शहरं
Join us  
Trending Stories
1
योग गुरू स्वामी पद्मश्री शिवानंद बाबा यांनी वयाच्या १२८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
3
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लॉटरी, यशच यश; प्रगतीची संधी, नोकरीत पदोन्नती, पैसा मिळेल!
4
...तर सीमा हैदरला हा नियम लागू नाही का?; सपा नेते अबु आझमींनी केंद्र सरकारला घेरलं
5
WAVES 2025: नेटफ्लिक्स सह-सीईओंसोबत सैफची चर्चा, म्हणाला, "रामायण, महाभारत..."
6
दादा, तुम्ही नाहीतर कर्ज माफीचे आश्वासन दिले कोणी?
7
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
8
आजचे राशीभविष्य, ४ मे २०२५: धनप्राप्तीसह आर्थिक स्तर मजबूत होईल, मान, प्रतिष्ठा वाढेल
9
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
10
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
11
पर्यटकच टार्गेटवर... गुप्तचरांचा होता इशारा; शोधमोहीम थांबविली त्याच दिवशी झाला हल्ला 
12
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी
13
तीन मुलींची हत्या करून आईने घेतला गळफास ; भिवंडीतील हृदयद्रावक घटना, कारण अस्पष्ट 
14
पुरंदर विमानतळाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीमार; अनेक जखमी
15
नव्या डम्पिंगसाठी लागतील दोन वर्षे; सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा किंवा पर्यायी जागेसाठी मुदतवाढ हाच महापालिकेकडे पर्याय 
16
७२ तासांच्या ‘त्या’ शपथेनंतर मजबूत राज्याची मुहूर्तमेढ : देवेंद्र फडणवीस
17
विमानांना पक्षी धडकण्याची शक्यता, उघड्यावरील प्राण्यांची कत्तल थांबवा; नवी मुंबई विमानतळ कंपनीला ‘डीजीसीए’चे आदेश
18
सात वर्षांची असताना आला बहिरेपणा, आता  २८ वर्षांनंतर ती पहिल्यांदाच ऐकणार आवाज
19
गोव्यात लईराईच्या जत्रेत चेंगराचेंगरी, ६ भाविक ठार
20
ए. आर. रहमान यांच्या लाइव्ह कॉन्सर्टमुळे नेरूळकरांची कोंडी

शशिकला कुटुंबाला पक्षातून काढा, तरच चर्चा होऊ शकते

By admin | Updated: April 19, 2017 02:01 IST

पक्ष आणि सरकार कोणत्याही एका कुटुंबाच्या हातात नको या आपल्या मागणीचा पुनरुच्चार करताना अण्णाद्रमुकच्या ओ पनीरसेल्वम गटाने स्पष्ट केले की

तेनी : पक्ष आणि सरकार कोणत्याही एका कुटुंबाच्या हातात नको या आपल्या मागणीचा पुनरुच्चार करताना अण्णाद्रमुकच्या ओ पनीरसेल्वम गटाने स्पष्ट केले की, शशिकला कुटुंबाला अण्णाद्रमुक पक्षातून काढून टाकले तरच आम्ही चर्चा करण्यास तयार आहोत. शशिकला आणि त्यांचे भाचे तसेच अन्य नातेवाईक यांना पक्षात स्थान असता कामा नये, अशी पनीरसेल्वम गटाची मागणी आहे.मुख्यमंत्री ई. पलानीसामी गटाला ही मागणी मान्य असल्याचे दिसते. आपले मुख्यमंत्रीपद कायम राहावे, असे पलानीसामी यांचे म्हणणे आहे. पनीरसेल्वम यांना हे म्हणणे मान्य असून, सरचिटणीसपदी आपली निवड व्हावी, अशी त्यांची इच्छा आहे. जयललिता यांच्या मृत्यूची चौकशी करण्याच्या मागणीवरही पनीरसेल्वम गट ठाम आहे. काही मंत्र्यांनी सोमवारी चेन्नईत बैठक घेऊन दोन्ही गटांच्या संभाव्य एकत्रिकरणावर चर्चा केली होती. पनीरसेल्वम यांनी दावा केला आहे की, जयललिता यांच्या मृत्यूनंतर कायद्याचे उल्लंघन करत शशिकला यांना सरचिटणीस म्हणून नियुक्त करण्यात आले. पनीरसेल्वम यांच्या गटाने निवडणूक आयोगाकडे याचिका दाखल केली असून, त्यात पक्षाच्या घटनेनुसार निर्णय घेण्याची मागणी केली आहे. शशिकला यांच्या निवडीला त्यांनी यापूर्वीही आव्हान दिलेआहे. पनीरसेल्वम म्हणाले की, पक्षाचे संस्थापक एमजीआर आणि अम्मा यांनी या पक्षाला कार्यकर्ता आधारित व लोकशाही संघटनेच्या स्वरुपात उभे केले आहे. त्यांच्या मार्गावरुन जर आम्ही चाललो नाही तर, जनतेप्रति तो अन्याय होईल. शशिकला आणि त्यांच्या कुटुंबीयांना जयललिता यांनी यापूर्वीच पक्षातून काढून टाकले होते. त्यानंतर शशिकला यांनी माफीनामा सादर करुन कोणतेही पद घेणार नाही म्हणून सांगितले होते. (वृत्तसंस्था)