शहरं
Join us  
Trending Stories
1
यश दयालसमोर धोनी ठरला फिका! नो बॉल.. फ्री हिट ट्विस्टनंतरही CSK नं गमावला सामना, RCB टॉपला
2
सारा तेंडुलकर 'या' बॉलिवूड अभिनेत्याला करतेय 'डेट'? दीपिका पदुकोणसोबत दिलेत भरपूर 'किसिंग सीन'
3
भारत-पाक सीमेवर मोठी कारवाई, राजस्थानात पाकिस्तानी रेंजर ताब्यात!
4
घरगुती वाद विकोपाला! अकोला येथे दुहेरी खून: पतीकडून पत्नी, सावत्र मुलीची गळा दाबून हत्या
5
रामराजे नाईक-निंबाळकर यांनाही उत्तरे द्यावीच लागणार, मुख्यमंत्र्यांचे यावर बारीक लक्ष- जयकुमार गोरे
6
आयपीएल २०२५ मध्ये युवा फलंदाजांचा दबदबा, आरसीबीविरुद्ध आयुष म्हात्रेचं सुपरफास्ट अर्धशतक
7
अँथनी अल्बानीज पुन्हा होणार ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान! ऐतिहासिक विजयानंतर PM मोदींनी केलं अभिनंदन
8
"भारताला कारवाईचा पूर्ण अधिकार...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर माजी अमेरिकन NSA जॉन बोल्टन स्पष्टच बोलले
9
२१ वर्षीय पोराची कडक फिफ्टी! कोण आहे किंग कोहलीचा नवा ओपनिंग पार्टनर Jacob Bethell?
10
पाकिस्तानी महिलेशी केलेला विवाह लपवला; CRPF ने देशासाठी धोकादायक म्हणत मुनीर अहमदला केले बडतर्फ
11
IPL 2025 : कोहलीनं जिरवली! खलील अहमदनं दुसऱ्याच्या जीवावर असा काढला राग, मग... (VIDEO)
12
नवविवाहितेच्या खून प्रकरणात आरोपी पतीला जन्मठेपेची शिक्षा; १० हजारांचा दंड, लातुरातील घटना
13
Romario Shepherd: ३७९ चा स्ट्राईक रेट, १४ चेंडूत अर्धशतक, चेन्नईविरुद्ध रोमारियो शेफर्डची वादळी खेळी
14
सोन्याचा भाव 6658 रुपयांनी घसरला, आता खरेदी करणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या काय सांगतायत एक्सपर्ट्स?
15
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
16
IPL 2025 : किंग कोहलीचे षटकारांचे 'त्रिशतक'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
17
लातुरच्या माहेश्वरी पतसंस्थेत झाला सव्वा आठ काेटींचा अपहार; फरार राेखपालाला पोलिसांनी पकडले!
18
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
19
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
20
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं

राष्ट्रीयकृत बँकाची केवळ ३० कोटी कर्जवाटप जिल्हाधिकार्‍यांची नाराजी : पुनर्गठनाची मागणी करणार्‍या शेतकर्‍यांच्या अर्जाचा विचार करा

By admin | Updated: May 17, 2016 01:04 IST

जळगाव- शासनातर्फे शेतकर्‍यांना पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट्य देण्यात आले आहे. जिल्हा बँकेने आतापर्यंत ५७० कोटी रुपयांचे पीककर्ज वाटप केले असताना राष्ट्रीयकृत बँकानी केवळ ३०.७८ कोटी रुपयांचे पीक कर्ज वाटप केले आहे. याबाबत जिल्हाधिकार्‍यांनी सोमवारी संध्याकाळी घेतलेल्या बैठकीत नाराजी व्यक्त केली.

जळगाव- शासनातर्फे शेतकर्‍यांना पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट्य देण्यात आले आहे. जिल्हा बँकेने आतापर्यंत ५७० कोटी रुपयांचे पीककर्ज वाटप केले असताना राष्ट्रीयकृत बँकानी केवळ ३०.७८ कोटी रुपयांचे पीक कर्ज वाटप केले आहे. याबाबत जिल्हाधिकार्‍यांनी सोमवारी संध्याकाळी घेतलेल्या बैठकीत नाराजी व्यक्त केली.
शिवसेनेचे आमदार गुलाबराव पाटील यांनी शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर शिंगाडा मोर्चा काढला होता. त्यानंतर जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल यांनी सोमवारी बैठक घेण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार सोमवारी संध्याकाळी ५ वाजता जिल्हाधिकार्‍यांच्या दालनात बैठक झाली. यावेळी जिल्हा बँकेचे कार्यकारी संचालक जितेंद्र देशमुख, जिल्हा उपनिबंधक संजय राऊत, लीड बँकेचे प्रतिनिधी मराठे यांची उपस्थिती होती.
जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल यांनी पीक कर्ज वाटप तसेच पुनर्गठनाबाबतचा आढावा घेतला. राष्ट्रीयकृत बँकातर्फे केवळ ३० कोटी ७८ लाखांचे पीक कर्ज वाटप झाल्याची माहिती मराठे यांनी दिली. याबाबत जिल्हाधिकार्‍यांनी नाराजी व्यक्त केली. जिल्हा बँकेने आतापर्यंत ५७० कोटी पीक कर्जाचे वाटप करण्यात आल्याची माहिती देशमुख यांनी दिली.
यावेळी जिल्हाधिकार्‍यांनी पीक कर्जाच्या पुनर्गठनासाठी किती शेतकर्‍यांचे अर्ज आले त्याबाबत आढावा घेतला. शेतकर्‍यांनी पीक कर्ज पुनर्गठनाचे अर्ज दिल्यास त्या अर्जावर कार्यवाही करावी अशी सूचना त्यांनी यावेळी दिली.
२४ रोजी पुन्हा बैठक
राष्ट्रीयकृत बँकांची अत्यल्प कर्ज वाटप झाल्याने त्याला वेग देण्यासाठी २४ मे रोजी पुन्हा बैठकीचे आयोजन करण्यात येणार आहे. या बैठकीला बँकांचे प्रतिनिधी तसेच व्यवस्थापक उपस्थित राहणार आहेत.