शहरं
Join us  
Trending Stories
1
Sandhya Shantaram Death: नृत्याच्या 'बिजली'च्या पैंजणांचा आवाज थांबला..! ज्येष्ठ अभिनेत्री संध्या शांताराम यांचं निधन
2
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
3
“सोनम वांगचूक यांना सोडून द्यावे, नवीन पिढीसाठी मोठे योगदान”: शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद
4
“अनिल परब अर्धवट वकील”; रामदास कदमांचा पलटवार, पत्नीने जाळून घेतले की? यावरही दिले उत्तर
5
Video - "मी तुला गोळी मारेन, कोणी वाचवणार नाही"; भाजपा नेत्याची गुंडगिरी, डान्सरवर उधळले पैसे
6
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला कोणत्या उपासनेने होते शीघ्र लक्ष्मीकृपा? वाचा 'हे' प्रभावी स्तोत्र
7
Pakistan: खेळणं समजून शाळेत नेला बॉम्ब, वर्गात जाताच मोठा स्फोट; अनेक विद्यार्थी जखमी
8
Kojagiri Purnima 2025: शास्त्रानुसार कोजागरीच्या रात्री जागरण आणि पूजा केल्याने होते लक्ष्मीकृपा; वाचा व्रतविधी!
9
प्रवाशांची दिवाळी! मुंबई-गोवा ‘वंदे भारत’च्या फेऱ्या वाढणार; कोकणवासीयांना फायदा, नवे टाइमटेबल
10
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला लक्ष्मी योगात 'या' राशींवर बरसणार सुख-संपत्तीचे चांदणे!
11
"त्यांचा आशीर्वादच मिळाल्याची भावना होती...", संध्या शांताराम यांच्या निधनानंतर प्रिया बेर्डेंनी दिला आठवणींना उजाळा
12
“आम्ही युती-आघाडीचे बळी ठरलो, आता स्थानिकांच्या भावना लक्षात घेणार”; उद्धव ठाकरे थेट बोलले
13
"गौतमी पाटील तू महाराष्ट्राचा बिहार केलास, तुझी कार..."; मराठी अभिनेत्याने व्यक्त केला संताप
14
वनडेतही नवे पर्व! रोहित शर्माचं मोठं स्वप्न भंगलं; गिलच्या कॅप्टन्सीत किंग कोहलीसमोरही असेल चॅलेंज
15
"अरे बिट्टू, मी तुझ्यासाठी काय केलं नाही, तरीही तू..."  मुलीचा ब्रेकअपनंतरचा व्हिडीओ व्हायरल!
16
'जननायक' पदवीची चोरी होतेय , बिहारी वाले सावधान! पंतप्रधान मोदींनी राहुल गांधी आणि 'राजद'वर निशाणा साधला
17
Uddhav Thackeray : बाळासाहेबांच्या पार्थिवावरुन रामदास कदम यांनी केलेल्या आरोपावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया
18
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला १ रुपयांचा शिक्का करेल कमाल, नशीब उजळेल, व्हाल मालामाल 
19
धक्कादायक घटना ; 'कफ सिरप' घेतल्याने आठ बालकांचा मृत्यू ! जीव जाण्याला काय ठरले कारणीभूत ?
20
हृदयद्रावक! बॉयफ्रेंडसोबत पळून गेली बायको; ढसाढसा रडत नवऱ्याने ४ मुलांसह नदीत मारली उडी

टंचाईग्रस्त ८३ गावांमध्ये विहिरींचे अधिग्रहण १७ गावांमध्ये टँकर : १४ गावांचा विंधन विहिरीसाठी प्रस्ताव

By admin | Updated: February 3, 2016 00:28 IST

जळगाव : अत्यल्प पावसामुळे यावर्षी जानेवारी महिन्यापासून पाणी टंचाईच्या झळा बसायला लागल्या आहेत. सद्यस्थितीला भीषण टंचाई असलेल्या ८३ गावांमधील विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. तर १७ गावांमध्ये टँकरच्या साहाय्याने पाणी पुरवठा केला जात आहे. जळगाव व बोदवड तालुक्यातील १४ गावांमधून विंधन विहिरींसाठी प्रस्ताव सादर करण्यात आले आहे.

जळगाव : अत्यल्प पावसामुळे यावर्षी जानेवारी महिन्यापासून पाणी टंचाईच्या झळा बसायला लागल्या आहेत. सद्यस्थितीला भीषण टंचाई असलेल्या ८३ गावांमधील विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. तर १७ गावांमध्ये टँकरच्या साहाय्याने पाणी पुरवठा केला जात आहे. जळगाव व बोदवड तालुक्यातील १४ गावांमधून विंधन विहिरींसाठी प्रस्ताव सादर करण्यात आले आहे.
यावर्षी जिल्‘ातील टंचाईसदृष्य गावांची संख्या ५२६ इतकी आहे. जिल्हा प्रशासनाने टंचाई निवारणासाठी टँकरने पाणी वाटप, टंचाई आराखड्यातून पाणी योजना अशा उपाययोजना राबविण्यास सुरुवात केली आहे.

तीन टप्प्यात टंचाईचे नियोजन
टंचाई भासणार्‍या गावांचे जिल्हा प्रशासनाने तीन टप्प्यात नियोजन केले आहे. त्यात ऑक्टोबर ते डिसेंबर २०१५ कालावधीत ४५ गावांचा समावेश होता. जानेवारी ते मार्च या दरम्यान १२२ गावांमध्ये तर एप्रिल ते जून या काळात ३५९ गावांमध्ये पाणी टंचाई भासणार आहे.

धरणगाव व अमळनेरमध्ये सर्वाधिक अधिग्रहण
फेब्रुवारी महिन्यापासून टंचाईच्या झळा तीव्र झाल्यामुळे जिल्हा प्रशासनाने टंचाई निवारणासाठी प्रयत्न सुरु केले आहे. आतापर्यंत ८३ गावांमध्ये विहिर अधिग्रहण करण्यात आले आहे. त्यात जामनेर तालुक्यातील नऊ , धरणगाव तालुक्यातील २२ गावांमधील २३, एरंडोल तालुक्यातील सात, भुसावळ तालुक्यातील चार गावांमधील तीन, बोदवड तालुक्यातील पाच गावांमधील, पाचोरा तालुक्यातील चार, चाळीसगाव तालुक्यातील तीन, भडगाव तालुक्यातील तीन, अमळनेर तालुक्यातील २१, पारोळा तालुक्यातील पाच गावांतील विहिर अधिग्रहित करण्यात आल्या आहेत.

इन्फो-
टँकरची संख्या वाढली
जिल्हा प्रशासनाकडे पारोळा तालुक्यातील वरखेडेसिम, वाघरा-वाघरी, पोपटनगर, टिहू, भंडणीकर व मंगरुळ या गावांमध्ये टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे. तर अमळनेर तालुक्यातील टाकरखेडा, भोरखेड, कटारे व वामरे तर जळगाव तालुक्यातील देव्हारी या गावांमध्ये यापूर्वी टँकर सुरु होते. पूर्वीचे १२ आणि जामनेर तालुक्यातील पाच अशा १७ गावांमध्ये दहा टँकरच्या साहाय्याने पाणी पुरवठा करण्यात येत आहे.