शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
2
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
3
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
4
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
5
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
6
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
7
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
8
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
9
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
10
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
11
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
12
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
13
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
14
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
15
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
16
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
17
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
18
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
19
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
20
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव

भारतीय यंत्रणांना फक्त ६ अतिरेक्यांना रोखता आले नाही - जैश-ए-मोहम्मदने उडवली खिल्ली

By admin | Updated: January 9, 2016 12:32 IST

भारतीय सुरक्षा यंत्रणांना पठाणकोट हवाई दलाच्या तळावर हल्ला करणा-या अवघ्या ६ दहशतवाद्यांना रोखता आले नाही अशा शब्दात जैश ए मोहम्मदच्या म्होरक्याने खिल्ली उडवली,

ऑनलाइन लोकमत
इस्लामाबाद / पठाणकोट, दि. ९ - 'भारतीय सुरक्षा यंत्रणांना पठाणकोट हवाई दलाच्या तळावर हल्ला करणा-या अवघ्या ६ दहशतवाद्यांना रोखता आले नाही' अशा शब्दात कुख्यात दहशतवादी संघटना 'जैश ए मोहम्मद'चा प्रमुख मौलाना मसूद अझहरने खिल्ली उडवली आहे. या संघटनेतर्फे www.alqalamionline.com या वेबसाईटवर एक ऑडिओ क्लिप अपलोड करण्यात आली असून त्यात पठाणकोट हल्ल्याशी संबंधित गोष्टींबाबत खुलासा करत असून हा हल्ला कसा घडवण्यात आला तेही स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच अझहर याच्या बहावलपूर या शहरातून प्रसिद्ध होणा-या एका उर्दू वृत्तपत्रातही १३ मिनिटांच्या या ऑडिओ क्लिपबाबत मजकूर छापण्यात आला आहे. 
गेल्या आठवड्यात २ जानेवारी रोजी लष्कराच्या वेशात आलेल्या काही दहशतवाद्यांनी पठाणकोटमधील हवाई दलाच्या तळावर घुसून हल्ला केला. तीन दिवसांच्या चकमकीनंतर भारतीय जवानांनी सहा अतिरेक्यांना यमसदनी धाडले, मात्र त्यात सात जवान शहीद झाले तर ५० हून अधिक जण जखमी झाले. 
या ऑडिओ क्लिपमध्ये सुरक्षा यंत्रणांची खिल्ली उडवण्यात आली आहे तसेच दहशतवाद्यांनी भारतीय रणगाडे, सैन्याच्या गाड्या व हेलिकॉप्टर्सवर कसा हल्ला चढवला हेही नमूद करण्यात आले आहे. 
'पाकिस्तानचे नेते भारताने केलेल्या आरोपांसमोर का झुकतात?' असा सवाल विचारत मौलाना मसूद अझहरने पाकिस्तानला भारताने दिलेले पुरावे न स्वीकारण्याची धमकी दिली आहे. आमच्या सहा दहशतवाद्यांशीही भारतीय सैन्यातील जवान लढू शकले नाहीत, अशी खिल्ली त्यात उडवण्यात आली आहे. तसेच या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेले लेफ्टनंट कर्नल निरंजन कुमार आणि शूटर फतेह सिंग क्रूरपणे मारल्याचे सांगत भारतीय सुरक्षा यंत्रणा अतिशय ढिसाळ असल्याची टीकाही करण्यात आली आहे. ' ते (जवान) अतिशय वाईट पद्धतीने मारले गेले. भारताने पहिल्यांदा सहा दहशतवादी असल्याचे सांगितले, मग तो आकडा पाच वर गेला आणि नंतर चार दहशतवादी झाले...! एवढा मोठा देश अश्रूंच्या पुरात बुडाला आहे.  तेथील (भारत) सरकार भित्रे असून ते केवळ आमच्यावर आरोप करत सुटले आहेत' अशी संतापजनक भाषा ऑडिओत वापरण्यात आली आहे.