शहरं
Join us  
Trending Stories
1
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
2
Sangamner Nagar Parishad Election Result 2025: संगमनेरमध्ये पुन्हा 'तांबे-थोरात' पॅटर्न; डॉ. मैथिली तांबे महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्याने विजयी
3
Khed Nagar Parishad Election Result 2025: “कोकणातील विजय हा मुंबई मनपा विजयाची नांदी”; एकनाथ शिंदे यांच्या शिलेदाराचे मोठे भाकित
4
एका आठवड्यात चांदी १६ हजारांनी महागली; वर्षात दिला १२६% परतावा, सोन्याची काय स्थिती?
5
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील २४६ नगरपरिषदांमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
6
IND vs PAK U19 Asia Cup: कोण आहे Sameer Minhas? ज्यानं दोन वेळा मोडला वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड
7
सावधान! तुमचं बँक खातंही होऊ शकतं रिकामं! आधार कार्ड सुरक्षित ठेवण्यासाठी करा 'बायोमॅट्रिक लॉक'
8
Maharashtra Election Results 2025: भाजपाचं 'शतक', ठाकरेसेना सगळ्यात मागे; सर्वाधिक नगराध्यक्ष कुणाचे? शिंदे-अजितदादांमध्ये 'टफ फाइट'
9
Loha Nagar Parishad Election Result 2025: लोह्यात भाजपाला घराणेशाहीचा मोठा फटका; एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव
10
'आता तरी आपली लायकी ओळखावी' ; परळीतील विजयानंतर धनंजय मुंडेंची खा. सोनवणेंवर टीका
11
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: राज्यात शिवसेनेची जोरदार फाईट, भाजपाही मजबूत; उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला किती जागा? जाणून घ्या
12
भोकरदनमध्ये दानवे पिता-पुत्रांना मोठा धक्का, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या समरीन मिर्जा विजयी; भाजपला किती जागा मिळाल्या? 
13
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 : 'एकदम ओक्के'! सर्वांनी एकट पाडलं, पण शहाजीबापूंनी मैदान मारलं; सांगोल्यात शिवसेनेचा मोठा विजय
14
Nitesh Rane: निवडणुका संपल्या, आता...; सिंधुदुर्गातील निकाल स्पष्ट होताच नितेश राणे म्हणाले...
15
Shahada Nagar Parishad Election Results 2025: २९ पैकी २० जागा भाजपाने जिंकल्या, पण नगराध्यक्षद जनता विकास आघाडीकडे
16
Bhagur Nagar Parishad Election Result 2025: २७ वर्षांची शिवसेनेची सत्ता गेली, भगूरमध्ये अजित पवार गटाचा मोठा विजय; ‘अशी’ झाली लढत!
17
Kankavali Nagar Parishad Election Result 2025: कणकवलीत भाजपा मंत्री नितेश राणेंना मोठा धक्का; शहर विकास आघाडीचे संदेश पारकर विजयी
18
Georai Nagar Parishad Election Result 2025: गेवराईत भाजपचे कमळ फुलले; नगराध्यक्षपदाच्या उमेदवार गीता पवार विजयी
19
शूटिंग करताना अक्षय खन्नाला 'या' गोष्टीचा होतो त्रास, 'धुरंधर' अभिनेता म्हणाला- "रात्रीच्या वेळी मला..."
Daily Top 2Weekly Top 5

बाद नोटा जमा करण्याची संधी?

