शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

टंचाईग्रस्त ८३ गावांमध्ये विहिरींचे अधिग्रहण १७ गावांमध्ये टँकर : १४ गावांचा विंधन विहिरीसाठी प्रस्ताव

By admin | Updated: February 3, 2016 00:28 IST

जळगाव : अत्यल्प पावसामुळे यावर्षी जानेवारी महिन्यापासून पाणी टंचाईच्या झळा बसायला लागल्या आहेत. सद्यस्थितीला भीषण टंचाई असलेल्या ८३ गावांमधील विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. तर १७ गावांमध्ये टँकरच्या साहाय्याने पाणी पुरवठा केला जात आहे. जळगाव व बोदवड तालुक्यातील १४ गावांमधून विंधन विहिरींसाठी प्रस्ताव सादर करण्यात आले आहे.

जळगाव : अत्यल्प पावसामुळे यावर्षी जानेवारी महिन्यापासून पाणी टंचाईच्या झळा बसायला लागल्या आहेत. सद्यस्थितीला भीषण टंचाई असलेल्या ८३ गावांमधील विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. तर १७ गावांमध्ये टँकरच्या साहाय्याने पाणी पुरवठा केला जात आहे. जळगाव व बोदवड तालुक्यातील १४ गावांमधून विंधन विहिरींसाठी प्रस्ताव सादर करण्यात आले आहे.
यावर्षी जिल्‘ातील टंचाईसदृष्य गावांची संख्या ५२६ इतकी आहे. जिल्हा प्रशासनाने टंचाई निवारणासाठी टँकरने पाणी वाटप, टंचाई आराखड्यातून पाणी योजना अशा उपाययोजना राबविण्यास सुरुवात केली आहे.

तीन टप्प्यात टंचाईचे नियोजन
टंचाई भासणार्‍या गावांचे जिल्हा प्रशासनाने तीन टप्प्यात नियोजन केले आहे. त्यात ऑक्टोबर ते डिसेंबर २०१५ कालावधीत ४५ गावांचा समावेश होता. जानेवारी ते मार्च या दरम्यान १२२ गावांमध्ये तर एप्रिल ते जून या काळात ३५९ गावांमध्ये पाणी टंचाई भासणार आहे.

धरणगाव व अमळनेरमध्ये सर्वाधिक अधिग्रहण
फेब्रुवारी महिन्यापासून टंचाईच्या झळा तीव्र झाल्यामुळे जिल्हा प्रशासनाने टंचाई निवारणासाठी प्रयत्न सुरु केले आहे. आतापर्यंत ८३ गावांमध्ये विहिर अधिग्रहण करण्यात आले आहे. त्यात जामनेर तालुक्यातील नऊ , धरणगाव तालुक्यातील २२ गावांमधील २३, एरंडोल तालुक्यातील सात, भुसावळ तालुक्यातील चार गावांमधील तीन, बोदवड तालुक्यातील पाच गावांमधील, पाचोरा तालुक्यातील चार, चाळीसगाव तालुक्यातील तीन, भडगाव तालुक्यातील तीन, अमळनेर तालुक्यातील २१, पारोळा तालुक्यातील पाच गावांतील विहिर अधिग्रहित करण्यात आल्या आहेत.

इन्फो-
टँकरची संख्या वाढली
जिल्हा प्रशासनाकडे पारोळा तालुक्यातील वरखेडेसिम, वाघरा-वाघरी, पोपटनगर, टिहू, भंडणीकर व मंगरुळ या गावांमध्ये टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे. तर अमळनेर तालुक्यातील टाकरखेडा, भोरखेड, कटारे व वामरे तर जळगाव तालुक्यातील देव्हारी या गावांमध्ये यापूर्वी टँकर सुरु होते. पूर्वीचे १२ आणि जामनेर तालुक्यातील पाच अशा १७ गावांमध्ये दहा टँकरच्या साहाय्याने पाणी पुरवठा करण्यात येत आहे.