शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प प्रशासनाचा नवा नियम! नवीन व्हिसा ऑर्डरनुसार, लठ्ठपणा किंवा मधुमेहामुळे अमेरिकेत प्रवेश मिळणार नाही; इतर आजारांचाही उल्लेख
2
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
3
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
4
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
5
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
6
Women's World Cup : भारताच्या लेकींसह प्रेक्षकांनीही रचला इतिहास; ते पाहून ICC चा ऐतिहासिक निर्णय!
7
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
8
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
9
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
10
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
11
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
12
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
13
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
14
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
15
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
16
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
17
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
18
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
19
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
20
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट

...अन्यथा देशात मार्शल लॉ लागू होईल - सर्वोच्च न्यायालय

By admin | Updated: October 28, 2016 12:29 IST

देशातील सशस्त्र बल केंद्र सरकार किंवा कॅबिनेटला उत्तर देण्यास बांधील असून तसं न केल्यास देशात मार्शल लॉ लागू होऊ शकतो असं सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं आहे

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 28 - देशातील सशस्त्र बल केंद्र सरकार किंवा कॅबिनेटला उत्तर देण्यास बांधील असून तसं न केल्यास देशात मार्शल लॉ लागू होऊ शकतो असं सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं आहे. लष्कराकडून करण्यात येणा-या कारवायांचा राजकीय फायदा घेण्यापासून सरकारला रोखण्यात यावे, तसंच गेल्या महिन्यात झालेल्या सर्जिंकल स्ट्राईकचं श्रेय घेणा-या केंद्रीय संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांच्याविरोधात कारवाई करण्यात यावी अशी याचिका सर्वोच्च न्यायालयात करण्यात आली होती. न्यायालयाने याचिका फेटाळत हे निष्कर्ष नोंदवले आहेत.
 
 
देशातील सशस्त्र बल केंद्र सरकार किंवा कॅबिनेटला उत्तर देण्यास बांधील आहे. तसं न केल्यास देशात मार्शल लॉ लागू होऊ शकतो असं सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं आहे. याचिकाकर्त्याने सशस्त्र बल फक्त राष्ट्रतींना उत्तर देण्यास बांधील असावेत तसंच निर्णयप्रक्रियेत सरकारने सहभागी होऊ नये असंही याचिकेत म्हटलं होतं. 
 
 
29 सप्टेंबर रोजी सर्जिकल स्ट्राईक करण्यात आल्यानंतर मनोहर पर्रीकर यांनी जाहीरपणे यावर वक्तव्य केल्याने त्यांच्यावर विरोधकांकडून टीका करण्यात आली होती. मनोहर पर्रीकरांनी रविवारी पत्रकारांशी बोलताना आपण 'स्ट्राईक' शब्दच वापरणं बंद केलं असल्याचं म्हटलं होतं.
 
 
17 ऑक्टोबर रोजी गुजरातमधील एका कार्यक्रमात बोलताना मनोहर पर्रीकर यांनी सर्जिकल स्ट्राईकचं श्रेय राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला दिलं होतं.  राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ट्रेनिंगमुळेच मी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी सर्जिकल स्ट्राईकसारखा मोठा निर्णय घेऊ शकलो असं ते म्हणाले होते.  या विधानानंतर विरोधी पक्षाकडून पर्रीकरांवर टीकेला सुरुवात झआली. 
१८ सप्टेंबर रोजी बारामुल्ला येथील भारतीय लष्कराच्या उरी ब्रिगेड मुख्यालयावर आत्मघाती सशस्त्र दहशतवाद्यांनी हल्ला चढवला. ज्यामध्ये २० जवान शहीद झाले. 
 
 उरी हल्ल्यानंतर आक्रमक झालेल्या भारताने थेट पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून हल्ला चढवला. भारतीय जवानांनी २८ सप्टेंबरच्या ( बुधवारी) मध्यरात्री पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांच्या ४ तळांवर हल्ले करून  38 ते 40 अतिरेक्यांचा खात्मा केला. हे दहशतवादी भारतात घुसखोरी करून घातपात घडवण्याच्या तयारीत होते, मात्र भारताच्या सर्जिकल स्ट्राईकनंतर दहशतवादी संघटना व पाकिस्तानचे धाबे दणाणले होते. 
 
 भाजपा सरकार सर्जिकल स्ट्राईकचे राजकारण करत असल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात आला. शिवाय, यूपीए सरकारने त्यांच्या काळात सर्जिकल स्ट्राईक केले, मात्र सुरक्षेच्या दृष्टीकोनातून त्यासंदर्भातील माहिती कधीही जाहीर केली नाही, असा दावा काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी केला होता.