शहरं
Join us  
Trending Stories
1
'अमेरिकेसोबत काही मुद्दे सोडवायला हवेत', ट्रेड डील आणि टॅरिफबाबत जयशंकर यांचे मोठे विधान
2
नेपाळमध्ये हाहाकार... मुसळधार पावसाचा कहर! आतापर्यंत 51 जणांचा मृत्यू; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलं दुःख, म्हणाले - भारत...!
3
IND vs AUS : ३०० पारच्या लढाईत अभिषेक-तिलकनं तलवार केली म्यान; वादळी शतकासह प्रभसिमरन सिंगची हवा
4
हिमालयात दार्जिलिंगपासून माऊंट एव्हरेस्टपर्यंत विध्वंस, ६० हून अधिक मृत्यू, कारण काय?
5
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
6
प्रवाशांनी भरलेली विरार ते पालघर रो-रो बोट जेट्टीवर अडकली; हायड्रॉलिक पाईप तुटल्याने मनस्ताप
7
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
8
’अमित शाह महाराष्ट्रात आले पण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत शब्दही बोलले नाहीत’, काँग्रेसची टीका   
9
Irani Cup 2025: नागपूरच्या मैदानात फुल्ल राडा! यश धुलला तंबूत धाडल्यावर ठाकूर त्याच्या अंगावर धावला (VIDEO)
10
ऑटो कंपनीची 'कमाल', गुंतवणूकदारांना केलं मालामाल...! 1 वर्षात पैसा डबल; सोमवारी दिसणार चमत्कार?
11
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
12
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
13
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
14
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 
15
सयाजी शिंदेंचा मोठा निर्णय, 'सखाराम बाईंडर'च्या १० प्रयोगांचे मानधन पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार
16
“धर्म-भाषा काहीही असो, आपण सर्व हिंदू आहोत; ब्रिटिशांनी आपल्यात फूट पाडली”- मोहन भागवत
17
"...तोपर्यंत मी तुरुंगात राहण्यास तयार आहे"; सोनम वांगचुक यांनी जोधपूरहून भावाकडे पाठवला मेसेज
18
INDW vs PAKW: अचानक मैदानात पसरला पांढरा धूर: भारत-पाक सामन्यात नेमकं काय घडलं?
19
IND W vs PAK W : पुरुष असो वा महिला, नो हँडशेक फॉर्म्युला! हरमनप्रीतनं पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ
20
‘’२०२७ चा वर्ल्डकप खेळायला मिळाला तर…’’, बोलता बोलता रोहित झाला होता भावूक, तो व्हिडीओ होतोय व्हायरल  

नोटाबंदीमुळे आॅनलाइन पेमेंटची चलती!

By admin | Updated: November 16, 2016 01:40 IST

काळा पैशाविरोधातील मोहीम तीव्र करत, पाचशे व हजारांच्या जुन्या नोटा रद्द करण्याच्या सरकारच्या निर्णयानंतर, आॅनलाइन व्यवहारांकडे

नवी दिल्ली : काळा पैशाविरोधातील मोहीम तीव्र करत, पाचशे व हजारांच्या जुन्या नोटा रद्द करण्याच्या सरकारच्या निर्णयानंतर, आॅनलाइन व्यवहारांकडे लोकांचा कल वाढला असून, मोबाइलद्वारे पेमेंटची सुविधा उपलब्ध करून देणाऱ्या कंपन्यांच्या व्यवहारांच्या संख्येमध्ये तब्बल ७०० टक्के वाढ झाली आहे. उलाढाल तब्बल दहा पटींनी वाढली आहे.या नोटाकोंडीचा फायदा घेण्यासाठी आॅनलाइन पमेंट आणि मोबाइल पेमेंट सुविधा देणाऱ्या कंपन्यांनी अनेक आॅफर्स आणल्या आहेत. मोबीक्विकने कोणत्याही बँक खात्यात पैसे ट्रान्सफर करण्यासाठी शुल्क आकारणार नसल्याचे  जाहीर केले आहे. अशा आॅफर्समुळे किरकोळ विक्रेते, दुकानदार,  तसेच ग्राहक मोबाइल वॉलेट्सचा वापर वाढवतील, अशी आशा आहे. सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे लोकांना होणारा त्रास दूर करण्यासाठी, आम्ही बँक ट्रान्सफर व्यवहार मोफत ठेवले आहेत, असे मोबीक्विकचे सहसंस्थापक बिपीन प्रीत सिंग यांनी सांगितले. या पूर्वी मोबाइल वॉलेटमधून बँकेत पैसे ट्रान्सफर करताना, ज्यांनी केवायसी (नो युवर कस्टमर) ची पूर्तता केली असेल, अशांसाठी १ टक्का तर नॉन- केवायसी युझर्ससाठी ४ टक्के फी आकारण्यात येत असे. ५०० व १००० च्या नोटा चलनातून रद्द करण्याचा निर्णय जाहीर झाल्यानंतर, मोबीक्विकच्या व्यवहारांमध्ये १८ टक्क्यांनी वाढ झाल्याचे दिसून आले आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)-मोबाइल वॉलेट कंपन्यांमध्ये आघाडीचे नाव असलेल्या ‘पेटीएम’ने आत्तापर्यंतचा उच्चांक गाठला असून, आठवडाभराच्या कालावधीत २४ हजार कोटी रुपयांचे एकूण ५० लाख व्यवहार झाले आहेत. गेल्या दोन दिवसांत पेटीएमच्या माध्यमातून होणाऱ्या व्यवहारांची संख्या ७०० टक्के वाढली असून, प्रत्यक्ष उलाढाल १००० टक्के वाढल्याचे कंपनीतर्फे नमूद करण्यात आले आहे. -या कालावधीत अ‍ॅप डाउनलोड्सची संख्या ३०० टक्के वाढली आहे, तसेच प्रत्येक ग्राहकाचे आठवड्याला सरासरी तीन व्यवहार होत, जे वाढून आता १८वर पोहोचल्याचे कंपनीने म्हटले आहे.-असोचेमच्या निष्कर्षानुसार सध्या मोबाइल पेमेंट प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून वर्षाला ३ अब्ज व्यवहार होतात, जे पुढील सहा वर्षांमध्ये ९० टक्क्यांच्या चक्रवाढ गतीने वाढत १५३ अब्ज व्यवहारांपर्यंत पोहोचतील.

