शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2025 07:52 IST

पहलगामच्या दहशतवादी हल्ल्यानंतर बिहारमधील सभेत प्रथमच जाहीर वक्तव्य, कल्पनाही केली नसेल अशी शिक्षा देऊ

विभाष झामधुबनी : पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला करणारे व हा कट रचणाऱ्यांनी कल्पनाही केली नसेल अशी शिक्षा त्यांना देऊ, असा कठोर इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी दिला. हे शत्रू केवळ निःशस्त्र पर्यटकांवर हल्ला करून थांबले नाहीत तर त्यांनी भारताच्या आत्म्यावरच आघात केला असल्याचे मोदी म्हणाले.

पहलगाम हल्ल्याचा जगभरातील बहुतांश देशांनी निषेध केला आहे. त्या हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या मुद्द्यावर एखाद्या कार्यक्रमात प्रथमच जाहीर वक्तव्य केले. राष्ट्रीय पंचायती राज दिनाच्या निमित्ताने बिहारमधील मधुबनी येथे आयोजित एका सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंग्रजीमध्ये काही काळ भाषण केले. ते म्हणाले की, देशात दहशतवाद्यांचे उरलेसुरले अस्तित्व पूर्णपणे उद्धवस्त  करण्याची वेळ आली आहे. प्रत्येक दहशतवादी व त्याच्या पाठीराख्यांना आम्ही शोधून काढू व त्यांच्यावर कठोर कारवाई करू. जगाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात ते दडून बसले असतील तरी त्यांना हुडकून काढू. भारत दहशतवादापुढे कधीही झुकणार नाही, दहशतवाद्यांना आम्ही कधीही माफ करणार नाही, असे मोदी यांनी ठामपणे सांगितले. 

‘कारगिल ते कन्याकुमारी अवघा देश शोकमग्न‘

पहलगाम हल्ल्यात मरण पावलेल्यांना मोदी व सभेला उपस्थित असलेल्या लोकांनी श्रद्धांजली अर्पण केली. त्यानंतर पंतप्रधानांनी आपले भाषण सुरू केले. पाकिस्तानचा थेट उल्लेख न करता मोदी यांनी सांगितले की, जे दहशतवादी हल्ल्यात सामील होते व ज्यांनी हा कट रचला, त्यांच्यावर अत्यंत कठोर कारवाई करण्यात येईल. या भीषण हत्याकांडात लोकांनी आपले पुत्र, कन्या, भाऊ, पती, पत्नी आदींना गमावले आहे. मृतांमध्ये महाराष्ट्र, गुजरात, ओडिशा, बिहार आदी राज्यांतील रहिवासी आहेत. कारगिलपासून कन्याकुमारीपर्यंत सारा देश शोकाकुल आहे.

युद्धनौकेवरून मारा, क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी

भारतीय नौदलाच्या आयएनएस या युद्धनौकेवरून भूपृष्ठावरून हवेत मध्यम पल्ल्यापर्यंत मारा करणाऱ्या स्वदेशी बनावटीच्या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी गुरुवारी करण्यात आली. ते क्षेपणास्त्र ७० किमीपर्यंत मारा करू शकते, असे सांगण्यात आले. पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पावले उचलल्यावर पाकिस्तानने भूपृष्ठावरून भूपृष्ठावर मारा करणाऱ्या क्षेपणास्त्राची चाचणी करण्याचे जाहीर करून एक प्रकारे इशारा दिला होता; पण तिथेही भारताने पाकिस्तानवर मात केली आहे. भारतीय नौदलाच्या सूत्रांनी सांगितले की, आयएनएस सूरत या युद्धनौकेने क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली. त्यामुळे नौदलाचे सामर्थ्य वाढण्यास मदतच होणार आहे. शस्त्रास्त्रे तसेच अन्य संरक्षण सामग्रीच्या उत्पादनात भारताने आत्मनिर्भर होण्याचे ठरविले आहे. त्यामुळे ही चाचणी त्यादृष्टीनेही महत्त्वाची आहे.

 

टॅग्स :Pahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाNarendra Modiनरेंद्र मोदी