शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
4
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
5
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
6
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
7
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
8
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
9
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
10
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
11
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
12
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
13
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
14
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
15
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
16
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
17
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
18
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
19
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
20
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
Daily Top 2Weekly Top 5

ऑपरेशन गुरदासपूर संपले , तिन्ही दहशतवाद्यांना कंठस्नान

By admin | Updated: July 27, 2015 18:01 IST

लष्कराच्या गणवेशात आलेल्या तिन्ही दहशतवाद्यांना तब्बल १० तासानंतर कंठस्नान घालण्यात सुरक्षा यंत्रणांना यश आले आहे.

ऑनलाइन लोकमत
गुरूदासपूर, दि. २७ - पंजाबमधील गुरदासपूर येथील पोलिस ठाण्यावर हल्ला करणा-या तिघा दहशतवाद्यांना तब्बल १० तासांच्या मोहीमेनंतर कंठस्नान घालण्यात सुरक्षा यंत्रणांना यश आले आहे. या दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात चार पोलिस शहीद झाले असून तिघा नागरिकांचा मृत्यू झाला आहे. 
 
सोमवारी सकाळी सहाच्या सुमारास पाकिस्तानमधून पठाणकोट या भारतीय सीमेवरील गावातून तिघे दहशतवादी सैन्याच्या गणवेषात भारतात घुसले. तिथून त्यांनी जबरदस्तीने एक मारूती कार ताब्यात घेतली आणि राज्य सरकारच्या एका बसवर अंदाधुंद गोळीबार केला. यानंतर या दहशतवाद्यांनी एका पोलीस ठाण्यावर हल्ला चढवला. यापूर्वी दहशतवाद्यांनी दीनानगर- पठाणकोट रेल्वे मार्गावर पेरलेले ५ जिवंत बाँब हस्तगत करण्यात आले असून ते निकामी करण्यात यश आल्याने मोठा अनर्थ टळला. पोलिस ठाण्यालगच्या एका इमारतीमध्ये हे तिघे दहशतवादी लपून बसले होते. यानंतर पंजाब पोलिसांच्या जवानांनी या इमारतीला चोहोबाजूंनी वेढा घातला. एनएसजी व स्वॅटचे (विशेष शस्त्र व धोरण पथक) जवानही घटनास्थळी दाखल झाले. तब्बल १० तासाहून अधिक वेळ सुरक्षा दलाचे जवान व दहशतवादी यांच्यात चकमक सुरु होती. संध्याकाळी साडे चारच्या सुमारास तिस-या दहशतवाद्याला कंठस्नान घालण्यात यश आले व जवानांनी 'जो बोले सो निहाल' अशी घोषणा देत ऑपरेशन गुरदासपूर संपल्याचा इशाराच दिला. या हल्ल्यात गुरूदासपूरचे जिल्हा पोलिस अधिक्षक बलजीत सिंह शहीद झाले आहेत.
दरम्यान, या हल्ल्यानंतर  गुप्तचर विभागाने  महाराष्ट्रातील काही शहरांना दहशतवादी हल्ल्याचा धोका असल्याचे म्हटले आहे. मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर आदी मोठ्या शहरांना हाय अॅलर्टचा इशारा देण्यात आला आहे.  पंजाबमध्ये गेल्या आठ वर्षातील हा पहिलाच दहशतवादी हल्ला आहे.