शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
3
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
4
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
5
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
6
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
7
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
8
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
9
हा सदोष मनुष्यवधच!
10
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
11
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
12
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
13
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
14
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
15
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
16
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
17
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
18
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
19
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय

जलाशयांमध्ये केवळ १७ टक्के पाणीसाठा शिल्लक

By admin | Updated: May 27, 2016 21:21 IST

यंदा भारतात सर्वत्र प्रचंड पाणीटंचाई असून, देशातील ९१ मोठ्या जलाशयांमध्ये आजच्या घटकेला एकूण क्षमतेच्या केवळ १७ टक्केच पाणीसाठा शिल्लक आहे.

ऑनलाइन लोकमत

गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा जलाशयांची स्थिती अधिक चिंताजनक आहे. त्यामुळे या राज्यांतील लाखो लोकांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. काही भागांत पाण्याचे टँकर पाठवण्यात येत असले तरी ते चार ते पाच दिवसांनी जात असल्याने मिळणारे पाणी अपुरे आहे. शहरी भागात तुलनेते पाण्याची स्थिती बरी आहे. मात्र ग्रामीण भागांत पाणीटंचाई अतिशय तीव्र आहे. पाण्याअभावी शेतीची कामे थांबली असून, अनेक उद्योगही बंद करावे लागले आहेत, असं वृत्त पब्लिक डोमेन आणि इंडियन एक्स्प्रेसनं दिलं आहे.

वरील राज्यांच्या तुलनेत आंध्र प्रदेश, त्रिपुरा आणि राजस्थानची स्थिती बरी असून, तेथील जलाशयांमध्ये गेल्या वर्षीइतकाच पाणीसाठी आहे. केंद्रीय जलसंसाधन मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार यंदा देशातील जलाशयांमध्ये गेल्या वर्षीपेक्षा ४५ टक्के पाणी आहे. गेल्या १0 वर्षांच्या तुलनेत यंदाचा पाणीसाठी २१ टक्के कमी आहे. यंदा जलाशयांमध्ये २६. ८१६ दशलक्ष क्युबीक मीटर पाणी शिल्लक आहे. या ९१ जलाशयांची क्षमता १५७. ७९९ दशलक्ष क्युबीक मीटर इतकी आहे. देशातील सर्व जलाशयांची पाणीसाठी क्षमता २५३. ८८ दशलक्ष क्युबीक मीटर आहे. त्यातील ३७ जलाशयांतील पाण्याचा वापर वीजनिर्मितीसाठी केला जातो.