शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीपूर्वीच समोर आला धक्कादायक सर्व्हे! महाआघाडीला मोठा झटका, NDA ला किती जागा मिळणार? जाणून थक्क व्हाल!
2
Bihar Election 2025 Date: बिहारमध्ये निवडणुकीचा बिगुल! विधानसभेच्या २४३ जागांसाठी दोन टप्प्यांत मतदान; बालदिनी निकाल
3
“भाजपाने तारखा दिल्या, ज्ञानेश कुमारांनी वाचून दाखवल्या”; बिहार निवडणुकीवरून विरोधकांची टीका
4
बिहारसह ‘या’ ७ ठिकाणी होणार पोटनिवडणुका, निवडणूक आयोगाकडून मतदान, निकालाची तारीख जाहीर
5
आता एका क्लिकवर मिळेल उमेदवारांची संपत्ती आणि गुन्हेगारी रेकॉर्ड; 'हे' ४ ॲप्स लॉन्च!
6
VIDEO: पिल्लासाठी काहीपण... 'बेबी जिराफ'ची आई सिंहिणीला भिडली, जवळ येताच लाथ मारली अन्...
7
सरन्यायाधीश गवईंवर बूट फेकण्याचा प्रयत्न करणारा वकील कोण? कशामुळे हे घडलं?
8
मोठी बातमी! राज्यातील २४७ नगरपालिका, १४७ नगरपंचायतींसाठी आरक्षण जाहीर; कोण मिळवणार सत्तेची खुर्ची?
9
'तुम्ही इतके दिवस कुठे होतात'; मुलांसह लेणीत राहणाऱ्या रशियन महिलेच्या पतीला सर्वोच्च न्यायालयाने झापले
10
ऐकावं ते नवलच! नवरदेवाने हुंडा स्वीकारण्यास दिला नकार, सासऱ्याने मोडलं लग्न; नेमकं काय घडलं?
11
रिलेशनशिपची चर्चा, यशस्वीची ती कथित गर्लफ्रेंड कोण? नात्याबाबत केला मोठा गौप्यस्फोट
12
SIP की RD? दरमहा गुंतवणूक कुठे करावी? तज्ज्ञांच्या मते 'हा' आहे मोठा फरक, निर्णयापूर्वी वाचा महत्त्वाचे मुद्दे
13
'जेव्हा तू खराब फॉर्मशी झुंजशील, तेव्हा..." धोनीनं दिलेला कानमंत्र सिराजसाठी ठरतोय करिअरचा यु-टर्न
14
VIDEO: अमेरिकन बुद्धिबळपटूनं भारताच्या डी. गुकेशच्या 'राजा'ला प्रेक्षकांमध्ये का फेकलं?
15
"मनोज जरांगे पाटील यांनी राहुल गांधींबद्दल वापरलेली भाषा निषेधार्ह, त्यांच्या वक्तव्यांना राजकीय वास’, काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया   
16
"देशात पेरलं जाणारं विष आता...'; सरन्यायाधीशांवर हल्ल्याचा प्रयत्न, शरद पवारांनी व्यक्त केली चिंता
17
आयटी, फार्मा आणि बँकिंग क्षेत्रात तेजी! निफ्टी २५,००० च्या पुढे; गुंतवणूकदारांनी कमावले २.०१ लाख कोटी
18
नवा ट्रेंड! मूल नको, पण कुत्रा-मांजर हवं; मुलांची जागा घेतली प्राण्यांनी, देशात का वाढतंय पेट पॅरेंटिंग?
19
“१९९४ला आमच्या हक्काचे १६ टक्के शरद पवारांनी ओबीसींना दिले, आमचे वाटोळे केले”: मनोज जरांगे
20
’प्रस्तावाची वाट कसली पाहता, अमित शाहांच्या दौऱ्याआधीच शेतकऱ्यांना पॅकेज जाहीर करायला हवे होते’, काँग्रेसचा टोला   