एटीएममधून लवकरच मिळणार ५0 आणि २0 च्या नोटा-मुंबई : एटीएममधून लवकरच ५0 आणि २0 रुपयांच्या नोटाही मिळू लागतील, अशी माहिती स्टेट बँक आॅफ इंडियाच्या अध्यक्षा अरुंधती भट्टाचार्य यांनी दिली. एका मुलाखतीत भट्टाचार्य यांनी सांगितले की, एसबीआयच्या दक्षिण भारतातील शाखांतील कामाचा बोजा ५0 टक्क्यांनी घटला आहे. याचाच अर्थ, आपल्याला पैसे नक्की मिळणार आहेत, अशी लोकांची खात्री झाली आहे. एटीएममध्ये पैसे लवकर संपत असल्यामुळे लोकांना गैरसोय होत आहे, हे खरे आहे. एटीएम यंत्रात ठरावीक संख्येनेच शंभराच्या नोटा ठेवता येतात. या मर्यादेमुळे एटीएममधील पैसे लवकर संपत आहेत. याशिवाय एटीएम रिकामे झाल्यानंतर, त्यात पुन्हा पैसे भरण्याची प्रक्रिया स्वयंचलित नाही. मानवी हातांनी हे काम करावे लागते. लोक येऊन पैसे भरायला थोडा वेळ लागतो, त्यामुळे गैरसोय होत आहे. नोव्हेंबर अखेरपर्यंत या समस्येवर तोडगा काढण्याचा आमचा प्रयत्न आहे. गोंधळ कमी झाल्यास ५0 व २0 रुपयांच्या नोटाही एटीएममधून देण्याची व्यवस्था आम्ही करू.एटीएम पुनर्भरण प्रक्रियेला गती देण्यासाठी सरकारने रिझर्व्ह बँकेच्या डेप्युटी गव्हर्नरांच्या नेतृत्वाखाली एका टास्क फोर्सची स्थापना केली आहे. एटीएममध्ये पैसे भरण्याची प्रक्रिया लांबणार नाही, हे हा टास्क फोर्स पाहीलच. त्याचबरोबर, एटीएम पूर्ण क्षमतेने चालेल, यासाठीही उपाययोजना करील. २000 रुपयांच्या नोटा एटीएममधून मिळायला आज किंवा उद्यापासून सुरुवात होईल.

पाचव्या दिवशीही सराफा दुकाने बंद; आयकर छाप्यांची छाया -आयकर खात्याकडून तपासणी करण्यात आल्यामुळे, घाबरलेल्या दिल्लीतील सराफा व्यापाऱ्यांनी राजधानी दिल्लीत मंगळवारी सलग पाचव्या दिवशी दुकाने बंद ठेवली. सराफा व्यापारी बेकायदेशीर व्यवहार करून, हजार-पाचशेच्या जुन्या नोटा स्वीकारत असल्याच्या माहितीवरून, १0 नोव्हेंबर रोजी दिल्ली राजधानी क्षेत्रातील दरिबा कलान, चांदणी चौक आणि करोल बाग यांसह चार ठिकाणी छापे मारले होते. त्यामुळे सराफा बाजारात भीतीचे वातावरण आहे. कटकट नको, म्हणून व्यापाऱ्यांनी ११ नोव्हेंबरपासून दुकानेच बंद ठेवली आहेत. केंद्रीय उत्पादन शुल्क महासंचालनालयाच्या अधिकाऱ्यांनी सराफा व्यापाऱ्यांना नोटिसा बजावल्या असून, विक्रीचा तपशील सादर करण्याचे आदेश दिले आहेत.