शहरं
Join us  
Trending Stories
1
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
2
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
3
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
4
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
5
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
6
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
7
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
8
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
9
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
10
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."
11
वादळी वाऱ्याने लग्नाचा मंडप उडाला; नवरदेव-नवरीला चिखलातून खांद्यावर न्यावे लागले
12
Raigad Accident: रायगडमध्ये विचित्र अपघात, भरधाव टेम्पोची सायकलसह दोन वाहनांना धडक, ३ जण ठार
13
“आमच्याकडे आजही सगळे नियोजन, महिलांना ३ हजार रुपये देऊ शकतो”; ठाकरे गटाचा मोठा दावा
14
बलुचिस्तानमधील बोलान येथे पाकिस्तानी सैन्याच्या वाहनावर हल्ला, एका अधिकाऱ्यासह ६ सैनिकांचा मृत्यू 
15
MI vs GT : 'पॉवरप्ले'मध्ये DSP सिराजचा धाक! पहिल्याच ओव्हरमध्ये साधला विकेट्सचा डाव
16
मशिदीत होता हजारोंचा जमाव, मौलानाने विचारलं भारताविरोधात कोण लढणार? हात वर करा, मग घडलं असं काही...
17
"धोनीसाठी हे सगळं करण्यात आलंय..."; सुनील गावसकरांचा IPL 2025च्या नियमावरून प्रचंड संताप
18
चीनला मोठा धक्का; iPhone चे सर्व मॉडेल्स भारतात तयार होणार, केंद्रीय मंत्र्यांची माहिती...
19
“आमचा युद्धसराव झालेला आहे, महापालिका निवडणुकांसाठी तयार”; संजय राऊतांचा निर्धार
20
वैभव सूर्यवंशी नंतर आणखी एका 14 वर्षीय स्फोटक खेळाडूने झळकावले द्विशतक, कोण आहे तो?

साध्वींच्या राजीनाम्यासाठी विरोधक आक्रमक

By admin | Updated: December 3, 2014 01:33 IST

केंद्रीय अन्नप्रक्रिया राज्यमंत्री साध्वी निरंजन ज्योती यांनी केलेल्या वादग्रस्त विधानामुळे विरोधक आक्रमक बनले असून त्यांच्या राजीनाम्याच्या मागणीवरून प्रथमच सरकारची संसदेत कसोटी लागणार आहे.

हरीश गुप्ता, नवी दिल्लीकेंद्रीय अन्नप्रक्रिया राज्यमंत्री साध्वी निरंजन ज्योती यांनी केलेल्या वादग्रस्त विधानामुळे विरोधक आक्रमक बनले असून त्यांच्या राजीनाम्याच्या मागणीवरून प्रथमच सरकारची संसदेत कसोटी लागणार आहे.साध्वींनी संसदेत माफी मागितली आणि लोकसभेचे कामकाज सुरळीत झाले मात्र सरकारचे संख्याबळ कमी असलेल्या राज्यसभेचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब झाले. साध्वींच्या विधानामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी कमालीचे नाराज झाले असून त्यांनी देशाला संबोधित करण्याचे काम तुम्ही करू नका, यापुढे अशा प्रकारची बेशिस्त खपवून घेतली जाणार नाही, असा इशाराच पक्षखासदारांना दिला आहे. पंतप्रधानांच्या निवेदनामुळे विरोधकांची नाराजी कमी झालेली नाही. विरोधकांना राज्यसभेत एकवटण्याची संधीही यानिमित्ताने मिळाली आहे. राज्यसभेतील अल्पमत विचारात घेत अरुण जेटली यांनी साध्वी निरंजन ज्योती यांना माफी मागायला लावली. साध्वींनी लोकसभेतही माफी मागत या प्रकणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.विरोधक एकवटले...राहुल गांधी यांच्या नेतृत्वात काँग्रेसने संसदेत आणि बाहेर निदर्शने करीत आक्रमकता दाखविली असतानाच समाजवादी पक्ष, बसपा, संजद, तृणमूल काँग्रेस, डावे पक्ष आणि अन्य पक्षांची एकजूट झाल्याचे दिसून आले. राज्यसभेत विरोधक भक्कम झाल्याचे दिसून आले. साध्वींनी राजीनामा दिल्याखेरीज सभागृहाचे कामकाज होऊ देणार नाही, असा इशारा काँग्रेसने दिला आहे. संतापजनक विधानतुम्हाला रामजाद्यांचे सरकार हवे की हरामजाद्यांचे असे विधान साध्वींनी दिल्लीत प्रचारसभेत केले होते. साध्वींनी गुन्हा केला असून याप्रकरणी तपास पूर्ण होईपर्यंत त्या मंत्रिपदावर कायम राहू शकत नाही, असे माकपचे नेते सीताराम येचुरी यांनी म्हटले. साध्वींनी संसदेत कोणतेही आक्षेपार्ह विधान केलेले नाही. बाहेर केलेल्या विधानाबद्दल त्यांनी माफीही मागितली आहे, असे सांगत जेटलींनी विरोधकांना शांत करण्याचा प्रयत्न केला. > दिल्लीकरांनी मत देताना ‘रामाचा सुपुत्र ’आणि ‘अनौरस’ यापैकी एकाची निवड करावी, असे वक्तव्य साध्वींनी केले होते. लोकसभा आणि राज्यसभेत विरोधकांनी ज्योती यांच्या या वादग्रस्त वक्तव्याचा तीव्र शब्दांत निषेध केला़ तसेच ज्योती यांना बडतर्फ करण्याची मागणी लावून धरली़ या गोंधळामुळे दोन्ही सभागृहाचे कामकाज अनेकदा तहकूब करावे लागले़> लोकसभेत काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी हा मुद्दा उपस्थित करीत कार्यस्थगनाचा प्रस्ताव मांडला़ मंत्र्यांचे वक्तव्य आक्षेपार्ह आहे़ देशात जातीय तणाव असताना एका जबाबदार मंत्र्यांने असे वक्तव्य करणे गैर आहे़ याबाबत त्यांनी माफी मागावी, असे ते म्हणाले़ पण लोकसभाध्यक्षांनी कार्यस्थगनाचा प्रस्ताव नामंजूर केला़ बसपा प्रमुख मायावती व माकपा नेते सीताराम येचुरी यांनी साध्वी निरंजन ज्योतींविरुद्ध एफआयआर दाखल करण्याची मागणी केली़