त्रिसदस्यीय वक्फ न्यायाधिकरण नेमण्याचा आदेश

By admin | Updated: December 16, 2015 03:53 IST

वक्फ मालमत्तांसंबंधीचे दावे चालविण्यासाठी एक सदस्यीय न्यायाधिकरणाऐवजी त्रिसदस्यीय न्यायाधिकरण नेमण्याची तरतूद करणारा सुधारित वक्फ कायदा लागू होऊन दोन वर्षे उलटली

नवी दिल्ली : वक्फ मालमत्तांसंबंधीचे दावे चालविण्यासाठी एक सदस्यीय न्यायाधिकरणाऐवजी त्रिसदस्यीय न्यायाधिकरण नेमण्याची तरतूद करणारा सुधारित वक्फ कायदा लागू होऊन दोन वर्षे उलटली तरी अशी नवी न्यायाधीकरणे अद्याप स्थापन न करण्यात आल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त केली असून सर्व राज्यांनी त्रिसदस्यीय न्यायाधिकरण येत्या चार महिन्यांत स्थापन करावीत, असा आदेश दिला आहे.१९९५च्या वक्फ कायद्यात वक्फ मालमत्तांसंबंधीचे दावे चालविण्यासाठी एक सदस्यीय न्यायाधिकरणाची तरतूद होती. महाराष्ट्रात असे एकसदस्यीय न्यायाधिकरण औरंगाबाद येथे आहे. सुधारित वक्फ कायदा १ नोव्हेंबर २०१३ पासून लागू झाला. त्यानुसार जिल्हा न्यायाधीशाच्या अध्यक्षतेखाली त्रिसदस्यीय वक्फ न्यायाधीकरण नेमणे अपेक्षित आहे. मात्र एकाही राज्याने यानुसार त्रिसदस्यीय न्यायाधिकरण नेमलेले नाही. हे लक्षात घेऊन सर्वोच्च न्यायालयाच्या न्या. एम.वाय. इक्बाल व न्या. सी. नागप्पन यांच्या खंडपीठाने वरील आदेश दिला.वक्फ कायद्यात वक्फचे दावे दिवाणी न्यायालयांत चालविण्यास पूर्ण मनाई आहे. त्यामुळे त्रिसदस्यीय न्यायाधिकरण स्थापन केले जाईपर्यंत असे दावे चालविण्याचा सध्याच्या एकसदस्यीय न्यायाधिकरणाचा अधिकार अबाधित राहील,असेही न्यायालयाने स्पष्ट केले.महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळ, मॅग्नम डेव्हलपर्स व इतरांनी केलेल्या अपिलांवर हा निकाल दिला गेला. मुंबई उच्च न्यायालयाच्या एकल न्यायाधीशाने ११ सप्टेंबर रोजी दिलेल्या निकालाविरुद्ध ही अपिले केली गेली होती. उच्च न्यायालयाने असा आदेश दिला होता की, सुधारित कायदा लागू झाल्यापासून औरंगाबाद येथील एक सदस्यीय न्यायाधिकरणाचे अधिकार संपुष्टात आले आहेत. त्यामुळे जोपर्यंत राज्य सरकार त्रिसदस्यीय न्यायाधिकरण स्थापन करीत नाही तोपर्यंत वक्फचे दावे नियमित दिवाणी न्यायालयांत चालतील. तसेच १ नोव्हेंबर २०१३ नंतर एकसदस्यीय न्यायाधिकरणापुढे दाखल झालेले दावेही दिवाणी न्यायालायांकडे वर्ग होतील.उच्च न्यायालयाचा हा निकाल रद्द करताना सर्वोच्च न्यायालयाने म्हटले की,सुधारित वक्फ कायद्यात त्रिसदस्यीय न्यायाधिकरण नेमण्याची तरतूद केली गेली तरी तसे होईपर्यंत एकसदस्यीय न्यायाधिकरण काम करू शकणार नाही, असे त्यात कुठेही म्हटलेले नाही. खास करून वक्फचे दावे दिवाणी न्यायालयात चालविण्यास असलेली मनाई पाहता नवे न्यायाधिकरण स्थापन होईपर्यंत आधीचे न्यायाधिकरणच सुरु ठेवावे लागेल. (विशेष प्रतिनिधी)