शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
4
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
5
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
6
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
7
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
8
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
9
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
10
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
11
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
12
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
13
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
14
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
15
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
16
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
17
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
18
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
19
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
20
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग

भूसंपादन विधेयकावर विरोधक आक्रमक

By admin | Updated: February 25, 2015 02:01 IST

वादग्रस्त भूसंपादन विधेयकावर विरोधकांनी एकजूट दाखवत आक्रमक धोरण अवलंबल्यामुळे राज्यसभेत अल्पमतात असलेल्या मोदी सरकारने नमते घेत सर्व पक्षांसोबत चर्चेची तयारी दर्शविली आहे.

नवी दिल्ली : वादग्रस्त भूसंपादन विधेयकावर विरोधकांनी एकजूट दाखवत आक्रमक धोरण अवलंबल्यामुळे राज्यसभेत अल्पमतात असलेल्या मोदी सरकारने नमते घेत सर्व पक्षांसोबत चर्चेची तयारी दर्शविली आहे.विधेयक शेतकरीविरोधी असून केवळ कंपनी व कार्पोरेट जगताच्या भल्यासाठी असल्याचा आरोप करीत मंगळवारी काँग्रेस, डावे पक्ष, तृणमूल काँग्रेस, समाजवादी पक्ष, बसपा आणि संजदच्या खासदारांनी सरकारची चांगलीच कोंडी केली. एक तास संतप्त चर्चा चालल्यानंतर या मुद्यावर सर्व पक्षांशी चर्चा करण्याबाबत मी संबंधित मंत्र्याला भावना कळविणार असल्याचे आश्वासन राज्यसभेतील नेते अरुण जेटली यांनी दिले.विकासात्मक कार्यक्रम राबविताना शेतकऱ्यांचे हित जोपासत मार्ग काढण्यासाठी सर्व पक्षांसोबत सरकारने चर्चा करावी, संसदेत कोंडी निर्माण होऊ नये,असे समाजवादी पक्षाचे रामगोपाल यादव यांनी म्हटले. सर्वपक्षांची सहमतीची गरज लक्षात घेता जेटलींनी पुढील पाऊल उचलण्याची गरज असल्याचे काँग्रेसचे उपनेते आनंद शर्मा यांनी म्हटले. जेटली म्हणाले, स्वातंत्र्यापासून एकूण ६३९ वटहुकूम जारी झाले असून त्यातील ८० टक्के वटहुकूम काँग्रेसच्या राजवटीतील आहेत.