शहरं
Join us  
Trending Stories
1
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
2
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
3
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य
4
डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन यांची भेट भारतासाठी फायदेशीर ठरणार? टॅरिफवर होऊ शकतो मोठा निर्णय!
5
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
6
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
7
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
8
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
9
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
10
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
11
राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता
12
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
13
तीन हजार कोटींचा घोटाळा; परिमॅच अॅपप्रकरणी ११० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई
14
अनिल कुंभारे, नवीनचंद्र रेड्डी यांना राष्ट्रपती पदक जाहीर; महाराष्ट्राच्या ४९ पोलिसांचा गौरव, ७ पोलिसांना शौर्य पदक
15
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
16
वसई-विरार पालिका क्षेत्राची हद्द वाढ; अधिसूचना प्रसिद्ध, अखेर २९ गावांचा महानगरपालिकेत समावेश
17
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
18
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
19
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
20
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला

न्यायालयीन बातमीत आमची नावे नकोत!

By admin | Updated: August 26, 2016 03:58 IST

न्यायालयीन निकालाच्या बातमीत वकिलांची नावे देऊ नयेत, अशी सूचना मद्रास उच्च न्यायालयाच्या मदुराई खंडपीठाने प्रसिद्धीमाध्यमांना केली.

चेन्नई : न्यायालयीन निकालाच्या बातमीत वकिलांची नावे देऊ नयेत, अशी सूचना मद्रास उच्च न्यायालयाच्या मदुराई खंडपीठाने प्रसिद्धीमाध्यमांना केली. वकिलांची नावे प्रसिद्ध केल्यामुळे त्यांच्या व्यावसायिक क्षमतांची अप्रत्यक्ष जाहिरात होते, असे वाटते, त्यामुळे त्यांची नावे छापणे टाळावे, तसेच फारच गरज असेल तरच न्यायाधीशांची नावे प्रसिद्ध करावीत, अन्यथा तेही टाळावे, अशी विनंती प्रसिद्धीमाध्यमांना करण्याची सूचना खंडपीठाने निबंधकांना केली. उच्च न्यायालयातील प्रत्येक न्यायमूर्ती माननीय मुख्य न्यायाधीशांनी नेमून दिल्याबरहुकूम काम करतो. त्यामुळे त्यांची नावेही प्रसिद्ध करण्याची गरज नाही, असेही न्यायमूर्ती एन. राममोहन राव आणि एस. एस. सुंदर यांच्या खंडपीठाने म्हटले. न्यायमूर्ती नि:पक्षपातीपणे त्यांचे कर्तव्य बजावतात आणि त्यांच्यासमोर येणाऱ्या प्रकरणाचा निकाल देताना स्वत:चे मत किंवा विचारसरणीचा निकालावर परिणाम होणार नाही याची दक्षता घेतात. त्यामुळे न्यायमूर्तींची नावे प्रसिद्ध केली जाऊ नयेत. केवळ उच्च न्यायालयाचे नाव तेवढे प्रसिद्ध केले जावे, असेही या खंडपीठाने म्हटले. पुतिया तमिळगम पार्टीशी संबंधित अ‍ॅड. एस. भास्कर मथुराम यांची जनहित याचिका फेटाळून लावताना न्यायालयाने वरील निकाल दिला. (वृत्तसंस्था)>याचिकाकर्त्यावर कारवाईअ‍ॅड. एस. भास्कर यांनी प्रसिद्धीसाठी याचिका केल्याचे नमूद करून खंडपीठाने बार कौन्सिलशी संपर्क साधून, आचारसंहिता आणि व्यावसायिक आचरणाचे उल्लंघन केल्याप्रकरणी भास्कर यांच्याविरुद्ध सहा महिन्यांत कारवाई केली जावी, असेही निबंधकांना सांगितले.