शहरं
Join us  
Trending Stories
1
ENG vs IND : टीम इंडियाच्या ५ शतकांवर फेरलं पाणी! हेडिंग्लेचं मैदान मारत इंग्लंडची मालिकेत आघाडी
2
अमेरिका-कतार भूमिकेचे स्वागत, संवादास पर्याय नाही; इराण-इस्रायल युद्धविरामावर भारताचे भाष्य
3
ENG vs IND : टीम इंडिया कुठं कमी पडली? जाणून घ्या हेडिंग्लेच्या मैदानातील पराभवामागची पाच कारणं
4
“शेतकऱ्यांचा तीव्र विरोध, शक्तिपीठ महामार्ग आम्ही कदापि होऊ देणार नाही”; राजू शेट्टी ठाम
5
अहमदाबाद विमान अपघातात किती लोकांचा मृत्यू झाला? सरकारने जाहीर केली अधिकृत आकडेवारी
6
“मला शक्य तितक्या लवकर सर्वकाही शांत झालेले पाहायचे आहे”; ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
हल्ला थांबवू शकत नाही, इराणला प्रत्युत्तर देणे गरजेचे..; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर नेतन्याहूंचे उत्तर
8
ENG vs IND : अंपायरसमोर जड्डूचं तेवर! विकेटमागून पंतनही घेतली फिरकी! मैदानात नेमकं काय घडलं?
9
“देशभरात मराठी भाषा लागू करणार का?”; हिंदी सक्तीवरुन मनोज जरांगेंचा सरकारला थेट सवाल
10
ENG vs IND : शार्दुल ठाकूरची कमाल! २ चेंडूत २ विकेट्स घेत टेस्ट मॅचमध्ये आणलं ट्विस्ट
11
Viral Video : एक बाईक अन् १० लोक! दुचाकीस्वाराचा जुगाड बघून डोकं चक्रावेल
12
ENG vs IND : प्रसिद्ध कृष्णानं बॅक टू बॅक ओव्हरमध्ये २ विकेट्स मिळवत टीम इंडियाला दिला मोठा दिलासा
13
शक्तिपीठ महामार्गाला मंजुरी, २० हजार कोटींची तरतूद; GSTत बदल होणार, मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय
14
“वायनाडमध्ये वाढलेले मतदार लोकशाही, महाराष्ट्रात वाढले तर चोरी?”; BJPचा राहुल गांधींना सवाल
15
“झूठ बोले कौवा काटे”; राहुल गांधींच्या आरोपांना CM फडणवीसांचे उत्तर, सगळी आकेडवारीच दिली
16
मुंबईतील बड्या उद्योजकाचे गुप्त ‘महादान’; अयोध्येतील राम मंदिराला तब्बल १७५ किलो सोने अर्पण
17
यशस्वी जैस्वाल पुन्हा चुकला! चौथा कॅच सोडला अन् इंग्लंडला दुसरा शतकवीर मिळाला
18
EPFO ची मोठी घोषणा; आता मिळणार ५ लाख रुपयांपर्यंतचा अ‍ॅडव्हान्स PF, जाणून घ्या...
19
डोनाल्ड ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इस्रायलने केला इराणवर हल्ला, तेहरान स्फोटांनी हादरले!
20
आधी सेलिब्रेशन! आता 'रेड अलर्ट' Look सह शुबमन गिलमध्ये दिसली विराटची झलक

त्रिसदस्यीय वक्फ न्यायाधिकरण नेमण्याचा आदेश

By admin | Updated: December 16, 2015 03:53 IST

वक्फ मालमत्तांसंबंधीचे दावे चालविण्यासाठी एक सदस्यीय न्यायाधिकरणाऐवजी त्रिसदस्यीय न्यायाधिकरण नेमण्याची तरतूद करणारा सुधारित वक्फ कायदा लागू होऊन दोन वर्षे उलटली

नवी दिल्ली : वक्फ मालमत्तांसंबंधीचे दावे चालविण्यासाठी एक सदस्यीय न्यायाधिकरणाऐवजी त्रिसदस्यीय न्यायाधिकरण नेमण्याची तरतूद करणारा सुधारित वक्फ कायदा लागू होऊन दोन वर्षे उलटली तरी अशी नवी न्यायाधीकरणे अद्याप स्थापन न करण्यात आल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त केली असून सर्व राज्यांनी त्रिसदस्यीय न्यायाधिकरण येत्या चार महिन्यांत स्थापन करावीत, असा आदेश दिला आहे.१९९५च्या वक्फ कायद्यात वक्फ मालमत्तांसंबंधीचे दावे चालविण्यासाठी एक सदस्यीय न्यायाधिकरणाची तरतूद होती. महाराष्ट्रात असे एकसदस्यीय न्यायाधिकरण औरंगाबाद येथे आहे. सुधारित वक्फ कायदा १ नोव्हेंबर २०१३ पासून लागू झाला. त्यानुसार जिल्हा न्यायाधीशाच्या अध्यक्षतेखाली त्रिसदस्यीय वक्फ न्यायाधीकरण नेमणे अपेक्षित आहे. मात्र एकाही राज्याने यानुसार त्रिसदस्यीय न्यायाधिकरण नेमलेले नाही. हे लक्षात घेऊन सर्वोच्च न्यायालयाच्या न्या. एम.वाय. इक्बाल व न्या. सी. नागप्पन यांच्या खंडपीठाने वरील आदेश दिला.वक्फ कायद्यात वक्फचे दावे दिवाणी न्यायालयांत चालविण्यास पूर्ण मनाई आहे. त्यामुळे त्रिसदस्यीय न्यायाधिकरण स्थापन केले जाईपर्यंत असे दावे चालविण्याचा सध्याच्या एकसदस्यीय न्यायाधिकरणाचा अधिकार अबाधित राहील,असेही न्यायालयाने स्पष्ट केले.महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळ, मॅग्नम डेव्हलपर्स व इतरांनी केलेल्या अपिलांवर हा निकाल दिला गेला. मुंबई उच्च न्यायालयाच्या एकल न्यायाधीशाने ११ सप्टेंबर रोजी दिलेल्या निकालाविरुद्ध ही अपिले केली गेली होती. उच्च न्यायालयाने असा आदेश दिला होता की, सुधारित कायदा लागू झाल्यापासून औरंगाबाद येथील एक सदस्यीय न्यायाधिकरणाचे अधिकार संपुष्टात आले आहेत. त्यामुळे जोपर्यंत राज्य सरकार त्रिसदस्यीय न्यायाधिकरण स्थापन करीत नाही तोपर्यंत वक्फचे दावे नियमित दिवाणी न्यायालयांत चालतील. तसेच १ नोव्हेंबर २०१३ नंतर एकसदस्यीय न्यायाधिकरणापुढे दाखल झालेले दावेही दिवाणी न्यायालायांकडे वर्ग होतील.उच्च न्यायालयाचा हा निकाल रद्द करताना सर्वोच्च न्यायालयाने म्हटले की,सुधारित वक्फ कायद्यात त्रिसदस्यीय न्यायाधिकरण नेमण्याची तरतूद केली गेली तरी तसे होईपर्यंत एकसदस्यीय न्यायाधिकरण काम करू शकणार नाही, असे त्यात कुठेही म्हटलेले नाही. खास करून वक्फचे दावे दिवाणी न्यायालयात चालविण्यास असलेली मनाई पाहता नवे न्यायाधिकरण स्थापन होईपर्यंत आधीचे न्यायाधिकरणच सुरु ठेवावे लागेल. (विशेष प्रतिनिधी)