शहरं
Join us  
Trending Stories
1
जैसलमेर दुर्घटनेतील मृतांचा आकडा २० वर; मोदींकडून दुःख व्यक्त, आर्थिक मदतीची घोषणा
2
जनरल झेडच्या आंदोलनामुळे आणखी एका देशात सत्तापालट!
3
'...तर पाकिस्तान उद्ध्वस्त झाला असता', ऑपरेशन सिंदूरबाबत लेफ्टिनेंट जनरल राजीव घईंचा मोठा खुलासा
4
रुग्णालयात नेताना आजारी मुलाचा वाटेतच मृत्यू; धक्क्याने वडिलांनीही सोडले प्राण!
5
अमरावती-गडचिरोली मार्गावर २२० क्विंटल 'पोर्टिफाईड तांदूळ' घेऊन जाणारा ट्रक पकडला
6
आरमोरी मार्गावर भरधाव ट्रकची दुचाकीला धडक; दोन भाऊ जागीच ठार!
7
सोनं भारतात सव्वा लाखांच्या पार, पाकिस्तानात किंमत काय? भाव ऐकून तुम्हालाही बसेल 'शॉक'
8
निवडणूक न लढवताही कार्यकर्ते झेडपी, पंचायत समितीचे सदस्य बनणार? बावनकुळेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र 
9
भारत-पाक सामना बरोबरीत सुटला! मग दोन्ही संघातील खेळाडूंमध्ये जे घडलं ते चर्चेत
10
"मी तुमची अनेक प्रकरणे पाहिली आहेत; बोललो तर उगाच...", CJI गवईंनी ईडीला फटकारले
11
गायिका मैथिली ठाकूरचा भाजपमध्ये प्रवेश! दुसऱ्या यादीत येणार नाव, कोणत्या मतदारसंघातून लढणार?
12
‘पात्र गावांना सामूहिक वनहक्क देण्याबाबत तातडीने कार्यवाही करावी’, अजित पवार यांचे आदेश
13
IPS पूरन कुमाार यांच्या पत्नीला अटक करा, ASI संदीप यांच्या कुटुंबीयांनी केली मागणी, कारण काय?
14
तो बापाच्या वशिल्यावर टीम इंडियात आलेला नाही, असं का म्हणाले गंभीर? जाणून घ्या त्यामागचं कनेक्शन
15
मनसेचा मविआमध्ये समावेश होणार की नाही? प्रस्तावाबाबत हर्षवर्धन सपकाळ यांनी स्पष्टच सांगितलं  
16
जैसलमेरमध्ये धावत्या बसला भीषण अचानक आग; १०-१२ जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची भिती
17
घायवळला मोक्का लावला, रोहित पवारांनी तो उठवला; सभापती राम शिंदे यांचा गौप्यस्फोट
18
BJP Candidate list: भाजपने १० विद्यमान आमदारांची तिकिटं कापली, ५ जण आहेत माजी मंत्री; पहिल्या यादीमध्ये कोण?
19
३१ व्या मजल्यावरून पडला, चप्पल, मोबाईल सापडले २४ व्या मजल्यावर, तरुणाच्या मृत्यूचं गुढ वाढलं   
20
लष्कराकडून जेन-Z वर गोळीबार करण्यास नकार, जीव वाचवून राष्ट्रपती देशाबाहेर पसार, या देशात अराजक

एकवेळ डोंगर हलवणं सोपं, पण आम्हाला नाही...चीनची भारताला धमकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2017 12:09 IST

भारताने माघार घेतली नाही तर डोकलाममधील आमच्या सैनिकांची संख्या वाढवू अशी धमकी चीनने दिली आहे

ऑनलाइन लोकमत
बीजिंग, दि. 24 - डोकलामवरुन भारत आणि चीनमध्ये सुरु असलेला तणाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. चीन आतापर्यंत सरकारी मीडियाच्या माध्यमातून भारताला युद्दाची धमकी देत आला आहे, मात्र आता तर चीनने उघडपणे भारताला युद्धासाठी चेतावणी दिली आहे. एकवेळ डोंगर हलवणं सोपं आहे, मात्र चीन लष्कराला नाही, त्यामुळे भारताने डोकलाममधून मागे हटावं असा इशारा चीनने भारताला दिला आहे. भारताने माघार घेतली नाही तर डोकलाममधील आमच्या सैनिकांची संख्या वाढवू असं चीन लष्कराचे प्रवक्ते बोलले आहेत. 
संबंधित बातम्या
डोकलाम वाद चिघळल्यास होईल भीषण युद्ध, चिनी माध्यमांची धमकी
डोकलाम प्रकरणी चीनला नव्हती भारताकडून आक्रमकतेची अपेक्षा
डोकलाम वाद : चीन लपवत आहे 1890 कराराचं सत्य ?
तिढा वाढला! भारतापाठोपाठ चीननेही डोकलाममध्ये ठोकले तंबू
 
चीन लष्कराचे प्रवक्ते वू कियाने यांनी भारताला धमकी देताना सांगितलं आहे की, "चीन लष्कराचा 90 वर्षांचा इतिहास आमची ताकद आणि किती सक्षम आहोत हे दर्शवतं. एकवेळ डोंगर हलवणं सोपं आहे, मात्र लष्कराला नाही". पुढे बोलताना त्यांनी सांगितलं की, "भारताने कोणत्याही भ्रमात राहू नये. आमच्या मातृभूमीचं संरक्षण करण्यासाठी कोणतीही किंमत चुकवू". 
 
डोकलाममधील संपुर्ण वाद चीनने रस्ता बांधण्यास सुरुवात केल्यानंतर सुरु झाला होता. त्याचा उल्लेख करताना कियान यांनी सांगितलं की, "जून महिन्याच्या मध्यंतरी चीनने आपल्या क्षेत्रात रस्ता बांधण्याचा निर्णय घेतला होता. डोकलाम चीनचा परिसर असून, चीनने आपल्या क्षेत्रात एखादा रस्ता बांधणे सामान्य घटना आहे". भारतावर सीमोल्लंघनाचा आरोप करत ते पुढे बोलले की, "भारताने चीनमध्ये घुसखोरी करणे हे आंतरराष्ट्रीय सीमेचं उल्लंघन असून गंभीर प्रकरण आहे. हे आंतरराष्ट्रीय कायद्याच्या विरोधात आहे". 
 
जोपर्यंत भारतीय सैनिक माघारी फिरत नाहीत तोपर्यंत आम्ही कोणत्याही प्रकारची चर्चा करणार नाही असं चीनने याआधीही सांगितलं आहे. आपल्या या भूमिकेची पुनरावृत्ती करताना चीन लष्कराच्या प्रवक्त्यांनी सांगितलं की, "भारताने आपलं सैन्य मागे घ्यावं यासाठी आम्ही भारताला आग्रह करत आहोत. ही समस्या सोडवण्यामध्ये ही अट महत्वाची आहे". 
 
चीनमधील प्रसारमाध्यमं वारंवार युद्धाच्या धमक्या देत भारतावर दबाव आणण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र आपण कोणत्याही दबावासमोर झुकणार नाही हे भारतानेही स्पष्ट केलं आहे. भारतीय लष्कराने डोकलाममध्ये तंबू ठोकत कोणत्याही किमतीवर मागे हटणार नसल्याचे संकेत दिले आहेत.