शहरं
Join us  
Trending Stories
1
Rajnath Singh : "ऑपरेशन सिंदूर अजून संपलेलं नाही; हा फक्त ट्रेलर, योग्य वेळ आल्यावर पूर्ण चित्रपट दाखवू"
2
हापूस आंब्याचा सीझन संपला! कोकणचा राजा पुढचा आठवडाभरच मिळणार; एपीएमसीत काय स्थिती...
3
Maharashtra Politics : "मी लिहिलेल्या घटना सत्य, आणखी लिहिले असते तर हाहाकार माजला असता"; संजय राऊतांनी स्पष्टच सांगितलं
4
कतरिनाआधी 'या' अभिनेत्रीच्या प्रेमात होता विकी कौशल, 'उरी'च्या प्रमोशनला एकत्रही दिसले, पण...
5
२ हेल्थ इन्शुन्स पॉलिसी एकाच वेळी करता येतात क्लेम; फक्त 'ही' प्रक्रिया माहिती असायला हवी
6
एअरटेलने लाँच केली ग्राहकांसाठी 'डिफेन्स' सिस्टीम; रियल टाइम फ्रॉड डिटेक्शन होणार, सगळे ॲप्स ट्रॅक करणार
7
मोहिमेदरम्यान मधमाशांचा हल्ल्यात K9 रोलो शहीद, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार...
8
मित्रच बनला शत्रू! आधी मैत्रिणीचा गळा कापला, मग जिवंत जाळून पळ काढला
9
कॉईनबेस एक्सचेंज झालं हॅक, Bitcoin मध्ये मागितली खंडणी; युजर्सचा डेटा लीक करण्याची धमकी
10
व्वा रे पठ्ठ्यांनो! 'या' गावाने दिले १०० IAS; प्रत्येक घरात सरकारी नोकरी, म्हणतात अधिकाऱ्यांचं गाव
11
ऑपरेशन सिंदूर थांबताच काश्मीरमध्ये लागोपाठ २ ऑपरेशन; ४८ तासांत सहा दहशतवाद्यांचा खात्मा
12
जमिनीवरून हल्लाबोल, हवेतच केले उद्ध्वस्त; भारताने पाकिस्तानवर डागली होती 'इतकी' ब्रह्मोस क्षेपणास्त्रे!
13
'पाकिस्तानने दहशतवाद्यांचे ते अड्डे पुन्हा उभारण्यासाठी १४ कोटी दिले'; राजनाथ सिंहांचा दावा
14
आईच्या मृत्यूनंतर चांदीच्या बांगडीसाठी मुलाने अंत्यविधी रोखून धरला; स्मशानभूमीत गोंधळ घातला...
15
भारताच्या मदतीशिवाय तुर्कीमध्ये बिर्याणी शिजूच शकत नाही! 'हे' आहे मोठे कारण
16
‘एखाद्याला खासदार करायचं म्हंटल्यावर करतो अन् पाडायचं म्हंटलं तर पाडतोच’ अजित पवारांची टोलेबाजी
17
Adani समूहावर म्युच्युअल फंड्सचा भरवसा नाय का? ८ कंपन्यांतून काढले ११६० कोटी; 'ही' आहेत कारणं
18
Anushka Tiwari : अनुष्काचा खोटारडेपणा उघड; MBBSची डिग्री नाही, डर्मेटोलॉजिस्ट असल्याचं सांगून करायची सर्जरी
19
AC लोकलमधून रेल्वेच्या फुकट्या कर्मचाऱ्याचा प्रवास; जाब विचारता टीसीची मग्रुरी, VIDEO व्हायरल
20
गावापेक्षा शहरातच जास्त बेरोजगार! नोकरीसाठी करतायत भटकंती; पहिल्यांदाच मासिक आकडा जारी

टंचाईग्रस्त ८३ गावांमध्ये विहिरींचे अधिग्रहण १७ गावांमध्ये टँकर : १४ गावांचा विंधन विहिरीसाठी प्रस्ताव

By admin | Updated: February 3, 2016 00:28 IST

जळगाव : अत्यल्प पावसामुळे यावर्षी जानेवारी महिन्यापासून पाणी टंचाईच्या झळा बसायला लागल्या आहेत. सद्यस्थितीला भीषण टंचाई असलेल्या ८३ गावांमधील विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. तर १७ गावांमध्ये टँकरच्या साहाय्याने पाणी पुरवठा केला जात आहे. जळगाव व बोदवड तालुक्यातील १४ गावांमधून विंधन विहिरींसाठी प्रस्ताव सादर करण्यात आले आहे.

जळगाव : अत्यल्प पावसामुळे यावर्षी जानेवारी महिन्यापासून पाणी टंचाईच्या झळा बसायला लागल्या आहेत. सद्यस्थितीला भीषण टंचाई असलेल्या ८३ गावांमधील विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. तर १७ गावांमध्ये टँकरच्या साहाय्याने पाणी पुरवठा केला जात आहे. जळगाव व बोदवड तालुक्यातील १४ गावांमधून विंधन विहिरींसाठी प्रस्ताव सादर करण्यात आले आहे.
यावर्षी जिल्‘ातील टंचाईसदृष्य गावांची संख्या ५२६ इतकी आहे. जिल्हा प्रशासनाने टंचाई निवारणासाठी टँकरने पाणी वाटप, टंचाई आराखड्यातून पाणी योजना अशा उपाययोजना राबविण्यास सुरुवात केली आहे.

तीन टप्प्यात टंचाईचे नियोजन
टंचाई भासणार्‍या गावांचे जिल्हा प्रशासनाने तीन टप्प्यात नियोजन केले आहे. त्यात ऑक्टोबर ते डिसेंबर २०१५ कालावधीत ४५ गावांचा समावेश होता. जानेवारी ते मार्च या दरम्यान १२२ गावांमध्ये तर एप्रिल ते जून या काळात ३५९ गावांमध्ये पाणी टंचाई भासणार आहे.

धरणगाव व अमळनेरमध्ये सर्वाधिक अधिग्रहण
फेब्रुवारी महिन्यापासून टंचाईच्या झळा तीव्र झाल्यामुळे जिल्हा प्रशासनाने टंचाई निवारणासाठी प्रयत्न सुरु केले आहे. आतापर्यंत ८३ गावांमध्ये विहिर अधिग्रहण करण्यात आले आहे. त्यात जामनेर तालुक्यातील नऊ , धरणगाव तालुक्यातील २२ गावांमधील २३, एरंडोल तालुक्यातील सात, भुसावळ तालुक्यातील चार गावांमधील तीन, बोदवड तालुक्यातील पाच गावांमधील, पाचोरा तालुक्यातील चार, चाळीसगाव तालुक्यातील तीन, भडगाव तालुक्यातील तीन, अमळनेर तालुक्यातील २१, पारोळा तालुक्यातील पाच गावांतील विहिर अधिग्रहित करण्यात आल्या आहेत.

इन्फो-
टँकरची संख्या वाढली
जिल्हा प्रशासनाकडे पारोळा तालुक्यातील वरखेडेसिम, वाघरा-वाघरी, पोपटनगर, टिहू, भंडणीकर व मंगरुळ या गावांमध्ये टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे. तर अमळनेर तालुक्यातील टाकरखेडा, भोरखेड, कटारे व वामरे तर जळगाव तालुक्यातील देव्हारी या गावांमध्ये यापूर्वी टँकर सुरु होते. पूर्वीचे १२ आणि जामनेर तालुक्यातील पाच अशा १७ गावांमध्ये दहा टँकरच्या साहाय्याने पाणी पुरवठा करण्यात येत आहे.