शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
2
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
3
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
4
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
5
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
6
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
7
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
8
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
9
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
10
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
11
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
12
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
13
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
14
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
15
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
16
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
17
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
18
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
19
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
20
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव

सॉफ्टवेअर अपडेटनंतरच ATM सुरु करा - RBI

By admin | Updated: May 15, 2017 10:41 IST

जगभरात सध्या रॅन्समवेअर" व्हायरसने धुमाकूळ घातला आहे. एटीएम मशीन्सनाही या व्हायरसपासून धोका असल्याने रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने म्हटले आहे.

 ऑनलाइन लोकमत 

मुंबई, दि. 15 - जगभरात सध्या रॅन्समवेअर" व्हायरसने धुमाकूळ घातला आहे.  एटीएम मशीन्सनाही या व्हायरसपासून धोका असल्याने रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने सर्व बँकांना त्यांच्या ATM सिस्टीम अपडेट करण्याचे निर्देश दिले आहेत. शुक्रवारी अचानक झालेल्या सायबर हल्ल्याचा 150 देशातील 2 लाख संगणकांना फटका बसला आहे.  देशातील 2.25 लाख एटीएमपैकी 60 टक्क्याहून अधिक एटीएममध्ये आऊटडेटेड विंडोज एक्सपी सिस्टीम आहे.  
 
या सिस्टीमचे नियंत्रण त्या विक्रेत्यांकडे असते जे बँकेला ही सिस्टीम पुरवितात. एटीएममध्ये तात्काळ अपडेट करा, तो पर्यंत एटीएममशीन्स वापरु नका असे निर्देश आरबीआयने बँकांना दिले आहेत. त्यामुळे आधीच कॅश नसल्याने खडखडाट असलेल्या एटीएममशीन्स काही तासांठी बंद राहू शकतात. ग्राहकांची माहिती आणि खात्यातील रोख रक्कमेला कोणताही धोका नसल्याचे एटीएम मशीन्सचे व्यवस्थापन करणा-या कंपनीने सांगितले. 
 
आंध्र प्रदेश पोलिसांच्या १०२ सिस्टीमला हॅकर्सने हॅक केल्यानंतर देशातील सायबर हल्ल्याचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. आंध्रातील सायबर अ‍ॅटॅकनंतर मायक्रोसॉफ्टने विंडोज एक्सपीसाठी अपडेट रीलीज केले आहेत. जर भारतातील एटीएमला सायबर हल्लेखोरांनी लक्ष्य केले तर परिस्थिती किती बिकट होऊ शकते याचा अंदाज कोणी लावू शकत नाही. 
 
पंतप्रधान कार्यालयातील राष्ट्रीय सायबर सुरक्षा सल्लागार गुलशन राय यांनी सांगितले की, अशा १०० सिस्टीमवर हल्ला झाला होता. पण, आता कोणताही धोका नाही. सायबर हल्लेखोर या डेटाला इनस्क्रिप्ट करून लॉक करतात. डेटाला डिक्रिप्ट करण्यासाठी ते रक्कम मागतात. चेन्नईच्या बाहेरच्या भागातील निस्सान - रेनॉल्ट या कंपनीचे उत्पादन सायबर हल्ल्यामुळे बंद करण्यात आले होते, असे सांगण्यात येत आहे. पण, कंपनीने यावर काही भाष्य केले नाही. सरकारी आकडेवारीनुसार, गत १२ ते १४ महिन्यांत भारतात ११ हजार नेटवर्कविरुद्ध हल्ले झाले आहेत. भारत त्या ९९ देशांपैकी एक आहे ज्या देशात अधिकाधिक सायबर हल्ले होतात.