शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

आयकर रिटर्नची तपासणी आॅनलाईन

By admin | Updated: November 7, 2015 03:25 IST

आयकर रिटर्नची तपासणी आॅनलाईन करणारी प्रणाली आयकर विभाग सुरू करील आणि अधिकाऱ्यांना योग्य ते आदेश देण्यास प्रोत्साहन मिळेल व त्यासोबत भ्रष्टाचारही रोखता

नवी दिल्ली : आयकर रिटर्नची तपासणी आॅनलाईन करणारी प्रणाली आयकर विभाग सुरू करील आणि अधिकाऱ्यांना योग्य ते आदेश देण्यास प्रोत्साहन मिळेल व त्यासोबत भ्रष्टाचारही रोखता येईल अशा पद्धतीने कामकाज व्यवस्थेत बदल करील, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले. शुक्रवारी मोदी यांच्या हस्ते येथे ‘दिल्ली इकॉनॉमिक्स कॉन्क्लेव्ह २०१५’ चे उद््घाटन झाले त्यावेळी ते बोलत होते. या संमेलनाला देशातील व विदेशातील अर्थतज्ज्ञ उपस्थित होते.मोदी म्हणाले की, सरकारने प्रामाणिक करदात्यांच्या सेवेसाठी अनेक पावले उचलली आहेत. यावर्षी इलेक्ट्रॉनिक रिटर्नची तपासणी व अन्य कामे ९० दिवसांत पूर्ण करण्यात आली. हेच प्रमाण गेल्यावर्षी ४६ टक्के होते.नरेंद्र मोदी म्हणाले की, अधिकाऱ्यांसाठी कामकाजाच्या पद्धतीतच बदल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. हे बदल असे असले पाहिजेत की, अधिकाऱ्याने दिलेले आदेश किंवा त्याला झालेले विषयाचे आकलन हे अपिलात योग्य सिद्ध झाले की नाही. यामुळे भ्रष्टाचार रोखला जाईल व योग्य ते आदेश देण्याला अधिकाऱ्यांना प्रोत्साहन मिळेल. केवळ रिटर्न दाखल करणेच नाही तर त्याच्या तपासणीचे कामही आॅनलाईनच होईल अशी प्रणाली आयकर विभाग लागू करील, त्यामुळे करदात्याला आयकर कार्यालयात यायची गरज पडणार नाही, असेही मोदी म्हणाले. (लोकमत न्यूज नेटवर्क)आॅनलाईन ईमेलद्वारे प्रश्न विचारले जाऊ शकतात व त्यांची उत्तरेही दिली जाऊ शकतात. कोणता विषय कोणाकडे किती दिवसांपासून प्रलंबित आहे हे माहिती व्हायला हवे. पाच मोठ्या शहरांमध्ये या व्यवस्थेची चाचणी घेण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. सगळ्या कर रिटर्नपैकी ८५ टक्के रिटर्न आता इलेक्ट्रॉनिक पद्धतीने दाखल केले जात आहेत. आयकर विभागाने आधारचा वापर करून ई-सत्यापन (व्हेरिफिकेशन) सुरू केले आहे. ४० लाखांपेक्षा जास्त करदात्यांनी या सुविधेचा वापर केला आहे. यापूर्वी इलेक्ट्रॉनिक रिटर्ननंतर कागदपत्रांचीही तपासणी व्हायची व त्यात कित्येक आठवडे लागायचे.१०,५०० कोटी रुपये देशात आणलेगेल्या १७ महिन्यांत चलनवाढ आणि विदेशी गुंतवणुकीसह सगळ्या निकषांवर अर्थव्यवस्थेची कामगिरी उत्तम आहे, असे मोदी यांनी म्हटले. आर्थिक सुधारणा या केवळ प्रसार माध्यमांत मथळे मिळविण्यासाठी नव्हे, तर लोकांच्या जीवनमानाचा दर्जा सुधारण्यासाठी सर्वसमावेशक अशा असल्या पाहिजेत यावर मोदी यांनी भर दिला. विदेशात दडवून ठेवण्यात आलेला काळा पैसा देशात परत आणण्यासाठी सरकारने केलेल्या प्रयत्नांना यश आले असून १०,५०० कोटी रुपये देशात आणता आले, असेही मोदी म्हणाले.आम्ही १७ महिन्यांपूर्वी सत्तेवर आलो तेव्हाच्या तुलनेत आमची कामगिरी चांगली आहे. सकल देशी उत्पादन (जीडीपी) वाढले असून चलनवाढ खाली आली आहे. विदेशी गुंतवणूक वाढली असून चालू खात्यावरील तूट घटली आहे. महसूल वाढला असून तूट कमी झाली आहे आणि रुपया स्थिर आहे.