शहरं
Join us  
Trending Stories
1
"मृत डॉक्टर तरुणीला तिच्यावर कोणत्या ठिकाणी बलात्कार झाले, हे..."; आरोपी गोपाळ बदनेच्या वकिलने कोर्टात काय म्हटलं?
2
Womens World Cup 2025: पावसाचा 'षटकार'; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सेमीफायनलआधी टीम इंडियाला मोठा धक्का
3
Buldhana Crime: पुण्यावरून गावी निघाला अन् बापाने चिमुकल्या जुळ्या मुलींचा गळा चिरून केला खून
4
दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला, ओळखीतल्याच तरुणाचं भ्याड कृत्य 
5
भारत-ऑस्ट्रेलियात नवी मुंबईमध्ये सेमीफायनल रंगणार, पावसामुळे सामना रद्द झाल्यास कोण फायनलमध्ये जाणार?
6
Nanded Crime: "मंगल माझ्याशी लग्न कर"; प्रेयसीकडे लावला तगादा, तिने नकार देताच संपवलं
7
Bihar Election: आजी-माजी आमदार, माजी मंत्र्यांसह १६ जणांची पक्षातून हकालपट्टी, नितीश कुमारांचा तडाखा
8
मतदार याद्यांत घोळ, मतचोरीचे आरोप, निवडणूक आयोग मोठा निर्णय घेणार, उद्या संध्याकाळी घोषणा करणार
9
मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात 'रेल्वेला कवच'; आमला-परासिया मार्गावर झाली ट्रायल
10
पंकजा मुंडे यांचा मनोज जरांगेंना मैत्रीचा प्रस्ताव; म्हणाल्या, "आपल्या समाजांमधील दरी..."
11
"मुख्यमंत्रिपदाला जो नडला तो फोडला, अब तेरा क्या होगा मुरली ?’’ सुषमा अंधारेंचा खोचक टोला  
12
अजबच... असं कसं घडलं...? अल्बानियाची AI मंत्री 'डिएला' 'प्रेग्नेंट'! एकाच वेळी 83 बाळांना देणार जन्म
13
दिवाळी-छठपूजा उत्सवासाठी नागपूरहून पुणे, मुंबईकरिता स्पेशल ट्रेन, मध्य रेल्वेचा निर्णय, सोमवारी महाराष्ट्रात एकाच दिवशी २३ स्पेशल ट्रेन
14
कोण असणार देशाचे पुढचे सरन्यायाधीश? CJI बीआर गवईंनी केली घोषणा
15
Phaltan Doctor Death: पंढरपुरातून पळाला, बीडमध्ये गेला अन्...; 48 तासात PSI गोपाळ बदने कुठे कुठे लपला?
16
ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर 'निवृत्ती'? 'सिडनीला शेवटचा निरोप...'! भारतात  परतण्यापूर्वीच रोहित शर्माची भावनिक पोस्ट
17
"सत्तेत आलो तर आम्ही वक्फ कायदा कचऱ्याच्या डब्यात फेकून देऊ..."; तेजस्वी यादव यांचे जाहीर सभेत आश्वासन
18
नशेमुळे झाला कुर्नूल बस अपघात; चूक कुणाची? बाइकस्वारांची की बस ड्रायव्हरची? खुद्द डीआयजींनीच केला खुलासा
19
पनवेलमधील उपजिल्हा रुग्णालयात मृतदेहांची अदलाबदल, अंत्यसंस्कारही झाले, चूक कोणाची? समोर आली धक्कादायक माहिती
20
'मला थोडीशी शंका असती तरी कार्यक्रमाला आलो नसतो'; फडणवीसांनी रणजितसिंह निंबाळकरांना जाहीर सभेत स्पष्टच सांगितले

स्वच्छ भारत की फोटोची संधी?

