शहरं
Join us  
Trending Stories
1
Raj Thackeray : 'दोन्ही ठाकरे एकत्र न आल्यास मराठी माणूस हताश होईल'; मनसे नेत्याचं मोठं विधान
2
'ऑपरेशन सिंदूर'ची माहिती देण्यासाठी पाकिस्तानने पैसे दिले'; लष्करातील गद्दार जवानाने उघड केले गुपित, बँके खात्यांची चौकशी सुरू
3
खासगी कंपन्यांना मिळणार वीजपुरवठ्याचा परवाना, अदानीचा ठाणे, नवी मुंबईवर दावा
4
Zerodha च्या कामथ बंधूंनी 'या' कंपनीचे २५० कोटींचे शेअर्स खरेदी केले; मार्केटमध्ये उतरण्यापूर्वी खेळला मोठा डाव 
5
"हिंदी भाषा काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत बोलली गेलीच पाहिजे, केंद्राने..."; अबू आझमींकडून हिंदीची वकिली
6
'ट्रॅजेडी क्वीन'वर येणार सिनेमा, 'या' अभिनेत्रीला ऑफर झाली मीना कुमारींची भूमिका
7
पहलगामच्या हल्ल्यात ३ नव्हे ४ दहशतवादी होते सामील; चौथा काय करत होता? ऐकून येईल चीड!
8
आठ महिन्यांत चौघांची हत्या; २० वर्षांच्या गँगस्टरचा एन्काऊंटरमध्ये खात्मा, VIDEO आला समोर
9
"कुठे आहेत नाना पाटेकर, प्रशांत दामले? कुठायत मराठी क्रिकेटपटू?"; हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरून सवाल
10
खासदार प्रिया सरोज आणि क्रिकेटर रिंकू सिंह यांच्या लग्नाची तारीख टळली; समोर आलं मोठं कारण...
11
धारावीतील २४९ पैकी १६१ बांधकामे पात्र, पहिली यादी जाहीर; अपात्र लोकांना ५ जुलैपर्यंत संधी
12
इराणने कमी क्षमतेच्या मिसाईल डागल्या अन् अमेरिकेने त्या पडू दिल्या...; कतारवरील हल्ल्यामागचे गुपित कुणाला कळले...
13
सोहेलसोबत पळून जाऊन केलेलं लग्न, मग २४ वर्षांनी का झाला घटस्फोट? सीमा सजदेहने सांगितलं खरं कारण
14
कसली भारी दिसत्येय 'सैराट'मधील परश्याचा मित्र 'लंगड्या'ची गर्लफ्रेंड, सौंदर्यात नायिकांनाही देते टक्कर!
15
ठाणे: आणखी २ इमारतींवर हातोडा, मुंब्रा-शीळच्या बेकायदा इमारतींमधील रहिवासी रस्त्यावर
16
मध्य पूर्वेतील तणाव, हिंडगनबर्गचे आरोप अन् धारावी प्रकल्प; गौतम अदानी स्पष्टच बोलले
17
युद्धविरामाबाबतचा संभ्रम संपला, अखेर इस्राइल-इराणमधील संघर्ष आटोपला, पण अखेरचा हल्ला करत इराण म्हणाला...  
18
इराण-इस्रायल युद्धबंदीमुळे बाजार 'रॉकेट'; पण 'या' कंपन्यांचे शेअर्स धडाधड कोसळले; काय आहे कारण?
19
कोण आहे अलीफा अहमद?; पती डॉक्टर तर स्वत: TCS मध्ये करत होती नोकरी; आता बनल्या आमदार
20
Iran Israel War : इराण-इस्त्रायलमध्ये १२ दिवसांचं युद्ध, लष्करी तळ, शहरं उद्ध्वस्त; कुणाचं किती नुकसान?

शशिकला कुटुंबाला पक्षातून काढा, तरच चर्चा होऊ शकते

By admin | Updated: April 19, 2017 02:01 IST

पक्ष आणि सरकार कोणत्याही एका कुटुंबाच्या हातात नको या आपल्या मागणीचा पुनरुच्चार करताना अण्णाद्रमुकच्या ओ पनीरसेल्वम गटाने स्पष्ट केले की

तेनी : पक्ष आणि सरकार कोणत्याही एका कुटुंबाच्या हातात नको या आपल्या मागणीचा पुनरुच्चार करताना अण्णाद्रमुकच्या ओ पनीरसेल्वम गटाने स्पष्ट केले की, शशिकला कुटुंबाला अण्णाद्रमुक पक्षातून काढून टाकले तरच आम्ही चर्चा करण्यास तयार आहोत. शशिकला आणि त्यांचे भाचे तसेच अन्य नातेवाईक यांना पक्षात स्थान असता कामा नये, अशी पनीरसेल्वम गटाची मागणी आहे.मुख्यमंत्री ई. पलानीसामी गटाला ही मागणी मान्य असल्याचे दिसते. आपले मुख्यमंत्रीपद कायम राहावे, असे पलानीसामी यांचे म्हणणे आहे. पनीरसेल्वम यांना हे म्हणणे मान्य असून, सरचिटणीसपदी आपली निवड व्हावी, अशी त्यांची इच्छा आहे. जयललिता यांच्या मृत्यूची चौकशी करण्याच्या मागणीवरही पनीरसेल्वम गट ठाम आहे. काही मंत्र्यांनी सोमवारी चेन्नईत बैठक घेऊन दोन्ही गटांच्या संभाव्य एकत्रिकरणावर चर्चा केली होती. पनीरसेल्वम यांनी दावा केला आहे की, जयललिता यांच्या मृत्यूनंतर कायद्याचे उल्लंघन करत शशिकला यांना सरचिटणीस म्हणून नियुक्त करण्यात आले. पनीरसेल्वम यांच्या गटाने निवडणूक आयोगाकडे याचिका दाखल केली असून, त्यात पक्षाच्या घटनेनुसार निर्णय घेण्याची मागणी केली आहे. शशिकला यांच्या निवडीला त्यांनी यापूर्वीही आव्हान दिलेआहे. पनीरसेल्वम म्हणाले की, पक्षाचे संस्थापक एमजीआर आणि अम्मा यांनी या पक्षाला कार्यकर्ता आधारित व लोकशाही संघटनेच्या स्वरुपात उभे केले आहे. त्यांच्या मार्गावरुन जर आम्ही चाललो नाही तर, जनतेप्रति तो अन्याय होईल. शशिकला आणि त्यांच्या कुटुंबीयांना जयललिता यांनी यापूर्वीच पक्षातून काढून टाकले होते. त्यानंतर शशिकला यांनी माफीनामा सादर करुन कोणतेही पद घेणार नाही म्हणून सांगितले होते. (वृत्तसंस्था)