शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
3
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
4
पुण्यात वाहतूक पोलीस आणि कॅब चालक यांच्यात वाद; शिवीगाळ करत मारहाण केली; व्हिडीओ व्हायरल
5
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
6
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
7
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
8
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
9
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
10
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
11
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
12
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
13
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
14
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
15
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
16
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
17
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
18
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
19
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
20
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 

...अन्यथा देशात मार्शल लॉ लागू होईल - सर्वोच्च न्यायालय

By admin | Updated: October 28, 2016 12:29 IST

देशातील सशस्त्र बल केंद्र सरकार किंवा कॅबिनेटला उत्तर देण्यास बांधील असून तसं न केल्यास देशात मार्शल लॉ लागू होऊ शकतो असं सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं आहे

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 28 - देशातील सशस्त्र बल केंद्र सरकार किंवा कॅबिनेटला उत्तर देण्यास बांधील असून तसं न केल्यास देशात मार्शल लॉ लागू होऊ शकतो असं सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं आहे. लष्कराकडून करण्यात येणा-या कारवायांचा राजकीय फायदा घेण्यापासून सरकारला रोखण्यात यावे, तसंच गेल्या महिन्यात झालेल्या सर्जिंकल स्ट्राईकचं श्रेय घेणा-या केंद्रीय संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांच्याविरोधात कारवाई करण्यात यावी अशी याचिका सर्वोच्च न्यायालयात करण्यात आली होती. न्यायालयाने याचिका फेटाळत हे निष्कर्ष नोंदवले आहेत.
 
 
देशातील सशस्त्र बल केंद्र सरकार किंवा कॅबिनेटला उत्तर देण्यास बांधील आहे. तसं न केल्यास देशात मार्शल लॉ लागू होऊ शकतो असं सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं आहे. याचिकाकर्त्याने सशस्त्र बल फक्त राष्ट्रतींना उत्तर देण्यास बांधील असावेत तसंच निर्णयप्रक्रियेत सरकारने सहभागी होऊ नये असंही याचिकेत म्हटलं होतं. 
 
 
29 सप्टेंबर रोजी सर्जिकल स्ट्राईक करण्यात आल्यानंतर मनोहर पर्रीकर यांनी जाहीरपणे यावर वक्तव्य केल्याने त्यांच्यावर विरोधकांकडून टीका करण्यात आली होती. मनोहर पर्रीकरांनी रविवारी पत्रकारांशी बोलताना आपण 'स्ट्राईक' शब्दच वापरणं बंद केलं असल्याचं म्हटलं होतं.
 
 
17 ऑक्टोबर रोजी गुजरातमधील एका कार्यक्रमात बोलताना मनोहर पर्रीकर यांनी सर्जिकल स्ट्राईकचं श्रेय राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला दिलं होतं.  राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ट्रेनिंगमुळेच मी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी सर्जिकल स्ट्राईकसारखा मोठा निर्णय घेऊ शकलो असं ते म्हणाले होते.  या विधानानंतर विरोधी पक्षाकडून पर्रीकरांवर टीकेला सुरुवात झआली. 
१८ सप्टेंबर रोजी बारामुल्ला येथील भारतीय लष्कराच्या उरी ब्रिगेड मुख्यालयावर आत्मघाती सशस्त्र दहशतवाद्यांनी हल्ला चढवला. ज्यामध्ये २० जवान शहीद झाले. 
 
 उरी हल्ल्यानंतर आक्रमक झालेल्या भारताने थेट पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून हल्ला चढवला. भारतीय जवानांनी २८ सप्टेंबरच्या ( बुधवारी) मध्यरात्री पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांच्या ४ तळांवर हल्ले करून  38 ते 40 अतिरेक्यांचा खात्मा केला. हे दहशतवादी भारतात घुसखोरी करून घातपात घडवण्याच्या तयारीत होते, मात्र भारताच्या सर्जिकल स्ट्राईकनंतर दहशतवादी संघटना व पाकिस्तानचे धाबे दणाणले होते. 
 
 भाजपा सरकार सर्जिकल स्ट्राईकचे राजकारण करत असल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात आला. शिवाय, यूपीए सरकारने त्यांच्या काळात सर्जिकल स्ट्राईक केले, मात्र सुरक्षेच्या दृष्टीकोनातून त्यासंदर्भातील माहिती कधीही जाहीर केली नाही, असा दावा काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी केला होता.