीय लाभासाठी पीडीपीशी जी युती केली, त्याची मोठीच किंमत देश मोजत आहे.>भाजपाचा प्रतिहल्लाकाश्मीरमधील दहशतवादाची समस्या ही नेहरू-गांधी परिवाराने निर्माण केली आहे, असा प्रतिहल्ला केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी राहुल गांधी यांच्यावर चढवला. परदेशातून आल्यानंतर राहुल यांनी दहशतवाद्यांचा नव्हे, तर नरेंद्र मोदी यांचा निषेध केला, यातूनच सारेकाही स्पष्ट झाले आहे, असेही त्यांनी बोलून दाखवले.>काश्मीरमधील अतिरेक्यांना आम्ही संपवत आणले असून, येथील दहशतवाद लवकरच पूर्णपणे संपेल, असा दावा पंतप्रधान कार्यालयातील राज्यमंत्री जीतेंद्र सिंग यांनी येथे केला.