By admin | Updated: May 31, 2016 06:01 IST

सरकारचा महत्त्वाकांक्षी उपक्रम ‘स्वच्छ भारत अभियान’, आजमितीला भाजपा, केंद्र सरकार आणि सत्ताधाऱ्यांच्या समर्थकांसाठी केवळ छायाचित्र संधी अभियान ठरले आहे.

सुरेश भटेवरा,  नवी दिल्लीमोदी सरकार द्वैवार्षिक कारकिर्द पूर्ण करीत असताना, सरकारचा महत्त्वाकांक्षी उपक्रम ‘स्वच्छ भारत अभियान’, आजमितीला भाजपा, केंद्र सरकार आणि सत्ताधाऱ्यांच्या समर्थकांसाठी केवळ छायाचित्र संधी अभियान ठरले आहे. देशभर सर्वत्र आजही कचऱ्याचे साम्राज्य आहे. ग्रामीण भारतात १२ कोटी शौचालयांची आवश्यकता आहे, त्यापैकी २ वर्षांत ८0 लाख शौचालये बांधून तयार आहेत. यापैकी अनेक शौचालयांत पाण्याची उपलब्धता नाही त्यामुळे त्यांचा वापर होत नाही. शौचालयांच्या बांधकामाची आकडेवारी मात्र कागदावर वाढते आहे.समस्त भारताला मलविसर्जनाच्या घाणीतून मुक्त करणे, शहरे, गावे, रस्ते, कॉलन्या, उद्याने, मैदाने व निवासी परिसरात लक्षणीय स्वच्छतेचा प्रभाव दिसू लागणे, अधिक निरोगी जीवनमान लोकांना अनुभवता यावे, या उद्देशाने सुरू करण्यात आलेले ‘स्वच्छ भारत अभियान’ मोदी सरकारचे महत्त्वाकांक्षी अभियान आहे. महात्मा गांधींच्या १९५व्या जयंतीदिनी २ आॅक्टोबर २0१४ रोजी पंतप्रधान मोदींनी स्वत: हातात झाडू घेऊन या अभियानाचा दिल्लीच्या राजघाटावर प्रारंभ केला. ५ वर्षे अत्यंत कसोशीने पाठपुरावा करून, गांधीजींच्या १५0व्या जयंतीदिनी या अभियानाद्वारे सारा भारत स्वच्छ व सुंदर करण्याचा पंतप्रधानांचा संकल्प आहे.स्वच्छ भारत अभियानाला मूर्त स्वरूप देण्यासाठी काही लाख कोटींच्या निधीची आवश्यकता आहे. सरकारने त्यासाठी विद्यमान करप्रणालीत अतिरिक्त 0.५ टक्के स्वच्छता सेस लागू केला आहे. अभियानात आर्थिक गुंतवणूक करण्यात येणाऱ्या रकमेवर करातून १00 टक्के वजावाटीची सूटही जाहीर झाली आहे. कॉर्पोरेट कंपन्यांच्या सीएसआर फंडातला ३0 टक्के निधी या अभियानाकडे वळवण्याच्या दिशेने काम सुरू झाले. देशातले ३0 लाखांहून अधिक सरकारी कर्मचारी, अनेक स्वयंसेवी संस्था, शाळा व महाविद्यालयांचे कोट्यवधी विद्यार्थी, कॉर्पोरेट क्षेत्रातल्या नामवंत कंपन्या, चित्रपट कलावंत इत्यादींच्या सक्रिय सहभागाने हे अभियान वाजत गर्जत सुरू करण्यात आले.सुरुवातीचा उत्साही भर ओसरताच आज सामसूम आहे. कंपन्यांचे उत्पादन थंडावल्यामुळे अभियानाचा निधी थांबला आहे. सार्वजनिक स्वच्छता, मलनिस्सारण, सांडपाण्याच्या रिसायकलिंगसह पुनर्वापर करण्याच्या योजनांबाबत नगरपालिका, महापालिका व अन्य स्थानिक स्वराज्य संस्थांकडे पुरेसा निधी नाही. ही योजना दिखावू छायाचित्रांपुरतीच मर्यादित आहे.