शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधूंच्या पॅनेलला टक्कर देण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी २ शिलेदारांवर सोपवली जबाबदारी
2
“जालना, मुंबई, दिल्लीत कुठेही आंदोलन कर, पण...”; जरांगेंच्या निर्धारावर भुजबळ स्पष्टच बोलले
3
'दहा मृतदेह आम्ही स्वतःच बाहेर काढले, अजूनही लोक मातीखालीच...'; चशोटीत आक्रोश, मन्न सुन्न करणारे अनुभव
4
शशी थरूर 'क्लीन बोल्ड'! एका तरूणाच्या इंग्रजी ट्विटने काढली 'विकेट', रिप्लाय देत म्हणाले...
5
७ वर्षांनी डोनाल्ड ट्रम्प आणि पुतिन भेट होणार; ३२ हजार सैन्य तैनात, ३०० किमी परिसरात 'नो फ्लाय झोन'
6
"कोणतीही अघोरी शक्ती आली तरी मराठी माणसांची..."; 'या' महापालिकांमध्ये मनसे-शिवसेना एकत्र लढणार?
7
"युवराज्ञींना येणं भाग पडलं...", प्राजक्ता-शंभुराजच्या साखरपुड्याला आली भोसले राजघराण्यातील महत्त्वाची व्यक्ती, अभिनेत्रीची खास पोस्ट
8
सूरज चव्हाणला पक्षात बढती, अजित पवार म्हणतात, "मला माहिती नाही..."; सुनील तटकरेंचा वेगळाच दावा
9
PM मोदींनी सर्व रेकॉर्ड मोडले, लाल किल्ल्यावर १०३ मिनिटे भाषण केले; पाहा, १० मोठे मुद्दे
10
“स्वातंत्र्य चळवळ अन् RSSचा संबंध काय? PM मोदी पुन्हा लाल किल्ल्यावरून खोटे बोलले”: सपकाळ
11
काँग्रेस-NCPशी आघाडी करून मविआत सामील का झालो?; उद्धव ठाकरेंनी सांगितले मोठे ‘राज’कारण
12
VIDEO: ऑलिम्पिक पदकविजेती मनु भाकरने व्हायोलिनवर वाजवलं भारताचं राष्ट्रगीत, होतंय कौतुक
13
मराठीचा उल्लेख करत भारतीय भाषांबाबत लाल किल्ल्यावरून नरेंद्र मोदींनी केलं मोठं विधान, म्हणाले...
14
एकमेव भारतीय क्रिकेटपटू ज्याने १५ ऑगस्ट रोजी ठोकलंय शतक, कोण आहे तो?
15
"साहेब मी जिवंत आहे..."; मतदार यादीत ज्याला मृत घोषित केले, तो थेट निवडणूक कार्यालयात पोहचला
16
"... मग त्यासाठी जितेंद्र आव्हाड शरद पवार यांचा निषेध करणार का?"; भाजपाचा खरमरीत सवाल
17
"राष्ट्रगीत सुरू असताना असं उभं राहतात का?", स्वातंत्र्यदिन साजरा करताना शिल्पा शेट्टीच्या बहिणीकडून मोठी चूक, नेटकऱ्यांनी चांगलंच सुनावलं
18
डबेवाला बांधवांना २५.५० लाखांत ५०० चौरस फुटांचे घर; CM देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा
19
पश्चिम बंगालमध्ये ट्रक आणि बसमध्ये भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, ३० जण जखमी
20
सचिन तेंडुलकरची होणारी सून सानिया, अर्जुन अन् छोटंसं कुत्र्याचं पिल्लू... पाहा UNSEEN PHOTOS

त्रिसदस्यीय वक्फ न्यायाधिकरण नेमण्याचा आदेश

By admin | Updated: December 16, 2015 03:53 IST

वक्फ मालमत्तांसंबंधीचे दावे चालविण्यासाठी एक सदस्यीय न्यायाधिकरणाऐवजी त्रिसदस्यीय न्यायाधिकरण नेमण्याची तरतूद करणारा सुधारित वक्फ कायदा लागू होऊन दोन वर्षे उलटली

