शहरं
Join us  
Trending Stories
1
अजित पवार आले, पुष्पगुच्छ दिला अन हात जोडले; छगन भुजबळ अखेर मंत्री झाले, शपथ घेतली 
2
“वाह फडणवीस वाह, एका भ्रष्ट मंत्र्याच्या जागी दुसरा भ्रष्ट मंत्री, जनता अशीच भरडली जाणार”
3
'आकाशाशी नातं जडलेला' तारा निखळला; ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांचे निधन
4
'ऑपरेशन सिंदूर' सिनेमावरून अक्षय कुमार आणि विकी कौशलमध्ये भांडणं?
5
ट्रम्प यांचा सल्ला कुक यांनी धुडकावला! अ‍ॅपलचा भारतावरच विश्वास; इतक्या कोटींची केली गुंतवणूक
6
शेख हसीना यांच्याविरूद्ध बांगलादेश सरकारची नवी खेळी! आधी पक्षावर बंदी, त्यातच आता...
7
कोरोना पुन्हा डोकं वर काढतोय! महाराष्ट्र दुसऱ्या स्थानावर, देशांत सर्वाधिक रुग्णसंख्या कुठे?
8
संपूर्ण पाकिस्तान आमच्या रेंजमध्ये, लपायलाही जागा उरणार नाही; भारतीय सैन्याने दिला इशारा
9
लग्नानंतर ६ महिन्यांतील फक्त २१ दिवस एकत्र होते विरुष्का, अनुष्काचा खुलासा, म्हणाली...
10
OMG! रोहित शर्माने त्याची लँबॉर्गिनी उरुस ड्रीम ११ विजेत्याला गिफ्ट देऊन टाकली; रिक्षाने परतला घरी...
11
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी दूतावासात केक घेऊन जाणारा 'तो' डिलिव्हरी बॉय ज्योती मल्होत्रासोबतही दिसला!
12
ज्योती मल्होत्रासोबत जोडलं पुरीच्या युट्यूबरचं नाव; ओडिशाचे मंत्री म्हणतात, "कठोर कारवाई..."
13
शेअर बाजारात संथ सुरुवात! आयटी आणि मेटलमध्ये तेजी, तर ऑटो आणि बँकिंगमध्ये घसरण
14
“...तर विजय शाह यांची पक्षातून कायमची हकालपट्टी केली असती”; मित्रपक्षाचा भाजपाला घरचा अहेर
15
सात दिवसांपूर्वीच भुजबळांना कळविण्यात आलं होतं; पडद्यामागे नेमकं काय काय घडलं? या तीन नेत्यांनी घेतला निर्णय
16
'रेडिएशन'मधील त्रुटींमुळे अमेरिकेने भारताचे ५ कोटी रुपयांचे आंबे केले नष्ट; काय असते प्रक्रिया?
17
केवळ योगायोग, की...? दोन लागोपाठ अपयशांनी इस्रोने चिंतन आणि आत्मपरीक्षण करण्याची गरज
18
फ्रान्सचा बांगलादेशला झटका; मॅक्रो यांनी युनूस यांच्यासोबत द्विपक्षीय बैठकीस दिला नकार
19
ठाकरेंचे ५० टक्के माजी नगरसेवक शिंदेसेनेत; बैठकाच नाही, नाराजांची नाराजी कळणार कधी अन् कशी?
20
“सरकारचे POKवर स्पष्ट धोरण नाही, युद्धकाळात पारदर्शकता राखायला हवी होती”: पृथ्वीराज चव्हाण

फक्त नरेंद्र मोदीच सोडवू शकतात काश्मीर समस्या - मेहबूबा मुफ्ती

By admin | Updated: May 6, 2017 18:50 IST

फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदीच काश्मीर समस्या सोडवू शकतात असं जम्मू काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती बोलल्या आहेत

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 6 - फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदीच काश्मीर समस्या सोडवू शकतात असं जम्मू काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती बोलल्या आहेत. जम्मू काश्मीरमध्ये सध्या दगडफेक आणि दहशतवादी घटनांमध्ये वाढ होत असून यादरम्यान मेहबूबा मुफ्ती यांचं हे वक्तव्य आलं आहे. "पंतप्रधान नरेंद्र मोदींना जनतेचा मोठा पाठिंबा असून तेच काश्मीरला या दलदलीतून बाहेर काढू शकतील", असा विश्वास मेहबूबा मुफ्ती यांनी व्यक्त केला आहे. 
 
मेहबूबा मुफ्ती बोलल्या आहेत की, "जर आपल्याला या दलदलीतून कोणी बाहेर काढू शकत असेल तर ते आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी. मोदी जो काही निर्णय घेतील त्याचं देशवासी समर्थन करतील". 
 
यावेळी बोलताना मेहबूबा मुफ्ती यांनी मोदींच्या पाकिस्तान दौ-याला धाडसी म्हणत कौतुगौद्गार काढले. "मोदींनी दोन्ही देशांमध्ये तणाव असताना पाकिस्तानचा दौरा केला. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनीदेखील पाकिस्तान दौ-याची इच्छा व्यक्त केली होती. मात्र दौरा करण्याची त्यांची हिंमत झाली नाही. पंतप्रधान मोदींचा लाहौर दौरा त्यांच्यातील हिंमत आणि साहसीपणाचं दर्शन घडवतं", असं त्यांनी म्हटलं आहे. 
 
जम्मू काश्मीरमध्ये हिंसा आणि दहशतवादी घटनांमध्ये वाढ होत असून अशावेळी मेहबूबा मुफ्ती यांनी हे वक्तव्य केलं आहे. खो-यात सुरक्षा जवान आणि सामान्य नागरिकांमध्ये रोज चकमक उडत आहे. 15 एप्रिल रोजी सुरक्षा जवानांनी पुलवामा येथील एका कॉलेजमध्ये प्रवेश करत विद्यार्थ्यांना मारहाण केल्यानंतर खो-यातील वातावरण तणावपूर्ण झालं आहे. दहशतवादी घटना, बँक लुटण्याचे प्रकार यामध्ये वाढ झाली असून सरकारसमोर मोठं आव्हान आहे.