शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
2
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
3
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
4
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
5
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
6
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
7
उच्च न्यायालयाची नवी इमारत न्यायमंदिर व्हावे; सरन्यायाधीशांच्या हस्ते वास्तूचे भूमिपूजन
8
एशियाटिक अध्यक्षपदासाठी २ माजी खासदार आमनेसामने; लढतीबाबत उत्सुकता
9
इंडक्शन कुकिंग वापरणाऱ्यांना फूटपाथवर अन्न शिजवण्यास मनाईचे ते परिपत्रक गैरलागू: हायकाेर्ट
10
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
11
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
12
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
13
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
14
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
15
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
16
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
17
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
18
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
19
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
20
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका

विरोधी पक्षनेतेपदाचा निर्णय गुलदस्त्यातच

By admin | Updated: July 6, 2014 01:18 IST

नव्या लोकसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सोमवार 7 जुलैपासून सुरु होत असले तरी सभागृहातील विरोधी पक्षनेतेपदाचा निर्णय अद्याप झालेला नाही.

नवी दिल्ली : नव्या लोकसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सोमवार 7 जुलैपासून सुरु होत असले तरी सभागृहातील विरोधी पक्षनेतेपदाचा निर्णय अद्याप झालेला नाही. काँग्रेसने या पदासाठी आग्रही धरून त्यासाठी करायच्या दाव्याचा मुद्देसूद युक्तिवादाचा आराखडा तयार केला असला तरी या पक्षाने विरोधी पक्षनेतेपदावर अद्याप औपचारिक दावा केला नसल्याने त्यावर निर्णय घेण्याचा सध्या तरी प्रश्न येत नाही, अशी मोदी सरकारची भूमिका असल्याचे सूत्रंकडून सांगण्यात आले.
नियमानुसार विरोधी पक्षनेतेपदाचा अधिकृत दर्जा मिळण्यासाठी संबंधित पक्षाकडे सभागृहाच्या एकूण सदस्यसंख्येच्या किमान 1क् टक्के सदस्य असावे लागतात. पण काँग्रेसचे संख्याबळ फक्त 44 असल्याने त्यांना हे पद देता येणार नाही, अशी सत्ताधारी अघाडीच्या नेत्यांनी याआधीच मांडली आहे. याउलट काँग्रेसचे म्हणणो असे की, 1क् टक्के सदस्यसंख्येचे बंधन कुठेही नाही. कायद्यानुसार हे पद सभागृहातील सर्वात मोठय़ा विरोधी पक्षाला मिळायला हवे. अधिकृत विरोधी पक्षनेता नसला तरी सभागृहाचे कामकाज चालविण्यात अडचण नसली तरी लोकपाल, सीबीआयचे संचालक, मानवी हक्क व माहिती आयोगांचे सदस्य, संसदीय महासचिव इत्यादींच्या निवड समितीत विरोधी पक्षनेत्याचा समावेश असल्याने काँग्रेस या पदासाठी आग्रह धरत आहे.  ते दिले नाही तर मोदी सरकार लोकशाहीविरोधी व हेकेखोर असल्याची टीका करण्याची संधी काँग्रेसला मिळणार आहे.
संसदीय अधिवेशनाच्या पाश्र्वभूमीवर शनिवारी झालेल्या सर्वपक्षीय बैठकीनंतर लोकसभा अध्यक्षा सुमित्र महाजन यांनी याविषयीच्या प्रश्नांना उत्तर देण्याचे टाळले. घटनातज्ज्ञ व अनुभवी पूर्वसूरींशी चर्चा करून आपण अधिवेशनापूर्वी निर्णय घेऊ, असे महाजन याआधी म्हणाल्या होत्या. सभागृहातील काँग्रेसचे नेते मल्लिकाजरुन खारगे याआधी महाजन यांना भेटले होते, पण ती केवळ सदिच्छा भेट होती, असे ते म्हणाले होते. शनिवारच्या सर्वपक्षीय बैठकीतही हा विषय चर्चेला नव्हता, असे ते म्हणाले.
या पदावर औपचारिक दावा करण्यासाठी काँग्रेस लोकसभा अध्यक्षांना पत्र लिहिणार का, असे विचारता पक्षाचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला म्हणाले की, पक्षाध्यक्षा सोनिया गांधी व उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्याशी सल्लामसलत करून दोन्ही सभागृहातील पक्षाचे नेते याविषयीचा निर्णय घेतील. (लोकमत न्यूज नेटवर्क)
 
च्सभागृहाच्या एकूण सदस्यसंख्येच्या किमान 1क् टक्के सदस्य असावे लागतात. पण काँग्रेसचे संख्याबळ फक्त 44 असल्याने त्यांना हे पद देता येणार नाही, अशी सत्ताधारी अघाडीच्या नेत्यांनी याआधीच मांडली आहे.