शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
3
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
4
मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
5
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
6
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
7
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर
8
BMC School: १३ वर्षांत मुंबई महापालिकेच्या १३१ मराठी शाळा बंद!
9
मुलांच्या उच्च शिक्षणाची चिंता सतावतेय? SIP, SSY आणि PPF मधून करा करोडपती होण्याची तयारी!
10
गुरुचरित्रात ‘असे’ येते गणेशाचे अद्भूत वर्णन; बाप्पाच्या महात्म्याचा संदर्भ कुठे, कसा येतो?
11
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
12
'मम्मीने दरवाजा उघडला, काशी काका आता आले अन्...'; 9 वर्षाच्या मुलाने सांगितले कशी झाली बापाची हत्या?
13
'आता पुन्हा शरद पवारांकडे जायचे नाही, असं ठरवलंय'; पवारांचा निष्ठावंत दुखावला, बळीराम काका साठेंनी मन केलं मोकळं
14
Swami Samartha: 'भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे' हे स्वामींचे वचन; पण आहे 'ही' एक अट!
15
रोहित शर्माच्या पत्नीचा पाठलाग करत घरापर्यंत पोहोचला, फोटोही काढू लागला, पाहतात रितिकाचा राग अनावर, त्यानंतर...  
16
हिंदी सक्तीवरून राज ठाकरेंचं महाराष्ट्रातील शाळांच्या मुख्याध्यापकांना खुलं पत्र, वाचा जसच्या तसं...
17
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!
18
Mumbai: नियोजनाच्या अभावामुळे विक्रोळीत वाहतूककोंडी
19
Israel Iran War : 'मोसाद'ची नवीन खेळी!, इराण अलर्टवर, नागरिकांना मोबाईलमधून WhatsApp डिलिट करण्याचे आदेश
20
दूधवाल्याची चूक अन् छत्रपती संभाजीनगरजवळ कारसह दोन बस एकमेकांवर धडकल्या

पान 4 - दहावीच्या विद्यार्थ्यांचेही धरणे

By admin | Updated: September 3, 2015 23:05 IST

पेडणे : ज्या झाडांचे फणस, आंबे, काजू विकून आई-वडिलांनी आपल्याला कपडे, बूट, पुस्तके, व?ा आणून दिल्या ती 450 झाडे कापून सरकारने आमच्या कुटुंबीयांवर अन्याय केला आहे, हा दावा आहे मागच्या 4 दिवसांपासून पेडणे येथे धरणे धरून बसलेल्या अमरनाथ नाईक कुटुंबातील दहावीत शिकणार्‍या विनायक नाईक याचा. गेले चार दिवस तो शाळेला दांडी मारून येथे कुटुंबीयांसोबत धरणे धरून बसला आहे.

पेडणे : ज्या झाडांचे फणस, आंबे, काजू विकून आई-वडिलांनी आपल्याला कपडे, बूट, पुस्तके, व?ा आणून दिल्या ती 450 झाडे कापून सरकारने आमच्या कुटुंबीयांवर अन्याय केला आहे, हा दावा आहे मागच्या 4 दिवसांपासून पेडणे येथे धरणे धरून बसलेल्या अमरनाथ नाईक कुटुंबातील दहावीत शिकणार्‍या विनायक नाईक याचा. गेले चार दिवस तो शाळेला दांडी मारून येथे कुटुंबीयांसोबत धरणे धरून बसला आहे.
मागच्या 4 दिवसांपासून आपले कुटुंबीय पेडणे येथे धरण्यास बसले आहेत. त्यांना पाठिंबा देण्यासाठी आपणही हायस्कूलला चार दिवस दांडी मारून धरण्याला बसलो. एका बाजूने मला माझ्या अभ्यासाची काळजी आहे, तर दुसर्‍या बाजूने उत्पन्न देणार्‍या झाडांची कत्तल केल्याचे दु:ख आहे. यासाठी गेले 4 दिवस आई, वडील, मोठा भाऊ व बहीण यांच्यासमवेत धरण्याला बसलो. मात्र, शुक्रवारी आपण शाळेत जाणार, असे विनायक याने सांगितले.
नियोजित तुये इलेक्ट्रॉनिक सिटीकडे जाण्यासाठी विर्नोडा येथून रस्ता बनवण्याचे काम सध्या युद्धपातळीवर चालू आहे. त्या जागेतील उत्पन्न देणारी झाडे कापल्याने आपल्या उदरनिर्वाहाचे साधनच नष्ट झाल्यामुळे सरकारने आम्हाला न्याय द्यावा, यासाठी गेले 4 दिवस अखंडितपणे पेडणे शासकीय इमारतीसमोर अमरनाथ नाईक आपल्या कुटुंबीयांसहित धरणे आंदोलनास बसले आहेत.
(प्रतिनिधी)
फोटो :
कुटुंबीयांसह धरणे धरून बसलेला विनायक नाईक.
(छाया : निवृत्ती शिरोडकर)