शहरं
Join us  
Trending Stories
1
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
2
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
3
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
4
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
5
Navi Mumbai Rains: वाशी प्लाझा येथे नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
6
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
7
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
8
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! अंधेरी सबवे पाण्याखाली, समुद्रात ४ मीटर उंचीच्या लाटा
9
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
10
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
11
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
12
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...
13
संजय कपूर यांच्या पार्थिवावर कुठे आणि कधी होणार अंत्यसंस्कार? 'या' कारणामुळे होतोय उशीर
14
Sonam Raghuwanshi: कॉर्पोरेट लूक ते साखरपुड्यातील शृंगार! राजाच्या हत्येतील आरोपी सोनमचे पहिल्यांदाच समोर आले फोटो
15
June Panchak 2025: आजपासून पाच दिवस पंचक योग; महत्त्वाचे काम तसेच प्रवास टाळता आला तर उत्तम!
16
जिओचे नेटवर्क डाऊन झाले! इंटरनेट गायब, कॉल ड्रॉपही...; फायबरचे ग्राहकही वैतागले... 
17
Share Market Update : बाजारात जोरदार तेजी! सेन्सेक्स ८१,००० पार, 'या' शेअर्सनी दिला बंपर रिटर्न! कुठे झाली घसरण?
18
सोनम आणि राज कुशवाह यांची नार्को टेस्ट होणार? राजा रघुवंशीच्या कुटुंबाच्या मागणीवर पोलीस म्हणाले..
19
विमानातील 'त्या' सीटची मागणी वाढली, अहमदाबादमधील अपघातानंतर '11A' साठी प्रवासी अधिक पैसे देण्यास तयार

सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2025 08:44 IST

India vs Pakistan War: भारत सरकारने लष्कराला पाकिस्तानवर लष्करी कारवाईसाठी फ्री हँड दिला आहे. यामुळे जगभरात खळबळ उडाली आहे. एवढे भीषण दहशतवादी हल्ले होऊनही साधे अवाक्षर न काढणाऱ्या संयुक्त राष्ट्रांच्या अध्यक्षांना आता पाकिस्तानचा कळवळा आला आहे.

जम्मू काश्मीरमध्ये गेल्या आठवड्यात झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकारने लष्कराला पाकिस्तानवर लष्करी कारवाईसाठी फ्री हँड दिला आहे. यामुळे जगभरात खळबळ उडाली आहे. एवढे भीषण दहशतवादी हल्ले होऊनही साधे अवाक्षर न काढणाऱ्या संयुक्त राष्ट्रांच्या अध्यक्षांना आता पाकिस्तानचा कळवळा आला आहे. भारतीय सैन्य कारवाई करणार हे समजताच संयुक्त राष्ट्रांचे महासचिव एंटोनियो गुटेरस यांनी परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांना फोन केला होता. 

गुटेरस यांनी जयशंकर यांना फोन केल्यानंतर लगेचच पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनाही फोन केला. गुटेरस यांनी आठवड्याभराने फोन करून पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा निषेध व्यक्त केला आहे. तसेच युद्ध नाही तर कायदेशीर मार्गाने या हल्ल्याची जबाबदारी निश्चित करण्याचा सल्ला दिला आहे. 

गुटेरेस यांचे प्रवक्ते स्टीफन दुजारिक यांनी ही माहिती दिली आहे. महासचिवांनी भारताचे परराष्ट्र मंत्री जयशंकर आणि पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्याशी स्वतंत्र फोनवर चर्चा केली. २२ एप्रिल रोजी जम्मू आणि काश्मीरमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा सरचिटणीसांनी तीव्र निषेध केला, असे ते म्हणाले. 

कोणत्याही प्रकारच्या संघर्षाची परिस्थिती टाळणे महत्वाचे आहे. गंभीर परिणाम होऊ शकतात, तणाव कमी करण्यासाठी कोणत्याही प्रयत्नात मदत करण्याची तयारी असल्याचे गुटेरस यांनी दोन्ही देशांना सांगितले. 

परराष्ट्र मंत्री जयशंकर यांनी सोशल मीडियावर याची माहिती दिली आहे. संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस गुटेरेस यांच्याशी फोनवर चर्चा झाली. बाबदारी सुनिश्चित करण्याच्या महत्त्वावर एकमत झाले. या हल्ल्यातील कट रचणाऱ्यांना, समर्थकांना आणि गुन्हेगारांना शिक्षा होईल यासाठी भारत वचनबद्ध आहे, असे जयशंकर यांनी म्हटले आहे. 

टॅग्स :Pahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाIndian Armyभारतीय जवानPakistanपाकिस्तानunited nationsसंयुक्त राष्ट्र संघ