शहरं
Join us  
Trending Stories
1
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
2
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
3
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
4
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
5
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
6
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
7
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
8
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
9
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
10
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
11
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
12
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
13
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
14
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)
15
अमेरिकेचा डबल गेम! आधी इराणवर हल्ला, निर्बंध लादले; आता करणार ३० बिलियन डॉलर्सची मदत
16
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
17
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
18
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
19
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात! मर्सिडीजने तीनवेळी पलटी मारली; नाशिकच्या उद्योजकाचा मृत्यू
20
ठाकरे बंधूंसोबत मराठी भाषिकांच्या मोर्चात शरद पवारांची राष्ट्रवादीही सहभागी होणार

अरेरे...ओदिशातील शाळेत चक्क अटलबिहारी वाजपेयींना श्रद्धांजली अर्पण

By admin | Updated: September 14, 2015 13:16 IST

माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचे निधन झाल्याचे सांगत शोक व्यक्त करत मुख्याध्यापकाने शाळा बंद करविल्याची धक्कादायक घटना ओदिशामध्ये घडली आहे.

ऑनलाइन लोकमत
बालासोर (ओदिशा), दि, १४ -  माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचे निधन झाल्याचे सांगत शोक व्यक्त करत मुख्याध्यापकाने शाळेला सुट्टी दिल्याची धक्कादायक घटना ओदिशामध्ये घडली आहे. दिवंगत राष्ट्पती डॉ. एपीजे अब्दुल कलाम हयात असतानाच झारखडंमधील एका शिक्षिकेने त्यांना श्रद्धांजली वाहिल्याची घटना लोकांच्या अद्याप स्मरणात असतानाच ओदिशातील बालासोर जिल्ह्यातही असा प्रकार घडला आहे.
 
बालासोर जिल्ह्यातील बुंदखुंटा या प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक कमलाकांत दास हे शिक्षक प्रशिक्षणासाठी शुक्रवारी दुस-या शाळेत गेले होते. तिथे दास यांना अटलबिहारी वाजपेंयीचे निधन झाल्याची चुकीचे वृत्त समजले. दास यांनी या वृत्ताची खातरजमा न करताच शाळेत फोन केला व तत्काळ शाळा बंद करण्यास सांगितले. मुख्याध्यापकाची 'आदेशा'चे पालन करत शिक्षकांनीही शोकसभा भरवली, वाजपेयींना श्रद्धांजली अर्पण करत शाळा बंद केली.  
शाळेचा हा प्रताप स्थानिकांना समजताच त्यांनी थेट जिल्हाधिका-यांकडे तक्रार केली. मुख्याध्यापक कमलाकांत दास यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणीही याप्रसंगी करण्यात आली.  'वाजपेयींच्या निधनाचे चुकीचे वृत्त पसरवणारे मुख्याध्यापक दास यांना निलंबित करण्यात येणार असून गरज पडल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल ' असे अधिका-यांनी सांगितले.  माजी पंतप्रधान वाजपेयी गेल्या अनेक वर्षापासून आजारी असून ते जास्त बाहेर पडत नाहीत, मात्र त्यांची प्रकृती उत्तम आहे.