शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

... तरच नक्षलवाद्यांशी चर्चा - गृहमंत्री

By admin | Updated: September 13, 2014 02:14 IST

माओवाद्यांनी हिंसाचाराचा मार्ग सोडून द्यावा, ते शस्त्रे खाली ठेवणार असतील तरच सरकारची वाटाघाटीची तयार असेल

नवी दिल्ली : माओवाद्यांनी हिंसाचाराचा मार्ग सोडून द्यावा, ते शस्त्रे खाली ठेवणार असतील तरच सरकारची वाटाघाटीची तयार असेल, असे आवाहन केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी शुक्रवारी केले. पोलीस दलांमध्ये महिलांसाठी ३३ टक्के आरक्षण देण्यासंबंधी आदेश सर्व राज्य सरकारे आणि केंद्रशासित प्रदेशांना देण्यात आले असल्याचे त्यांनी नमूद केले.रालोआ सरकारने शंभर दिवस पूर्ण केल्यानिमित्त पत्रपरिषदेत ते बोलत होते. त्यांनी पाकिस्तानशी चर्चा, सीमा आणि अंतर्गत सुरक्षा, व्हिसा नियमन यासारख्या विविध मुद्यांना हात घातला. डावे दशतवादी हिंसाचाराचा मार्ग सोडणार असतील तरच त्यांच्याशी चर्चा केली जाईल, असे त्यांनी ठामपणे बजावले. हिंसाचाराचा मार्ग सोडणाऱ्या प्रत्येकाशी चर्चेची आमची तयारी असेल. आम्ही वाटाघाटीची तयारी दर्शविली आहे, असे ते म्हणाले. रालोआ सरकारच्या काळात १३२ नक्षलवादी शरण आले असून गेल्यावर्षाच्या याच काळाच्या तुलनेत ३०० टक्के वाढ आहे. नक्षलग्रस्त भागात २१९९ मोबाईल टॉवर्स उभारले जातील. (लोकमत न्यूज नेटवर्क)