शहरं
Join us  
Trending Stories
1
पायलटकडूनच मोठी चूक? दोन्ही इंजिनांचा इंधनपुरवठा सेकंदाच्या फरकाने झाला बंद
2
आजचे राशीभविष्य, १३ जुलै २०२५ : आज आर्थिक गुंतवणूक विचार पूर्वक करा
3
तीन वेळा पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केलेली, जयंत पाटलांचा राजीनामा? राष्ट्रवादी, भाजप म्हणतेय...
4
म्हाडाची जाहिरात आली; ५,२८५  घरांची लॉटरी, या दिवशी होणार बुकिंगला सुरुवात...
5
शत्रूचं ड्रोन ५ लाखांचं, पाडायला लागते १० लाखांचं मिसाइल...; ब्रिगेडिअरनी सांगितला ऑपरेशन सिंदूरचा खर्च...
6
मंत्री शिरसाट म्हणाले...पैशांची एखादी बॅग देऊ, आजकल हमारा नाम बहुत चल रहा है 
7
मेक इन इंडियाचे १०वे वर्ष;  येणार १०० रुपयांचे नाणे; कोलकाता टाकसाळीमध्ये तयार होणार विशेष नाणे
8
नवी मुंबई विमानतळाला ३० सप्टेंबरची डेडलाइन; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सिडको, अदानी समूहाला निर्देश
9
खंडाळा घाटातील ‘मिसिंग लिंक’ नोव्हेंबरपर्यंत सुरू करा; मुख्यमंत्र्यांचे आदेश
10
ईडी आरोपपत्रात रोहित पवारांचे नाव; २०२४ मध्येच चौकशी
11
बूट घ्यायलाही पैसे नव्हते; चिखलात सराव केला...
12
भारतीय न्यायव्यवस्थेपुढे अनोखी आव्हाने; सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केली खंत
13
दुर्घटनेला महिना उलटला तरी अजूनही प्रवासी, नातेवाईक धास्तावलेलेच...
14
पोलंडची इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी क्वीन
15
बुमराहला रोखण्याच्या नादात इंग्लंड स्वत: अडकला जाळ्यात!
16
ड्युक्स चेंडूंची समस्या म्हणजे ‘मार पायाला आणि मलम डोक्याला!’, टिकतच नाहीय...
17
विमानतळावर येताच तपासणी; बॅगेत सापडले प्राणी-पक्षी
18
सोने आणखी किती भाव खाणार? २०११ सारखीच वाढ, कशाचे संकेत...
19
आमदार, मंत्र्यांना ठोकमध्ये नाइट ड्रेस घेऊन दिले तर..?
20
‘सीसीएमपी’वरून वैद्यकीय क्षेत्रात गोंधळ

ऑपरेशन गुरदासपूर संपले , तिन्ही दहशतवाद्यांना कंठस्नान

By admin | Updated: July 27, 2015 18:01 IST

लष्कराच्या गणवेशात आलेल्या तिन्ही दहशतवाद्यांना तब्बल १० तासानंतर कंठस्नान घालण्यात सुरक्षा यंत्रणांना यश आले आहे.

ऑनलाइन लोकमत
गुरूदासपूर, दि. २७ - पंजाबमधील गुरदासपूर येथील पोलिस ठाण्यावर हल्ला करणा-या तिघा दहशतवाद्यांना तब्बल १० तासांच्या मोहीमेनंतर कंठस्नान घालण्यात सुरक्षा यंत्रणांना यश आले आहे. या दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात चार पोलिस शहीद झाले असून तिघा नागरिकांचा मृत्यू झाला आहे. 
 
सोमवारी सकाळी सहाच्या सुमारास पाकिस्तानमधून पठाणकोट या भारतीय सीमेवरील गावातून तिघे दहशतवादी सैन्याच्या गणवेषात भारतात घुसले. तिथून त्यांनी जबरदस्तीने एक मारूती कार ताब्यात घेतली आणि राज्य सरकारच्या एका बसवर अंदाधुंद गोळीबार केला. यानंतर या दहशतवाद्यांनी एका पोलीस ठाण्यावर हल्ला चढवला. यापूर्वी दहशतवाद्यांनी दीनानगर- पठाणकोट रेल्वे मार्गावर पेरलेले ५ जिवंत बाँब हस्तगत करण्यात आले असून ते निकामी करण्यात यश आल्याने मोठा अनर्थ टळला. पोलिस ठाण्यालगच्या एका इमारतीमध्ये हे तिघे दहशतवादी लपून बसले होते. यानंतर पंजाब पोलिसांच्या जवानांनी या इमारतीला चोहोबाजूंनी वेढा घातला. एनएसजी व स्वॅटचे (विशेष शस्त्र व धोरण पथक) जवानही घटनास्थळी दाखल झाले. तब्बल १० तासाहून अधिक वेळ सुरक्षा दलाचे जवान व दहशतवादी यांच्यात चकमक सुरु होती. संध्याकाळी साडे चारच्या सुमारास तिस-या दहशतवाद्याला कंठस्नान घालण्यात यश आले व जवानांनी 'जो बोले सो निहाल' अशी घोषणा देत ऑपरेशन गुरदासपूर संपल्याचा इशाराच दिला. या हल्ल्यात गुरूदासपूरचे जिल्हा पोलिस अधिक्षक बलजीत सिंह शहीद झाले आहेत.
दरम्यान, या हल्ल्यानंतर  गुप्तचर विभागाने  महाराष्ट्रातील काही शहरांना दहशतवादी हल्ल्याचा धोका असल्याचे म्हटले आहे. मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर आदी मोठ्या शहरांना हाय अॅलर्टचा इशारा देण्यात आला आहे.  पंजाबमध्ये गेल्या आठ वर्षातील हा पहिलाच दहशतवादी हल्ला आहे.