शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम घटनेने आपल्याला शिकवले की कोण शत्रू आणि कोण मित्र: मोहन भागवत
2
हिंसा हे प्रश्नांचं उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य; सरसंघचालकांनी टोचले राजकीय पक्षांचे कान
3
१९२९ मध्ये बनवलेलं हे क्रीम, आजही घराघरात होतो वापर; कोलकाताच्या या व्यक्तीनं उभी केली १६० कोटींची कंपनी
4
'पीओके'मध्ये निदर्शने हिंसक झाली, पाकिस्तानी सुरक्षा दलांनी गोळीबार केला; १२ नागरिकांचा मृत्यू
5
ट्रम्प टॅरिफमुळे भारताच्या प्रगतीला ब्रेक लागेल? रिझर्व्ह बँकेचा इशारा, 'फक्त जीएसटी कपात पुरेशी नाही...'
6
Video: "आय लव्ह मराठी! मी मराठी शिकतोय, माझ्याशी मराठीत बोला..."; अबू आझमींना झाली उपरती
7
Post Office च्या ‘या’ स्कीममध्ये संपेल पेन्शनचं टेन्शन, दर महिन्याला मिळतील ₹२००००
8
महात्मा गांधींच्या पणतीला पाहिलंत का? दिसायला आहे खूप ग्लॅमरस, गाजवतेय हॉलिवूड
9
भारतासाठी नवीन संकट? अमेरिकेसह सात देश करत आहेत मोठी तयारी; रशियासोबत कनेक्शन
10
'मानवी इतिहासाचा मार्ग बदलला', पंतप्रधान मोदींनी राजघाटावर महात्मा गांधींना श्रद्धांजली वाहिली
11
आता चीनला जाण्यासाठी भारतातून मिळणार थेट विमान सेवा; प्रवाशांचा वेळ अन् पैसा वाचणार
12
डायबिटीज रुग्णांसाठी गुडन्यूज! ब्लड शुगर आणि लठ्ठपणा गुणकारी औषधीच्या विक्रीला केंद्राची मंजुरी
13
तृप्ती, शर्वरी की अनन्या, कोणती अभिनेत्री दिसणार 'चांदनी बार'च्या सीक्वलमध्ये मुख्य भूमिकेत?
14
युक्रेन युद्धानंतर पुतिन पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर येणार, अनेक करारांवर स्वाक्षऱ्या होणार
15
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
16
चार आरोपींवर १९ वर्षांनंतर झाले आरोप निश्चित मालेगाव बॉम्बस्फोट; विशेष न्यायालयांत सुनावणी
17
राशीभविष्य २ ऑक्टोबर २०२५: आज कामात यश मिळून आर्थिक लाभ होतील, नशिबाची साथ मिळेल
18
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
19
केंद्रीय मंत्रिमंडळाची दसरा भेट : ४९.१९ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसह ६८.७२ लाख निवृत्तीवेतनधारकांना मिळणार लाभ
20
आज गाजणार मेळावे! वाचा महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या सभांचे वेळापत्रक आणि प्रमुख मुद्दे

शशिकला कुटुंबाला पक्षातून काढा, तरच चर्चा होऊ शकते

By admin | Updated: April 19, 2017 02:01 IST

पक्ष आणि सरकार कोणत्याही एका कुटुंबाच्या हातात नको या आपल्या मागणीचा पुनरुच्चार करताना अण्णाद्रमुकच्या ओ पनीरसेल्वम गटाने स्पष्ट केले की

तेनी : पक्ष आणि सरकार कोणत्याही एका कुटुंबाच्या हातात नको या आपल्या मागणीचा पुनरुच्चार करताना अण्णाद्रमुकच्या ओ पनीरसेल्वम गटाने स्पष्ट केले की, शशिकला कुटुंबाला अण्णाद्रमुक पक्षातून काढून टाकले तरच आम्ही चर्चा करण्यास तयार आहोत. शशिकला आणि त्यांचे भाचे तसेच अन्य नातेवाईक यांना पक्षात स्थान असता कामा नये, अशी पनीरसेल्वम गटाची मागणी आहे.मुख्यमंत्री ई. पलानीसामी गटाला ही मागणी मान्य असल्याचे दिसते. आपले मुख्यमंत्रीपद कायम राहावे, असे पलानीसामी यांचे म्हणणे आहे. पनीरसेल्वम यांना हे म्हणणे मान्य असून, सरचिटणीसपदी आपली निवड व्हावी, अशी त्यांची इच्छा आहे. जयललिता यांच्या मृत्यूची चौकशी करण्याच्या मागणीवरही पनीरसेल्वम गट ठाम आहे. काही मंत्र्यांनी सोमवारी चेन्नईत बैठक घेऊन दोन्ही गटांच्या संभाव्य एकत्रिकरणावर चर्चा केली होती. पनीरसेल्वम यांनी दावा केला आहे की, जयललिता यांच्या मृत्यूनंतर कायद्याचे उल्लंघन करत शशिकला यांना सरचिटणीस म्हणून नियुक्त करण्यात आले. पनीरसेल्वम यांच्या गटाने निवडणूक आयोगाकडे याचिका दाखल केली असून, त्यात पक्षाच्या घटनेनुसार निर्णय घेण्याची मागणी केली आहे. शशिकला यांच्या निवडीला त्यांनी यापूर्वीही आव्हान दिलेआहे. पनीरसेल्वम म्हणाले की, पक्षाचे संस्थापक एमजीआर आणि अम्मा यांनी या पक्षाला कार्यकर्ता आधारित व लोकशाही संघटनेच्या स्वरुपात उभे केले आहे. त्यांच्या मार्गावरुन जर आम्ही चाललो नाही तर, जनतेप्रति तो अन्याय होईल. शशिकला आणि त्यांच्या कुटुंबीयांना जयललिता यांनी यापूर्वीच पक्षातून काढून टाकले होते. त्यानंतर शशिकला यांनी माफीनामा सादर करुन कोणतेही पद घेणार नाही म्हणून सांगितले होते. (वृत्तसंस्था)