शहरं
Join us  
Trending Stories
1
India Squad For Asia Cup 2025: संघ ठरला! सूर्याच्या नेतृत्वाखाली गिलकडेही आली मोठी जबाबदारी, कुणाला मिळाली संधी?
2
'त्या' ५०० जवानांसाठी सुप्रीम कोर्ट पुढे सरसावलं; केंद्र अन् तिन्ही सैन्य दलाकडे मागितले उत्तर
3
व्लादिमीर पुतिन यांची ऑफर लीक झाली, डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाचा प्लान जगाला सांगितला
4
नोकरी खाजगी, पैसा सरकारी! पंतप्रधान विकासित भारत रोजगार योजनेचं पोर्टल सुरू, किती मिळणार पैसे?
5
आईने दोन पेग घेतले, त्यानंतर..., निळ्या ड्रमातील मृतदेह प्रकरणात मुलाने दिली धक्कादायक माहिती  
6
Asia Cup 2025 : त्याची काही चूक नाही, पण... आशिया कपसाठी श्रेयस अय्यर संघात का नाही? पुन्हा तोच रिप्लाय
7
Mumbai Local Train Update: मध्य, हार्बर मार्गावरील लोकल रेल्वे सेवा रद्द; कुठून कुठपर्यंत सुरू?
8
Mumbai Rain Updates Live: पावसात अडकलेल्यांसाठी मुंबई महापालिका सरसावली; पाणी, खाद्यपदार्थांचे वाटप
9
मालिकेसाठी कायपण! शूटिंगसाठी मंदार आणि गिरिजा प्रभूचा कमरेभर पाण्यातून जीवघेणा प्रवास, व्हिडीओ समोर
10
नाथपंथीय दीक्षा, माऊलींची परंपरा, स्वामीकृपा; ‘सोऽहम’मंत्र देणारे पावसचे स्वामी स्वरुपानंद
11
वरून वीज, खालीही वीज...! एकाला करंट लागल्याने समजले, नाहीतर...; कोणत्या शहरात घडले...
12
बॉयफ्रेंडसोबत राहण्याचा हट्ट, आईने १२ वर्षांच्या मुलीचं स्वतःच्या प्रियकराशी लग्न; नंतर पतीचा काटा काढला अन्.. 
13
आता रेल्वे प्रवासात कितीही सामान नेता येणार नाही, लवकरच निश्चित होतोय नियम; जाणून घ्या, कोणत्या क्लाससाठी किती मर्यादा?
14
'आम्हाला मतदान करा, राहुल गांधींना देशाचे पंतप्रधान करू', तेजस्वी यादवांची घोषणा
15
Thane: पावसाचा कहर, त्यात रस्त्यावरील पाण्यात साप; ठाणे शहरातील हा व्हिडीओ बघा
16
Mumbai Rains: मुंबईकरांसमोर आणखी एक संकट, मिठी नदीने धोक्याची पातळी गाठली, सतर्क राहण्याचा इशारा!
17
डॉक्टर सांगतात, सणासुदीला तळणीसाठी 'या' तेलाची निवड करा; ना वजन वाढणार, ना तब्येत बिघडणार 
18
गाझामध्ये 'हा' धोकादायक आजार का पसरतोय वेगाने? उपचारही झालेत अशक्य; डॉक्टरांची डोकेदुखी वाढली!
19
'नेहरूंनी पाकिस्तानला मदत केली होती', 'सिंधू जल' करारावरुन पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
20
"बहुत तेज बारिश है!" टीम इंडियाच्या सिलेक्शनसाठी IPL छत्रीतून सूर्या दादाची कडक एन्ट्री; व्हिडिओ व्हायरल

एकवेळ डोंगर हलवणं सोपं, पण आम्हाला नाही...चीनची भारताला धमकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2017 12:09 IST

भारताने माघार घेतली नाही तर डोकलाममधील आमच्या सैनिकांची संख्या वाढवू अशी धमकी चीनने दिली आहे

ऑनलाइन लोकमत
बीजिंग, दि. 24 - डोकलामवरुन भारत आणि चीनमध्ये सुरु असलेला तणाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. चीन आतापर्यंत सरकारी मीडियाच्या माध्यमातून भारताला युद्दाची धमकी देत आला आहे, मात्र आता तर चीनने उघडपणे भारताला युद्धासाठी चेतावणी दिली आहे. एकवेळ डोंगर हलवणं सोपं आहे, मात्र चीन लष्कराला नाही, त्यामुळे भारताने डोकलाममधून मागे हटावं असा इशारा चीनने भारताला दिला आहे. भारताने माघार घेतली नाही तर डोकलाममधील आमच्या सैनिकांची संख्या वाढवू असं चीन लष्कराचे प्रवक्ते बोलले आहेत. 
संबंधित बातम्या
डोकलाम वाद चिघळल्यास होईल भीषण युद्ध, चिनी माध्यमांची धमकी
डोकलाम प्रकरणी चीनला नव्हती भारताकडून आक्रमकतेची अपेक्षा
डोकलाम वाद : चीन लपवत आहे 1890 कराराचं सत्य ?
तिढा वाढला! भारतापाठोपाठ चीननेही डोकलाममध्ये ठोकले तंबू
 
चीन लष्कराचे प्रवक्ते वू कियाने यांनी भारताला धमकी देताना सांगितलं आहे की, "चीन लष्कराचा 90 वर्षांचा इतिहास आमची ताकद आणि किती सक्षम आहोत हे दर्शवतं. एकवेळ डोंगर हलवणं सोपं आहे, मात्र लष्कराला नाही". पुढे बोलताना त्यांनी सांगितलं की, "भारताने कोणत्याही भ्रमात राहू नये. आमच्या मातृभूमीचं संरक्षण करण्यासाठी कोणतीही किंमत चुकवू". 
 
डोकलाममधील संपुर्ण वाद चीनने रस्ता बांधण्यास सुरुवात केल्यानंतर सुरु झाला होता. त्याचा उल्लेख करताना कियान यांनी सांगितलं की, "जून महिन्याच्या मध्यंतरी चीनने आपल्या क्षेत्रात रस्ता बांधण्याचा निर्णय घेतला होता. डोकलाम चीनचा परिसर असून, चीनने आपल्या क्षेत्रात एखादा रस्ता बांधणे सामान्य घटना आहे". भारतावर सीमोल्लंघनाचा आरोप करत ते पुढे बोलले की, "भारताने चीनमध्ये घुसखोरी करणे हे आंतरराष्ट्रीय सीमेचं उल्लंघन असून गंभीर प्रकरण आहे. हे आंतरराष्ट्रीय कायद्याच्या विरोधात आहे". 
 
जोपर्यंत भारतीय सैनिक माघारी फिरत नाहीत तोपर्यंत आम्ही कोणत्याही प्रकारची चर्चा करणार नाही असं चीनने याआधीही सांगितलं आहे. आपल्या या भूमिकेची पुनरावृत्ती करताना चीन लष्कराच्या प्रवक्त्यांनी सांगितलं की, "भारताने आपलं सैन्य मागे घ्यावं यासाठी आम्ही भारताला आग्रह करत आहोत. ही समस्या सोडवण्यामध्ये ही अट महत्वाची आहे". 
 
चीनमधील प्रसारमाध्यमं वारंवार युद्धाच्या धमक्या देत भारतावर दबाव आणण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र आपण कोणत्याही दबावासमोर झुकणार नाही हे भारतानेही स्पष्ट केलं आहे. भारतीय लष्कराने डोकलाममध्ये तंबू ठोकत कोणत्याही किमतीवर मागे हटणार नसल्याचे संकेत दिले आहेत.