नवी दिल्ली : वक्फ मालमत्तांसंबंधीचे दावे चालविण्यासाठी एक सदस्यीय न्यायाधिकरणाऐवजी त्रिसदस्यीय न्यायाधिकरण नेमण्याची तरतूद करणारा सुधारित वक्फ कायदा लागू होऊन दोन वर्षे उलटली तरी अशी नवी न्यायाधीकरणे अद्याप स्थापन न करण्यात आल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त केली असून सर्व राज्यांनी त्रिसदस्यीय न्यायाधिकरण येत्या चार महिन्यांत स्थापन करावीत, असा आदेश दिला आहे.१९९५च्या वक्फ कायद्यात वक्फ मालमत्तांसंबंधीचे दावे चालविण्यासाठी एक सदस्यीय न्यायाधिकरणाची तरतूद होती. महाराष्ट्रात असे एकसदस्यीय न्यायाधिकरण औरंगाबाद येथे आहे. सुधारित वक्फ कायदा १ नोव्हेंबर २०१३ पासून लागू झाला. त्यानुसार जिल्हा न्यायाधीशाच्या अध्यक्षतेखाली त्रिसदस्यीय वक्फ न्यायाधीकरण नेमणे अपेक्षित आहे. मात्र एकाही राज्याने यानुसार त्रिसदस्यीय न्यायाधिकरण नेमलेले नाही. हे लक्षात घेऊन सर्वोच्च न्यायालयाच्या न्या. एम.वाय. इक्बाल व न्या. सी. नागप्पन यांच्या खंडपीठाने वरील आदेश दिला.वक्फ कायद्यात वक्फचे दावे दिवाणी न्यायालयांत चालविण्यास पूर्ण मनाई आहे. त्यामुळे त्रिसदस्यीय न्यायाधिकरण स्थापन केले जाईपर्यंत असे दावे चालविण्याचा सध्याच्या एकसदस्यीय न्यायाधिकरणाचा अधिकार अबाधित राहील,असेही न्यायालयाने स्पष्ट केले.महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळ, मॅग्नम डेव्हलपर्स व इतरांनी केलेल्या अपिलांवर हा निकाल दिला गेला. मुंबई उच्च न्यायालयाच्या एकल न्यायाधीशाने ११ सप्टेंबर रोजी दिलेल्या निकालाविरुद्ध ही अपिले केली गेली होती. उच्च न्यायालयाने असा आदेश दिला होता की, सुधारित कायदा लागू झाल्यापासून औरंगाबाद येथील एक सदस्यीय न्यायाधिकरणाचे अधिकार संपुष्टात आले आहेत. त्यामुळे जोपर्यंत राज्य सरकार त्रिसदस्यीय न्यायाधिकरण स्थापन करीत नाही तोपर्यंत वक्फचे दावे नियमित दिवाणी न्यायालयांत चालतील. तसेच १ नोव्हेंबर २०१३ नंतर एकसदस्यीय न्यायाधिकरणापुढे दाखल झालेले दावेही दिवाणी न्यायालायांकडे वर्ग होतील.उच्च न्यायालयाचा हा निकाल रद्द करताना सर्वोच्च न्यायालयाने म्हटले की,सुधारित वक्फ कायद्यात त्रिसदस्यीय न्यायाधिकरण नेमण्याची तरतूद केली गेली तरी तसे होईपर्यंत एकसदस्यीय न्यायाधिकरण काम करू शकणार नाही, असे त्यात कुठेही म्हटलेले नाही. खास करून वक्फचे दावे दिवाणी न्यायालयात चालविण्यास असलेली मनाई पाहता नवे न्यायाधिकरण स्थापन होईपर्यंत आधीचे न्यायाधिकरणच सुरु ठेवावे लागेल. (विशेष प्रतिनिधी)