शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
2
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
3
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
4
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
5
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
6
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
7
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
8
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
9
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
10
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
11
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
12
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
13
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
14
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
15
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...
16
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा
17
"लक्ष्याने जगाचा निरोप घेण्यापूर्वी मला..."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याने सांगितला भावुक किस्सा
18
Solapur Accident: वडिलांचा अंत्यविधी उरकून परतताना लेकालाही मृत्यूनं गाठलं, सोलापुरातील घटना!
19
भारताचे २ वेगवेगळे संघ निवडले जाणार; इंग्लंड दौऱ्यापूर्वी सिलेक्टर्सचा मोठा निर्णय, पण का?
20
पाकला पुन्हा मिळाली आर्थिक मदत; भारतासोबतच्या तणावादरम्यान IMF ने दिले ₹8400 कोटी

हिंदुत्वामुळेच देशात एकता निर्माण होईल - मोहन भागवत

By admin | Updated: January 19, 2015 10:55 IST

हिंदुत्वामुळे देशात एकता निर्माण होईल असे सांगत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी पुन्हा एकदा हिंदुत्वाचा राग आळवला आहे.

ऑनलाइन लोकमत
सागर, दि. १९ - ' हिंदुत्वामुळे देशात एकता निर्माण होईल' असे सांगत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी पुन्हा एकदा हिंदुत्वाचा राग आळवला आहे. मध्य प्रदेशमधील सागर येथे संघाच्या शिबिरादरम्यान बोलताना त्यांनी हे विधान केले.
'आपल्या देशात विविधता दिसून येते. मात्र अनेक पंथ, प्रांत आणि भाषांना एकमेकांशी जोडण्याचे कार्य फक्त हिंदुत्वामुळेच साकार होऊ शकते. हिंदुत्व सर्वांचा स्वीकार करते', असे भागवत म्हणाले. तसेच यावेळी त्यांनी इस्रायलपासून धडा घेण्याचा सल्लाही दिला. 'आपला देश जेव्हा स्वतंत्र झाला तेव्हाच आणखी एक राष्ट्र अस्तित्वात आले होते, ते म्हणजे इस्रायल. त्या देशाच्या स्वातंत्र्याची जेव्हा घोषणा होत होती, तेव्हाच आजूबाजूच्या आठ देशांनी त्याच्यावर हल्ला केला. आत्तापर्यंत इस्रायलने पाच युद्ध लढली आहेत. एकेकाळी वाळवंट आणि ओसाड भूमी असलेला हा देश आज नंदनवन बनला आहे असे सांगत त्यांनी त्यांच्यापासून प्रेरणा घेण्याचा सल्ला दिला.
इस्रायलमधील नागरिकांकडे वाकड्या नजरेने पहायचे साहस कोणीही करत नाही अशा शब्दांत त्यांनी त्यांची स्तुती केली. आणि जे असं करतात त्यांना त्याचे शासन मिळते, हेच त्यांचे सामर्थ्य आहे, असे भागवत म्हणाले. जेव्हा देश सशक्त असतो तेव्हा घर-दार सर्व सुरळीत असते आणि जेव्हा देशाला धोका असतो तेव्हा जीवन सुरक्षित नसते, असे ते म्हणाले. यावेळी त्यांनी लोकांना संघात येण्याचे, तिकीटाची लालसा न बाळगता सेवा करण्याचे आवाहन त्यांनी केले.