शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

हिंदुत्वामुळेच देशात एकता निर्माण होईल - मोहन भागवत

By admin | Updated: January 19, 2015 10:55 IST

हिंदुत्वामुळे देशात एकता निर्माण होईल असे सांगत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी पुन्हा एकदा हिंदुत्वाचा राग आळवला आहे.

ऑनलाइन लोकमत
सागर, दि. १९ - ' हिंदुत्वामुळे देशात एकता निर्माण होईल' असे सांगत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी पुन्हा एकदा हिंदुत्वाचा राग आळवला आहे. मध्य प्रदेशमधील सागर येथे संघाच्या शिबिरादरम्यान बोलताना त्यांनी हे विधान केले.
'आपल्या देशात विविधता दिसून येते. मात्र अनेक पंथ, प्रांत आणि भाषांना एकमेकांशी जोडण्याचे कार्य फक्त हिंदुत्वामुळेच साकार होऊ शकते. हिंदुत्व सर्वांचा स्वीकार करते', असे भागवत म्हणाले. तसेच यावेळी त्यांनी इस्रायलपासून धडा घेण्याचा सल्लाही दिला. 'आपला देश जेव्हा स्वतंत्र झाला तेव्हाच आणखी एक राष्ट्र अस्तित्वात आले होते, ते म्हणजे इस्रायल. त्या देशाच्या स्वातंत्र्याची जेव्हा घोषणा होत होती, तेव्हाच आजूबाजूच्या आठ देशांनी त्याच्यावर हल्ला केला. आत्तापर्यंत इस्रायलने पाच युद्ध लढली आहेत. एकेकाळी वाळवंट आणि ओसाड भूमी असलेला हा देश आज नंदनवन बनला आहे असे सांगत त्यांनी त्यांच्यापासून प्रेरणा घेण्याचा सल्ला दिला.
इस्रायलमधील नागरिकांकडे वाकड्या नजरेने पहायचे साहस कोणीही करत नाही अशा शब्दांत त्यांनी त्यांची स्तुती केली. आणि जे असं करतात त्यांना त्याचे शासन मिळते, हेच त्यांचे सामर्थ्य आहे, असे भागवत म्हणाले. जेव्हा देश सशक्त असतो तेव्हा घर-दार सर्व सुरळीत असते आणि जेव्हा देशाला धोका असतो तेव्हा जीवन सुरक्षित नसते, असे ते म्हणाले. यावेळी त्यांनी लोकांना संघात येण्याचे, तिकीटाची लालसा न बाळगता सेवा करण्याचे आवाहन त्यांनी केले.