By admin | Updated: July 5, 2017 05:33 IST

नोटाबंदीमध्ये चलनातून बाद केलेल्या एक हजार व ५०० रुपयांच्या नोटा ज्यांना अडचणीमुळे ठरलेल्या मुदतीत बँकेत जमा करणे शक्य

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : नोटाबंदीमध्ये चलनातून बाद केलेल्या एक हजार व ५०० रुपयांच्या नोटा ज्यांना अडचणीमुळे ठरलेल्या मुदतीत बँकेत जमा करणे शक्य झाले नाही त्यांना या नोटा जमा करण्यासाठी आणखी एक संधी द्यायला हवी, अशी आग्रही भूमिका सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी घेतली. सरकारनेही यावर विचार करण्याची तयारी दर्शविली. त्यानुसार याचा निर्णय घेण्यासाठी न्यायालयाने केंद्र सरकार व रिझर्व्ह बँकेस दोन आठवड्यांची मुदत दिली.नोटाबंदीच्या निर्णयानुसार भारतीय नागरिकांना बाद नोटा बँकांमध्ये जमा करून त्यापैकी ठरावीक रकमेच्या नोटा बदलून घेण्यासाठी ३१ डिसेंबर २०१६ पर्यंतची मुदत दिली गेली होती. मात्र अनिवासी भारतीय नागरिक व या काळात परदेशात गेलेल्या नागरिकांना अशा नोटा जमा करण्याची मुदत ३१ मार्च २०१७पर्यंत ठेवली गेली होती.ही मुदत टळून गेल्यानंतर अनेक भागांत नागरिक नानाविध अडचणींच्या सबबी देत नोटा जमा करण्यासाठी बँकांमध्ये गेले होते. परंतु ठरावीक मुदतीत नोटा जमा करण्याच्या या नियमाला अपवाद नाही, असे सांगून त्यांना परत पाठविले. अशा काही व्यक्ती व परभणीच्या शेतकऱ्याने एप्रिलमध्ये याचिका केल्या तेव्हा न्यायालयाने त्या उन्हाळी सुटीनंतर ठेवल्या होत्या. या याचिका मंगळवारी सरन्यायाधीश न्या. जगदीश सिंग केहार, न्या. संजय कृष्ण कौल व न्या. डॉ. धनंजय चंद्रचूड यांच्या खंडपीठापुढे आल्या तेव्हाही सरकारने नन्नाचा पाढा सुरू ठेवला.सरकारचा पवित्रा बदललान्यायालयाचा पवित्रा पाहून सॉलिसिटर जनरल रणजित कुमार मवाळ झाले व त्यांनी तडजोडीचा फॉर्म्युला सुचविला. ते म्हणाले की, न्यायालयाने बाद नोटा जमा करण्यासाठी सरसकट संधी देण्याचा आदेश देऊ नये. अशा प्रकरणांचा गुणवत्तेवर निर्णय घेण्याचा विचार होईल. सरकारची बदललेली भूमिका लक्षात घेऊन न्यायालयाने ही मर्यादित संधी कशी द्यायची हे नक्की करण्यासाठी सरकार व रिझर्व्ह बँकेस दोन आठवड्यांची वेळ दिली.परभणीच्या शेतकऱ्यांची याचिका नोटाबंदीच्या काळात सोयाबीनचे साडेपाच लाख रु पये घेऊन जात असताना ते निवडणूक प्रचारासाठी चालले असल्याच्या संशयातून प्राप्तिकर विभागाने पकडले होते. हे पैसे त्यांना प्राप्तिकर विभागाने ९ जानेवारीला परत केले. तोपर्यंत ३० डिसेंबरची मुदत उलटून गेली होती. या प्रकरणी अ‍ॅड. दिलीप तौर यांच्यामार्फत शेतकऱ्यांनी याचिका दाखल केली आहे. पुढील सुनावणी १८ जुलैला होणार आहे....तर तुम्ही दार बंद करू शकत नाहीतन्यायालयाने म्हटले की, नागरिकांचा घामाचा पैसा तुम्ही अशा प्रकारे कवडीमोल करू शकत नाही. एखादी व्यक्ती ठरलेल्या वेळात नोटा जमा करायला खरोखर अडचण होती असे सांगत असेल व ती अडचण खरी असल्याचे तो सिद्ध करून देत असेल, तर त्याला तुम्ही दार बंद करू शकत नाही. नागरिकांच्या एका वर्गास वाढीव मुदत दिल्याने अडचण सांगणाऱ्या या लोकांनाही संधी देण्याचा विचार करावा लागेल.