शहरं
Join us  
Trending Stories
1
"...नाहीतर भारताने अमेरिकेला गुड बाय म्हणावं"; शशी थरूर यांचा मोदी सरकारला मोलाचा सल्ला
2
'माझे मित्र पुतिन...', ट्रम्प यांच्या टॅरिफ वॉर दरम्यान PM मोदींनी रशियन राष्ट्राध्यक्षांशी संवाद साधला; भारत भेटीचे आमंत्रण दिले
3
'मतदार याद्यांमध्ये घोळ, आम्हालाही मान्य; आमची मागणी होती की...", CM फडणवीसांचं मोठं विधान
4
Nashik: पती-पत्नीने एक्स्प्रेस ट्रेनसमोर उडी मारत आयुष्य संपवले, लग्नाला झाली होती ११ वर्ष
5
Donald Trump Tariff News : ट्रम्प यांच्या टॅरिफविरोधात भारत 'अ‍ॅक्शन'मोडवर ! अमेरिकेकडून शस्त्र खरेदी थांबवली, राजनाथ सिंह यांचा USA दौराही पुढे ढकलला
6
'महादेवी हत्तीणीवर उपचार करण्यासाठी महाराष्ट्रात एकही केंद्र नाही', 'पेटा'ने जाहीर केली भूमिका
7
सरकारने आयकर विधेयक २०२५ मागे घेतले; टॅक्स स्लॅबमध्ये काय बदल होणार? जाणून घ्या...
8
तेल कंपन्यांना 30,000 कोटींचे अनुदान, उज्ज्वला योजनेसाठी...; केंद्र सरकारने घेतले पाच मोठे निर्णय
9
ज्या आदित्य श्रीवास्तवचं नाव घेऊन राहुल गांधींनी ECI ला घेरले; तोच आता समोर आला, सांगितलं 'सत्य'
10
DPL 2025 च्या नव्या हंगामात प्रितीच्या 'हिरो'नं केली हवा! १९८ च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या १११ धावा
11
Eknath Shinde : ज्यांनी स्वाभिमान गुंडाळून ठेवला, त्यांचं....; उद्धव ठाकरेंना मागची जागा दिल्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
12
राहुल गांधींच्या आरोपानंतर काँग्रेस आक्रमक; दादरमध्ये रास्ता रोको, भाजपाविरोधात घोषणाबाजी
13
NASA : नासाचा मोठा निर्णय! इंटरनॅशनल स्पेस स्टेशन समुद्रात पाडणार! कारण ऐकून धक्का बसेल
14
अतुल परचुरेंच्या आठवणीत भावुक झाले दिलीप प्रभावळकर; म्हणाले, "डॉक्टरांनी त्याला..."
15
IND vs AUS: टीम इंडियाविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर, भारतीय वंशाच्या दोन खेळाडूंना संधी!
16
हृदयस्पर्शी! "तुम्ही माझ्यासाठी श्रीकृष्णासारखे..."; महिलेने साडी फाडून मुख्यमंत्र्यांना बांधली राखी
17
Donald Trump Tariff News : अमेरिकाच टॅरिफबाबत गंडली! ट्रम्प यांची भारताबद्दल कडक भूमिका, पण परराष्ट्र मंत्रालय करतंय कौतुक
18
२ तासांचा हायव्हॉल्टेज ड्रामा, गर्लफ्रेंडच्या मिठीत सापडला नेता; पत्नीला पाहून पती पळाला, पण...
19
आकाश 'वाणी'! वैभव सूर्यवंशीमुळे स्टार विकेट किपर बॅटर संजूवर आलीये संघ सोडण्याची वेळ!
20
भारतीयांसाठी कॅनडा ठरतोय मृत्युचं घर; गेल्या ५ वर्षातील आकडे चिंताजनक!

पाकच्या कुरापती कायम; दोन जवानांना वीरमरण

By admin | Updated: July 13, 2017 05:57 IST

हिजबुल मुजाहिद्दिनच्या तीन अतिरेक्यांचा खात्मा केल्यानंतर पाकिस्तानने बुधवारी दुपारी पुन्हा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले.

