शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
2
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
3
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
4
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
5
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
6
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
7
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
8
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
9
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
10
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
11
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
12
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
13
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
14
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
15
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
16
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
17
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
18
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
19
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
20
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका

पान 4 : मुरगाव पालिकेची थकबाकी 10 कोटींवर

By admin | Updated: August 11, 2015 23:16 IST

प्रशासन गाफिल :

प्रशासन गाफिल :
वास्को : मुरगाव पालिकेची थकबाकी वसुलीची मोहीम पाच महिन्यांपासून थंडावलेली आह़े त्यामुळे थकबाकीचा आकडा दिवसेंदिवस वाढत असून ही तब्बल 10 कोटींवर पोहचली आह़े
शहरात पालिकेच्या मालकीच्या काही इमारती असून त्यामध्ये फ्लॅटधारक व काही दुकानदारांचा समावेश आह़े पालिकाने काही वर्षांपूर्वी फ्लॅटधारकांच्या तसेच दुकानदारांच्या घरभाड्यात मोठया प्रमाणात वाढ केली होती़ मात्र, ही भाडेवाढ दुकानदारांना तसेच फ्लॅट धारकांना अमान्य होती़ त्यामुळे त्यांनी मंडळाला कित्येक वर्षांपासून भाडे दिले नव्हते.
मुरगाव नगरपालिका मंडळातर्फे निश्चित केलेला घरभाडे वाढीचा ठराव मंजुरीसाठी नगरपालिका संचालकांना पाठविण्यात आला होता़ पण हा ठराव अनेक महिन्यापासून नगरपालिका संचालनालयाच्या कार्यालयातील शीतपेटीत धूळ खात पडलेला आहे. त्यामुळे भाडेकरूनी वाढीव दराने भाडे भरण्यास नकार दिला होता़ याबाबत भाडेकरूनी येथील सत्र न्यायालयात एक याचिका दाखल केली होती़ तसेच हा निकाल भाडेकरूंच्या बाजूने लागला होता़ तरीही भाडेकरूनी जुन्या दराने तसेच नगरपालिका संचालकांची मंजुरी मिळाल्यानंतर अंमलात आलेली वाढीव दरातले भाडे भरण्यास कोणताच पुढाकार घेतला नाही़
दरम्यान, भाडेकरूकडून ही थकबाकी वसुल करण्यासाठी मंडळातील नगरसेवकांनी व मंडळातील अधिकार्‍यांनी कोणतीच ठोस पाऊले उचलली नाही. परंतु मागील वर्षी पालिकेच्या मुख्य अधिकारी पदावर जगन्नाथ बी़ भिंगी यांची नियुक्ती झाली. तेव्हा भिंगी त्यांनी थकबाकीचा विषय गांभीर्याने घेतला होता. शिवाय आर्थिक वर्षांच्या अखेरीस काही प्रमाणात लाखो रूपये नगरपालिकेच्या तिजोरीत जमा केला होता. मात्र, गेल्या मे महिन्यात त्यांची निवृत्ती झाल्यानंतर हा थकबाकीची मोहिम थंडावली. त्याचबरोबर विद्यमान पालिका मंडाळातर्फे थकबाकी वसुलीकडे पूर्तता कानाडोळा केला आहे. शिवाय थकबाकीत दिवसेंदिवस वाढ होत चाललेली आहे. त्यामुळे पालिकेने त्वरित कारवाई करून हालचाली न केल्यास पालिकेची आर्थिक स्थिती कोलमडू शकते. (प्रतिनिधी)

चौकट : नगरसेवक निवडणूकीच्या तयारीत..
आता नगरपालिकेच्या निवडणूकाजवळ आल्याने नगरसेवक व्यूहरचना आखण्यात व्यस्थ आहेत. तसेच पालिकेच्या प्रभागांची रचना आणि राखीवता जाहीर करण्यात आली नाही. तरीही नगरसेवकांनी स्वत: तर्कविर्तक बांधून त्यादृष्टिने पावले उचललेली आहेत. काही नगरसेवकांनी सत्ता संपुष्टात आल्याचे गृहीत धरून पालिकेत येणे बंद व कारभारात लक्ष देणे थांबविले आहे. त्यामुळे पालिकेची थकबाकी वसुल करण्याची जवाबदारी निवडून येणार्‍या मंडळाला करावे लागणार आहे.