शहरं
Join us  
Trending Stories
1
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
2
आजचे राशीभविष्य: बुधवार १३ ऑगस्ट २०२५; बोलण्यावर ताबा ठेवा, खर्च वाढणार नाही याकडे लक्ष द्या, कामात यश मिळेल
3
उद्धवसेना, शरद पवार गटाला खिंडार; पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा अजित पवार गटात प्रवेश
4
पालिकांमध्ये 'एक वॉर्ड-एक नगरसेवक' पद्धत लागू करा; मनसेची राज्य निवडणूक आयुक्तांकडे मागणी
5
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
6
सुवर्णयुगाचा अंत! 'देवदास' फेम बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रीचं निधन, सिनेसृष्टीवर शोककळा
7
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
8
गणेश मंडळे दंड भरणार नाही, खड्यावर सरकारलाच दंड लावा
9
आलिशान कारमधून ३१ कोटींची ड्रग्ज तस्करी; ठाणे पालिकेचा लोगो लावून कारमधून सुरू होता कारभार
10
अग्रलेख: भटक्यांचा 'अनाथाश्रम'; कल्पना यशस्वी झाली तर मोकळेपणाने करता येईल संचार
11
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
12
आधार कार्ड, मतदार ओळखपत्र नागरिकत्वाचा पुरावा नाहीत! मतदार यादीतून वगळण्याचा अधिकार निवडणूक आयोगालाच
13
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
14
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
15
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
16
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
17
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
18
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
19
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
20
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं

पान १/ रेल्वे अपघातात ११ ठार

By admin | Updated: February 13, 2015 23:11 IST

रेल्वेवर दरड कोसळून

रेल्वेवर दरड कोसळून
११ प्रवासी ठार, १६ जखमी
कर्नाटकातील दुर्घटना: दगडावर आदळून एक्स्प्रेस घसरली
अनेकल(कर्नाटक)- कर्नाटक- तामिळनाडू सीमेवर अनेकल येथे शुक्रवारी सकाळी ७.३० वाजता रुळावर दरड कोसळल्यामुळे बंगलोर- एर्नाकुलम इंटर सिटी एक्स्प्रेसचे नऊ डबे घसरून झालेल्या भीषण अपघातात ९ प्रवासी ठार तर १६ जखमी झाले.
सकाळी ७.३० वाजता बेंगळुरूपासून ४५ किमी अंतरावरील अनेकल आणि होसुल दरम्यान रेल्वेमार्गावर हा अपघात झाला. बंगलोर-एर्नाकुलम इंटरसिटी एक्स्प्रेस सकाळी ६ वाजून १५ मिनिटांनी बेंगळुरूवरून रवाना झाली होती.
घटनास्थळी हजर विभागीय रेल्वे व्यवस्थापक अनिलकुमार अग्रवाल यांनी पत्रकारांना या अपघाताची माहिती देताना सांगितले की, मदत कार्य पूर्ण होईपर्यंत मृतांचा आकडा नऊवर पोहोचला होता. मृतांमध्ये पाच पुरुष, तीन महिला आणि नऊ वर्षाच्या एका बालकाचा समावेश आहे.
रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी घटनेनंतर लगेच केलेल्या टिष्ट्वटमध्ये रुळावर एक मोठा दगड पडला होता. इंटरसिटी एक्स्प्रेस त्यावर धडकल्याने हा अपघात घडल्याचे म्हटले आहे.
आपण एका मोठ्या दगडाचा आवाज ऐकल्याचे गाडीचालकाने अधिकार्‍यांना सांगितले होते. परंतु असा कुठलाही दगड मिळालेला नाही,असे अग्रवाल यांनी स्पष्ट केले.
अपघातात जखमी १६ प्रवाशांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्याची माहिती कर्नाटकचे पोलीस महासंचालक लालरोखुमा पचाऊ यांनी दिली. किरकोळ जखमींना प्राथमिक उपचारानंतर सुटी देण्यात आली आहे.
रेल्वे, पोलीस, अग्निशामक विभाग आणि राष्ट्रीय आपत्ती निवारण पथकातर्फे संयुक्तपणे बचाव कार्य सुरूअसून कर्नाटक आणि तामिळनाडूच्या डॉक्टरांचे पथकही घटनास्थळी पोहोचले आहे. केंद्रीय विधी मंत्री डी.व्ही. सदानंद गौडा तातडीने अपघातस्थळी पोहचले होते. कर्नाटकचे आरोग्य मंत्री यू.टी. खादर यांच्या सांगण्यानुसार या अपघातात ५० प्रवासी जखमी झाले असल्याची माहिती त्यांना प्रशासनाकडून मिळाली आहे. (वृत्तसंस्था)


रेल्वेमंत्री अपघातस्थळी,चौकशीचे आदेश
दरम्यान अपघातस्थळी पोहोचलेले रेल्वेमंत्री सुरेश प्रभु यांनी या अपघाताची जबाबदारी निश्चित करण्याचे तसेच भविष्यात अशाप्रकारच्या अपघातांवर आळा घालण्याच्या दृष्टीने सुरक्षात्मक उपाय करण्याचे निर्देश दिले आहेत. या घटनेबद्दल दुखवटा व्यक्त करताना त्यांनी अपघातातील मृतांच्या कुटुंबीयांना दोन लाख रुपये, गंभीर जखमींना ५०,००० रुपये तर किरकोळ जखमींना २०,००० रुपये आर्थिक मदत जाहीर केली.

पंतप्रधानांचा दुखवटा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या भीषण रेल्वे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या प्रवाशांबद्दल दुखवटा व्यक्त करताना त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले आहे. (वृत्तसंस्था)