श्रीनगर : अमरनाथ यात्रेकरूंवरील हल्ल्यानंतर काश्मीरमधील सुरक्षा प्रचंड प्रमाणात वाढवल्यानंतर आणि हिजबुल मुजाहिद्दिनच्या तीन अतिरेक्यांचा खात्मा केल्यानंतर पाकिस्तानने बुधवारी दुपारी पुन्हा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. पाकिस्तानने केलेल्या बेछूट गोळीबारात भारताच्या दोन जवानांना वीरमरण प्राप्त झाले.कुपवाडा जिल्ह्याच्या केरन क्षेत्रात पाकिस्तानी लष्कराने जोरदार गोळीबार व तोफांचा मारा केला. यात भारताचे दोन जवान हुतात्मा झाले असल्याची माहिती लष्कराने दिली असली तरी त्या दोघांची नावे मात्र जाहीर करण्यास नकार दिला आहे. भारतीय जवानांचे गस्ती पथक व पाकिस्तानी लष्कर यांच्यात चकमक होऊ न, हे जवान शहीद झाल्याचे आधी सांगण्यात येत होते. केरन क्षेत्रातील फुरकिया गली भागात हा गोळीबार झाला. तो पाकिस्तानी लष्कराने केला की पाकच्या बॉर्डर अ‍ॅक्शन टीमने (बॅट) केला, हे स्पष्ट झालेले नाही. मात्र फुरकिया गली भागातून पाकिस्तानी दहशतवादी नेहमी घुसण्याचा प्रयत्न करीत असतात आणि त्या वेळी बॅटतर्फे गोळीबार केला जातो. आजही तसे घडले का, हे सांगण्यात आलेले नाही. (वृत्तसंस्था)>आझादीच्या घोषणाहा प्रकार घडण्याच्या काही तास आधीच भारतीय सुरक्षा दलांनी बडगाम जिल्ह्यात तीन दहशतवाद्यांचा खातमा केला होता. त्यातील एका दहशतवाद्याच्या अंत्ययात्रेच्या वेळी जमलेल्या हजारो लोकांनी काश्मीरच्या आझादीच्या घोषणा दिल्या आणि सुरक्षा दलाच्या जवानांवर दगडफेकही केली. >राहुल यांचे टीकास्त्र : नवी दिल्ली : देशाची सुरक्षा व्यवस्था धोक्यात आलेली असताना भाजपा एका व्यक्तीच्या प्रतिमा संवर्धनात मग्न आहे. अमरनाथ यात्रेकरूंवर झालेला दहशतवादी हल्ला आत्ममग्नतेचे ढळढळीत उदाहरण आहे, असा हल्ला काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केला. सुरक्षेतील चूक मान्य होणारी नाही. मोदी यांना ही जबाबदारी घ्यावी लागेल व पुन्हा असे घडणार नाही याची व्यवस्था करावी लागेल, असे गांधी म्हणाले.ते म्हणाले की, गुप्तचर यंत्रणांनी केंद्र सरकारला ईदनंतर मोठ्या दहशतवादी हल्ल्याची तयारी सुरू आहे व अमरनाथ यात्रा हे त्यांचे लक्ष्य आहे, असे आधीच सांगितले होते. असे असतानाही सरकारने सुरक्षेची पूर्ण उपाययोजना का केली नाही?मोदी यांच्या वैयक्तिक लाभापायी निष्पाप भारतीयांचे बलिदान सुरू आहे. भाजपाने क्षणिक राजकीय लाभासाठी पीडीपीशी जी युती केली, त्याची मोठीच किंमत देश मोजत आहे.>भाजपाचा प्रतिहल्लाकाश्मीरमधील दहशतवादाची समस्या ही नेहरू-गांधी परिवाराने निर्माण केली आहे, असा प्रतिहल्ला केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी राहुल गांधी यांच्यावर चढवला. परदेशातून आल्यानंतर राहुल यांनी दहशतवाद्यांचा नव्हे, तर नरेंद्र मोदी यांचा निषेध केला, यातूनच सारेकाही स्पष्ट झाले आहे, असेही त्यांनी बोलून दाखवले.>काश्मीरमधील अतिरेक्यांना आम्ही संपवत आणले असून, येथील दहशतवाद लवकरच पूर्णपणे संपेल, असा दावा पंतप्रधान कार्यालयातील राज्यमंत्री जीतेंद्र सिंग यांनी येथे केला.