शहरं
Join us  
Trending Stories
1
"विरोधकांच्या ‘लवंग्या-सुरसुरी’चा धुरळा, महायुतीचा ‘ॲटम बॉम्ब’ फुटला की..."; एकनाथ शिंदेंचा इशारा
2
उपोषणकर्त्याला घरी का बोलवलं? संजय शिरसाट म्हणाले, "माझा आणि त्याचा प्रवासाचा वेळ सारखा होता"
3
दिवाळीनिमित्त राहुल गांधी पोहोचले मिठाईच्या दुकानात, स्वत: बनवली इमरती आणि बेसनाचे लाडू
4
Sanjay Nirupam: "राज ठाकरेंनी नवा छंद जोपासलाय, ते...", संजय निरुपम नेमकं काय बोलून गेले? पाहा
5
"युद्ध थांबवण्याची खरी वेळ...!" रशिया-युक्रेन युद्धावर झेलेंस्की यांचं मोठं विधान
6
Diwali Bonus: मुंबई विमानतळावरील कामगारांची दिवाळी दणक्यात, मिळाला 'इतका' बोनस!
7
Laxmi Pujan 2025 Wishes: लक्ष्मी पूजनाच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी ग्रीटिंग्स, Images, Facebook, Whatsapp Status द्वारा द्या मंगलमय दिवसाच्या शुभेच्छा!
8
चीनचा अमेरिकेला आणखी एक झटका; ७ वर्षात पहिल्यांदा असं काही घडलं, डोनाल्ड ट्रम्प चिंतेत पडले
9
OLA कंपनीतील कर्मचाऱ्यानं उचललं टोकाचं पाऊल, २८ पानी अखेरची चिठ्ठी सापडली; मालकावर FIR दाखल
10
पुढच्या वर्षी 1.60 लाखपर्यंत पोहोचू शकतं सोनं; चांदी कितीपर्यंत वधारणार? जाणून डोळे फिरतील!
11
टायर बनवणाऱ्या कंपनीच्या शेअरनं घेतला रॉकेट स्पीड, q2 च्या रिझल्टने गुंतवणूकदार खुश!
12
Bihar Election 2025: लालूंच्या राजदची यादी आली! काँग्रेसविरोधात तीन जागांवर उमेदवार दिले, तेजस्वी यादव राघोपूरमधून लढणार...
13
दिवाळीच्या दिवशी शेअर बाजाराचा 'जोश हाय'; Nifty २५,८४३ वर बंद, उद्या मुहूर्त ट्रेडिंग
14
Manu Garg : करून दाखवलं! आठवीत असताना गमावली दृष्टी, आईच्या साथीने रचला इतिहास, झाला अधिकारी
15
पाण्याच्या पाटावरून वाहिले रक्ताचे पाट, भीषण गोळीबार, २ जणांचा मृत्यू, ३ जखमी 
16
मेडिकल कॉलेजमध्ये MBBS च्या जागा वाढल्या, आता एवढ्या विद्यार्थ्यांना मिळणार प्रवेश, महाराष्ट्रात किती वाढल्या?
17
Laxmi Pujan 2025: स्थिर लक्ष्मी हवी? लक्ष्मीपूजन करताना झाडू आणि खडे मीठाने करा 'हा' खास उपाय!
18
बाथरूममध्ये कॅमेरा लपवला, आंघोळ करताना मेहुणीचा व्हिडीओ बनवला अन्...; भावोजीच्या कृत्याने कुटुंबाला धक्का बसला 
19
रेखा झुनझुनवाला यांनी 'या' शेअरमधून मिनिटांत कमावले ₹६७ कोटी, एक्सपर्ट म्हणाले ₹२५० रुपयांपर्यंत जाणार भाव!
20
IND vs AUS: रोहित शर्मा दुसऱ्या वनडेत रचणार इतिहास; करणार विराट-सचिनलाही न जमलेला विक्रम

ऑपरेशन गुरदासपूर संपले , तिन्ही दहशतवाद्यांना कंठस्नान

By admin | Updated: July 27, 2015 18:01 IST

लष्कराच्या गणवेशात आलेल्या तिन्ही दहशतवाद्यांना तब्बल १० तासानंतर कंठस्नान घालण्यात सुरक्षा यंत्रणांना यश आले आहे.

ऑनलाइन लोकमत
गुरूदासपूर, दि. २७ - पंजाबमधील गुरदासपूर येथील पोलिस ठाण्यावर हल्ला करणा-या तिघा दहशतवाद्यांना तब्बल १० तासांच्या मोहीमेनंतर कंठस्नान घालण्यात सुरक्षा यंत्रणांना यश आले आहे. या दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात चार पोलिस शहीद झाले असून तिघा नागरिकांचा मृत्यू झाला आहे. 
 
सोमवारी सकाळी सहाच्या सुमारास पाकिस्तानमधून पठाणकोट या भारतीय सीमेवरील गावातून तिघे दहशतवादी सैन्याच्या गणवेषात भारतात घुसले. तिथून त्यांनी जबरदस्तीने एक मारूती कार ताब्यात घेतली आणि राज्य सरकारच्या एका बसवर अंदाधुंद गोळीबार केला. यानंतर या दहशतवाद्यांनी एका पोलीस ठाण्यावर हल्ला चढवला. यापूर्वी दहशतवाद्यांनी दीनानगर- पठाणकोट रेल्वे मार्गावर पेरलेले ५ जिवंत बाँब हस्तगत करण्यात आले असून ते निकामी करण्यात यश आल्याने मोठा अनर्थ टळला. पोलिस ठाण्यालगच्या एका इमारतीमध्ये हे तिघे दहशतवादी लपून बसले होते. यानंतर पंजाब पोलिसांच्या जवानांनी या इमारतीला चोहोबाजूंनी वेढा घातला. एनएसजी व स्वॅटचे (विशेष शस्त्र व धोरण पथक) जवानही घटनास्थळी दाखल झाले. तब्बल १० तासाहून अधिक वेळ सुरक्षा दलाचे जवान व दहशतवादी यांच्यात चकमक सुरु होती. संध्याकाळी साडे चारच्या सुमारास तिस-या दहशतवाद्याला कंठस्नान घालण्यात यश आले व जवानांनी 'जो बोले सो निहाल' अशी घोषणा देत ऑपरेशन गुरदासपूर संपल्याचा इशाराच दिला. या हल्ल्यात गुरूदासपूरचे जिल्हा पोलिस अधिक्षक बलजीत सिंह शहीद झाले आहेत.
दरम्यान, या हल्ल्यानंतर  गुप्तचर विभागाने  महाराष्ट्रातील काही शहरांना दहशतवादी हल्ल्याचा धोका असल्याचे म्हटले आहे. मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर आदी मोठ्या शहरांना हाय अॅलर्टचा इशारा देण्यात आला आहे.  पंजाबमध्ये गेल्या आठ वर्षातील हा पहिलाच दहशतवादी हल्ला आहे.