शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
2
जयंत पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार?; CM फडणवीस विधानसभेतच बोलले, म्हणाले, 'हे कठीणच झालंय'
3
इशान किशनला टीम इंडियापाठोपाठ आणखी एका संघातूनही डच्चू मिळण्याची शक्यता
4
बाजार गडगडला! एकाच दिवसात गुंतवणूकदारांचे २.५७ लाख कोटी बुडाले, फक्त 'हे' ५ शेअर्स वाढले
5
चीनकडून कोण चोरतंय रेअर अर्थ मेटल? का उडालीये ड्रॅगनची झोप, काय आहे प्रकरण?
6
"आमदार माजलेत असं बाहेर म्हटलं जातंय, राजकारणाच्या पलीकडे जाणार की नाही?"; CM फडणवीसांनी विरोधकांना सुनावलं
7
"पटोलेंनी उल्लेख केलेली व्यक्ती काँग्रेसचीच"; हनी ट्रॅपची कुठलीही तक्रार नसल्याचे CM फडणवीसांचे स्पष्टीकरण
8
"ये लातों के भूत हैं, बातों से मानेंगे नहीं...!"; मोहरम आणि श्रावणाचा उल्लेख करत मुख्यमंत्री योगींचं मोठं विधान
9
"विधानसभेतील राडा हा जाणीवपूर्वक दहशत निर्माण करण्याचा प्रकार’’, बाळासाहेब थोरात यांची टीका 
10
"जितेंद्र आव्हाड राजकारणातून बाहेर पडले तर मला आवडेल, कारण...", पत्नी ऋता नेमकं काय म्हणाल्या?
11
सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल, १० ग्रॅमसाठी किती खर्च करावा लागणार; चांदीत ₹१३०० ची तेजी
12
Sara Ali Khan : फॅट टू फिट! ९६ किलो वजनाच्या साराने कसं कमी केलं तब्बल ४५ किलो वजन? 'हे' आहे टॉप सीक्रेट
13
'करेंगे दंगे चारों ओर', महाराष्ट्र विधानसभेतील हाणामारीवर कुणाल कामराने टीका केली; व्हिडीओ व्हायरल
14
Lunchbox Recipe: झटपट तयार होणारी 'पडवळ करी' एकदा ट्राय करा, दोन घास जास्तच जातील!
15
पाकव्याप्त काश्मीरमध्ये दिसला मसूद अजहर; आता बिलावल भुट्टो आपला शब्द खरा करणार का?
16
विदेशी सट्टेबाजांचा वायदे बाजारावर डाव, छोट्या गुंतवणूकदारांनो सजगतेनं करा बचाव!
17
विधिमंडळ परिसरात धक्काबुक्की प्रकरणी विधानसभा अध्यक्षांनी निर्णय दिला, दोषींवर होणार अशी कारवाई 
18
सोन्याची झळाळी कमी होणार, चांदीची चमक मात्र वाढणार; १३ टक्क्यांच्या तेजीचा अंदाज, किती जाऊ शकतो भाव?
19
शाहरुख खानच्या मेकअप रुमबाहेर काढला फोटो, मराठी अभिनेत्रीने व्यक्त केला आनंद
20
"मोदींच्या नेतृत्वाखाली २०२९ निवडणूक लढवावी लागणे ही भाजपची मजबुरी"; भाजप खासदाराचे विधान

विरोधी पक्षनेतेपदाचा निर्णय गुलदस्त्यातच

By admin | Updated: July 6, 2014 01:18 IST

नव्या लोकसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सोमवार 7 जुलैपासून सुरु होत असले तरी सभागृहातील विरोधी पक्षनेतेपदाचा निर्णय अद्याप झालेला नाही.

नवी दिल्ली : नव्या लोकसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सोमवार 7 जुलैपासून सुरु होत असले तरी सभागृहातील विरोधी पक्षनेतेपदाचा निर्णय अद्याप झालेला नाही. काँग्रेसने या पदासाठी आग्रही धरून त्यासाठी करायच्या दाव्याचा मुद्देसूद युक्तिवादाचा आराखडा तयार केला असला तरी या पक्षाने विरोधी पक्षनेतेपदावर अद्याप औपचारिक दावा केला नसल्याने त्यावर निर्णय घेण्याचा सध्या तरी प्रश्न येत नाही, अशी मोदी सरकारची भूमिका असल्याचे सूत्रंकडून सांगण्यात आले.
नियमानुसार विरोधी पक्षनेतेपदाचा अधिकृत दर्जा मिळण्यासाठी संबंधित पक्षाकडे सभागृहाच्या एकूण सदस्यसंख्येच्या किमान 1क् टक्के सदस्य असावे लागतात. पण काँग्रेसचे संख्याबळ फक्त 44 असल्याने त्यांना हे पद देता येणार नाही, अशी सत्ताधारी अघाडीच्या नेत्यांनी याआधीच मांडली आहे. याउलट काँग्रेसचे म्हणणो असे की, 1क् टक्के सदस्यसंख्येचे बंधन कुठेही नाही. कायद्यानुसार हे पद सभागृहातील सर्वात मोठय़ा विरोधी पक्षाला मिळायला हवे. अधिकृत विरोधी पक्षनेता नसला तरी सभागृहाचे कामकाज चालविण्यात अडचण नसली तरी लोकपाल, सीबीआयचे संचालक, मानवी हक्क व माहिती आयोगांचे सदस्य, संसदीय महासचिव इत्यादींच्या निवड समितीत विरोधी पक्षनेत्याचा समावेश असल्याने काँग्रेस या पदासाठी आग्रह धरत आहे.  ते दिले नाही तर मोदी सरकार लोकशाहीविरोधी व हेकेखोर असल्याची टीका करण्याची संधी काँग्रेसला मिळणार आहे.
संसदीय अधिवेशनाच्या पाश्र्वभूमीवर शनिवारी झालेल्या सर्वपक्षीय बैठकीनंतर लोकसभा अध्यक्षा सुमित्र महाजन यांनी याविषयीच्या प्रश्नांना उत्तर देण्याचे टाळले. घटनातज्ज्ञ व अनुभवी पूर्वसूरींशी चर्चा करून आपण अधिवेशनापूर्वी निर्णय घेऊ, असे महाजन याआधी म्हणाल्या होत्या. सभागृहातील काँग्रेसचे नेते मल्लिकाजरुन खारगे याआधी महाजन यांना भेटले होते, पण ती केवळ सदिच्छा भेट होती, असे ते म्हणाले होते. शनिवारच्या सर्वपक्षीय बैठकीतही हा विषय चर्चेला नव्हता, असे ते म्हणाले.
या पदावर औपचारिक दावा करण्यासाठी काँग्रेस लोकसभा अध्यक्षांना पत्र लिहिणार का, असे विचारता पक्षाचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला म्हणाले की, पक्षाध्यक्षा सोनिया गांधी व उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्याशी सल्लामसलत करून दोन्ही सभागृहातील पक्षाचे नेते याविषयीचा निर्णय घेतील. (लोकमत न्यूज नेटवर्क)
 
च्सभागृहाच्या एकूण सदस्यसंख्येच्या किमान 1क् टक्के सदस्य असावे लागतात. पण काँग्रेसचे संख्याबळ फक्त 44 असल्याने त्यांना हे पद देता येणार नाही, अशी सत्ताधारी अघाडीच्या नेत्यांनी याआधीच मांडली आहे.