शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

आमचे मौलवी आम्हाला परत करा, भारताची पाकिस्तानला ताकीद

By admin | Updated: March 17, 2017 12:16 IST

भारताने शुक्रवारी पाकिस्तानला सक्त ताकीद देत लाहोरमधून बुधवारी बेपत्ता झालेल्या दोन्ही भारतीय नागरिकांशी संबंधित संपुर्ण माहिती पुरवण्यास सांगितलं आहे

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 17 - हजरत निजामुद्दीन औलिया दर्ग्यातील दोन मौलवी पाकिस्तानध्ये जाऊन बेपत्ता झाल्याचं प्रकरण जोर धरु लागलं आहे. भारताने शुक्रवारी पाकिस्तानला सक्त ताकीद देत लाहोरमधून बुधवारी बेपत्ता झालेल्या दोन्ही भारतीय नागरिकांशी संबंधित संपुर्ण माहिती पुरवण्यास सांगितलं आहे. परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी स्वत: ट्विट करत भारताने पाकिस्तानसमोर हा मुद्दा उपस्थित केल्याचं सांगितलं आहे. दुसरीकडे आसिफ निजामी यांचा मुलगा आमीर निजामी याने सरकारकडे लवकरात लवकर पाऊल उलचण्याची विनंती केली आहे. 
 
आसिफ निजामी आणि त्यांचा भाऊ नाजिम निजामी धार्मिक यात्रेसाठी पाकिस्तानला गेले होते. मात्र बुधवारी अचानक ते बेपत्ता झाले. इस्लामाबादमधील भारतीय राजदूताने पाकिस्तान परराष्ट्र मंत्रालयाकडे यासंबंधी तक्रारदेखील केली. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार दोन्ही मौलवींचं इसीसने अपहरण केल्याची शंका व्यक्त केली जात आहे. मात्र यामागचं कारण कळू शकलेलं नाही. परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी शुक्रवारी सकाळी ट्विट करत माहिती दिली आहे की, 'आम्ही ही मुद्दा पाकिस्तान सरकारसमोर उचलला आहे. आणि त्यांना भारतीय नागरिकांसंबंधी माहिती पुरवण्याचा आग्रह केला आहे'.
 
दरम्यान बेपत्ता झालेल्या मौलवींमधील एक आसिफ निजामी यांचा मुलगा आमीर निजामी याने सरकारकडे लवकरात लवकर कारवाई करण्याची मागणी केली आहे. 'आम्ही भारत सरकारडे दोन्ही बेपत्ता झालेल्यांचा शोध घेण्याची विनंती केली आहे. एका पवित्र यात्रेसाठी ते पाकिस्तानला गेले होते, पण आता त्यांचा शोध लागत नाही आहे. त्यांना लवकरात लवकर परत आणावं अशी आमची विनंती आहे', असं आमीर निजामी बोलला आहे.