शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

राज्यसभेत नोटाबंदीवर विरोधकांचा हल्लाबोल

By admin | Updated: November 17, 2016 04:42 IST

मोदी सरकारने देशात आर्थिक अराजकतेचे वातावरण तयार केले आहे. कोट्यवधी लोक दिवसभर बँकांसमोर रांगेत उभे आहेत. त्यांचे पैसे काळे नाहीत.

सुरेश भटेवरा / नवी दिल्ली मोदी सरकारने देशात आर्थिक अराजकतेचे वातावरण तयार केले आहे. कोट्यवधी लोक दिवसभर बँकांसमोर रांगेत उभे आहेत. त्यांचे पैसे काळे नाहीत. ती त्यांच्या कष्टाची कमाई आहे. आपलेच पैसे बदलण्यासाठी देशभर आक्रोश व संताप आहे. जनतेच्या कष्टाच्या कमाईवर नोटबंदीची कुऱ्हाड चालवण्याचा अधिकार मोदी सरकारला कोणत्या कायद्याने दिला, असा सवाल विचारत, राज्यसभेतील काँग्रेसचे उपनेते आनंद शर्मा यांनी प्रत्येक गोष्टीवर सर्जिकल स्ट्राइक्सची हौस भागवणाऱ्या मोदी सरकारमध्ये डॉक्टरची पदवी नसलेल्या अनेक सर्जन्सचा सुळसुळाट झाला आहे, असा हल्ला चढवला.स्थगन प्रस्ताव मांडताना आनंद शर्मा म्हणाले, मोदी सरकारला चेक आणि प्लॅस्टिक करन्सीत सारा व्यवहार हवा आहे. देशात केवळ २.६ कोटी लोकच डेबिट अथवा क्रेडिट कार्ड वापरतात. कोणताही शेतकरी धोतराला क्रेडिट कार्ड बांधून हिंडत नाही. देशातले ८0 टक्के लोक रोख पैशातच व्यवहार करतात. स्वीस बँकेत, एचएसबीसी बँकेत, टॅक्स हेवन देशात कोणाचे किती काळे पैसे दडले आहेत, त्याची यादी सरकारकडे आहे. सरकार ती यादी जाहीर का करीत नाही? त्यांच्यावर कारवाई का करीत नाही, दहशतवादी कधी बँकेच्या रांगेत उभे राहतात काय? ५ दिवसांपासून रांगेत जे उभे आहेत ते आहेत प्रामाणिक निरपराध सामान्यजन. त्यांचा छळ कितीकाळ सरकार करणार आहे? कर्नाटकात भाजप नेत्याने मुलीच्या लग्नासाठी ५00 कोटी रूपये उधळले, हे पैसे त्याने कुठून आणले? असे सवाल करीत शर्मा म्हणाले की, सरकारने त्याला विचारले नाही अथवा अटकही करीत नाही. हवालदिल जनतेला आठवड्याभरात पंतप्रधानांनी पाच प्रवचने ऐकवली. टीव्ही सुरू केला की सतत पंतप्रधानांचे दर्शन घडते.२0१४ च्या लोकसभा निवडणुकीत, मोदींच्या प्रचारमोहिमेवर २५ हजार कोटींचा खर्च झाला, असे अनेक परदेशी राजदूत सांगतात. या अवाढव्य खर्चासह अगदी परवाच्या गाझीपूर येथील मोदींच्या सभेचा खर्च क्रेडिट कार्डव्दारे केला काय असा माझा थेट सवाल आहे. देशात बनावट नोटा नेमक्या किती? आॅगस्टमध्ये अर्थमंत्र्यांनी संसदेत त्याचे जे उत्तर दिले, त्यानुसार देशाच्या चलनात बनावट नोटांचे प्रमाण अवघे 0.0२ टक्के आहे. चलनातल्या ८५ टक्के नोटांवर त्यासाठी बंदी घालणे कितपत उचित होते, याचे उत्तर सरकारला द्यावेच लागेल, असेही ते म्हणाले.सीताराम येचुरी म्हणाले, पंतप्रधानांनी ज्या कारणांसाठी नोटबंदीचा निर्णय जाहीर केला, त्यात काळ्या पैशावर प्रहार, बनावट नोटा बाहेर काढणे, दहशतवाद्यांची रसद रोखणे, भ्रष्टाचार थांबवणे अशी प्रमुख कारणे सांगितली. प्रत्यक्षात यापैकी एकही गोष्ट यशस्वी होण्याची चिन्हे दिसत नाहीत. गरीब लोकांना मात्र सरकारने संकटात टाकले. देशातले ८६ टक्के चलन बाद केल्यामुळे अवघ्या १४ टक्के चलनावर हा देश सध्या मार्गक्रमण करीत आहे. शरद यादव म्हणाले, नाशवंत वस्तुंची वाहतूक करणारे लाखो ट्रक्स रस्त्यांवर उभे आहेत. बाजारात वैध चलन उपलब्ध नसल्यामुळे दुकाने, रस्ते, बाजारपेठा ओस पडल्या आहेत. खरीप पिकांचे भाव पडले आहेत. रब्बी पिकांसाठी बियाणे आणि खते खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांकडे पैसे नाहीत. शेतकऱ्याची अवस्था भिकाऱ्यासारखी झाली आहे. या वादग्रस्त निर्णयाची व त्यानंतर उद्भवलेल्या स्थितीची चौकशी करण्यासाठी संयुक्त संसदीय समितीची नियुक्ती करा, अशी मागणीही शरद यादवांनी केली.मायावती म्हणाल्या, नोटबंदीच्या निर्णयानंतर झोपडीत रहाणारा, मजुरी करणारा गरीब माणूस कसा जगेल, कोणत्या संकटांचा त्याला सामना करावा लागेल, याचा जरासाही विचार न करता, कोणतीही पूर्वतयारी नसतांना अत्यंत घिसाडघाईने हा निर्णय लागू करण्यात आल्याची टीका केली. अर्थमंत्र्यांनाही या निर्णयाबाबत पंतप्रधानांनी अंधारात ठेवले असे त्यांच्या चेहऱ्यावरून स्पष्टपणे जाणवत आहे, असे सांगून आर्थिक आणीबाणीसारखी स्थिती देशात निर्माण का झाली, याच्या कारणांचा शोध घेण्यासाठी संसदेची संयुक्त संसदीय समिती नियुक्त केली पाहिजे.