शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
2
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
3
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
4
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
5
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
6
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
7
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
8
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
9
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
10
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
11
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
12
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
13
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
14
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
15
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!
16
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
17
गर्भवती होताच कोरियन सरकारने दिला भरभरून पैसा; मूळ भारतीय महिलेने हिशोबच सांगितला
18
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
19
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
20
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?

केळी विमा रक्कमेवरून शेतकर्‍यांचा उद्रेक जिल्हा बँकेत आंदोलन : कार्यकारी संचालकांची खुर्ची फेकली

By admin | Updated: January 12, 2016 23:55 IST

संतप्त शेतकर्‍यांनी कार्यकारी संचालक जितेंद्र देशमुख यांची खुर्ची फेकून दिली व बँक प्रशासनाचा निषेध केला.

जळगाव- केळी पीक विम्याची रक्कम मिळत नसल्याने जळगाव तालुक्यातील संतप्त शेतकर्‍यांच्या भावनांचा मंगळवारी दुपारी जिल्हा बँकेत उद्रेक झाला. संतप्त शेतकर्‍यांनी कार्यकारी संचालक जितेंद्र देशमुख यांची खुर्ची फेकून दिली व बँक प्रशासनाचा निषेध केला. याप्रकरणी आंदोलनकर्त्या शेतकर्‍यांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. २०१४-१५ या वर्षात केळीला विमा सुरक्षा म्हणून जिल्हा बँकेतर्फे विमा कंपनीकडे हप्ते भरलेल्या शेतकर्‍यांना विम्याची रक्कम मिळालेली नाही. राष्ट्रीयकृत बँकांतर्फे ज्या शेतकर्‍यांनी केळीसाठी विमा काढला त्यांना विमासंबंधीची रक्कम मिळत आहे. पण जिल्हा बँकेतर्फे ज्या शेतकर्‍यांनी विमा संबंधीची रक्कम का मिळत नाही याची माहिती घेण्यासाठी पिंप्राळा मंडळ अंतर्गत विमा रक्कम भरलेल्या शेतकर्‍यांनी जिल्हा बँकेचे मुख्यालय गाठले व तेथे कार्यकारी संचालक देशमुख यांना जाब विचारला. पण कार्यकारी संचालक हे समाधानकारक माहिती देऊ शकले नाही. नंतर कार्यकारी संचालक एका महत्त्वाच्या बैठकीला जायचे असल्याचे सांगून आपल्या दालनातून निघून गेले. त्यानंतर त्यांची खुर्ची शेतकर्‍यांनी फेकली. तेथून ते शेतकरी जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी यांच्याकडे गेले. जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी विवेक सोनवणे यांनी पिंप्राळा मंडळांतर्गत विमाधारक शेतकरी व कुणाला मदतीची रक्कम मिळाली याची माहिती दिली. दरम्यान, जिल्हा बॅँकेतील गोंधळ प्रकरणी शामकांत भाऊलाल जाधव (रा.फुपनगरी ता.जळगाव), कैलास छगन चौधरी (रा.खेडी ता.जळगाव), हर्षल प्रल्हाद चौधरी (रा.आव्हाणे ता.जळगाव) यांच्यासह १५ ते २० जणांविरुद्ध जिल्हा पेठ पोलीस स्टेशनला कलम १४३, १४७, ३५३, ४२७, ५०६ व सार्वजनिक मालमत्तेचे विद्रुपीकरणचे ३/२७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीक विमा संदर्भातील फाईल फेकून सुमारे आठ हजाराचे नुकसान केल्याची फिर्याद प्रकाश भटा पाटील यांनी दिली आहे.