शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवसेना पक्ष, चिन्हाचा खटला पुन्हा लांबणीवर; अंतिम सुनावणीसाठी पुढील तारीख, कोर्टात आज काय घडलं?
2
भारत डिजिटल तंत्रज्ञानाचा 'पॉवरहाऊस', ‘Make in India’ची खिल्ली उडवणाऱ्यांना PM मोदींचे उत्तर
3
Google भारतात करणार ८८,७०० कोटींची गुंतवणूक, 'या' राज्यात उभं राहणार आशियातील सर्वात मोठं डेटा सेंटर
4
म्यानमारमध्ये धार्मिक कार्यक्रमादरम्यान पॅराग्लायडरने बॉम्ब हल्ला; २४ जणांचा मृत्यू, ४७ जखमी
5
Nashik Crime: कंटाळलो होतो म्हणून आईची हत्या केली, पोटच्या मुलानेच घेतला जीव; पोलिसही हादरले
6
अक्कलकोट हेच गाणगापूर! स्वामी देतात नृसिंह सरस्वती स्वरुपात दर्शन, पुजारी होतात नतमस्तक
7
सैफ अली खानची एक्स पत्नी अमृता सिंहसोबत कसं होतं नातं? बहीण सोहा म्हणाली, "आम्ही दोघी..."
8
भारत-पाकिस्तान यांच्यात पुन्हा युद्धाचे सावट?; पाक संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांची पोकळ धमकी
9
८४ वर्षांनी नवपंचम नीचभंग राजयोग: ८ राशींचे कल्याण, सरकारी लाभ; पद-पैसा-प्रतिष्ठा, शुभ-मंगल!
10
धक्कादायक! राजस्थानमध्ये प्राणघातक गोळ्या! नमुने फेल झाले होते तरीही हजारो गोळ्या विकल्या
11
सोने-चांदीच्या किमतीचा फुगा फुटणार? भाव ₹१.२२ लाखांवरून थेट ₹७७,७०० पर्यंत कोसळणार? कोणी दिला इशारा
12
टाटा कॅपिटल आणि एलजी इलेक्ट्रॉनिक्सच्या IPO मध्ये चढाओढ; कोणाची किती मागणी, तुम्ही गुंतवणूक केलीये का?
13
वस्ताद द्रविडचं नाव घेत रोहित शर्मानं ठोकला गंभीरविरोधात शड्डू! शेअर केली यशामागची खरी गोष्ट
14
भारतात येणासाठी फ्लाइटमध्ये प्रवेश करताच ब्रिटिश PM स्टार्मर म्हणाले, 'मी तुमचा पंतप्रधान बोलतोय...!'; जाणून घ्या नेमकं काय घडलं
15
VIRAL : ७ वर्षांपूर्वी झोमॅटोवर किती रुपयांना मिळायचा पनीर टिक्का? बील होतंय व्हायरल; आकडा पाहून विश्वासच बसणार नाही!
16
"नवरा मेल्याचा पश्चाताप नाही, ४ मुलांच्या मृत्यूचं दुःख"; काय म्हणाली बॉयफ्रेंडसोबत पळालेली महिला?
17
मुंबईत दाऊदच्या जवळच्या माणसाभोवती ईडीने फास आवळला, सलीम डोलाच्या ८ ठिकाणांवर धाडी
18
आता चष्म्याद्वारेही UPI पेमेंट करता येणार; मोबाईल फोनची गरजच भासणार नाही, पाहा डिटेल्स
19
'खेलने का बहुत शॉक था उसे, फिर मैने भी सिखा दिया...!' निक्की तांबोळीचा धनश्री वर्मावर निशाणा
20
Cough Syrup : पालकांनो अलर्ट! लहान मुलांना कधी, कसं, किती द्यावं कफ सिरप? AIIMS च्या डॉक्टरांचा मोलाचा सल्ला

वन रँक वन पेन्शन लागू

By admin | Updated: September 6, 2015 05:08 IST

चार दशकांपासून प्रलंबित असलेली ‘वन रँक वन पेन्शन’(ओआरओपी) ही सैनिकांसाठीची निवृत्तिवेतन योजना लागू करण्याची घोषणा अखेर केंद्र सरकारतर्फे शनिवारी करण्यात आली.

नवी दिल्ली : चार दशकांपासून प्रलंबित असलेली ‘वन रँक वन पेन्शन’(ओआरओपी) ही सैनिकांसाठीची निवृत्तिवेतन योजना लागू करण्याची घोषणा अखेर केंद्र सरकारतर्फे शनिवारी करण्यात आली. शिवाय आंदोलनकर्त्यांच्या संरक्षणमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत मुख्य मागणी असलेल्या स्वत:हून मुदतपूर्व निवृत्ती घेणाऱ्यांबाबतही सरकार सकारात्मक असल्याची ग्वाही मिळाली असल्याने ८४ दिवसांपासून सुरू असलेले आंदोलन मागे घेतले जाण्याची शक्यता आहे. सरकारच्या निर्णयाने सुमारे २६ लाख सेवानिवृत्त सैनिक आणि ६ लाखांवर शहिदांच्या विधवांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. ओआरओपी लागू होण्यापूर्वी सेनादलातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या पेन्शनपोटी सरकार वर्षाकाठी ५४ हजार कोटी रुपये खर्च करीत आहे. त्यात ओआरओपीच्या ८ ते १० हजार कोटींची भर पडेल. संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी ‘वन रँक वन पेन्शन’ योजना १ जुलै २०१४पासून लागू करण्याचा निर्णय सरकारने घेतला असल्याचे जाहीर केले. विशेष म्हणजे याअंतर्गत निवृत्तिवेतनाची फेररचना दर पाच वर्षांनी होणार आहे. परंतु माजी सैनिकांनी यासाठी एक वर्षाच्या मुदतीची मागणी केली होती. वन रँक वन पेन्शनच्या अंमलबजावणीसाठी २०१३ हे पायाभूत वर्ष राहील. सायंकाळी संरक्षणमंत्र्यांसोबत आंदोलनकर्त्या माजी सैनिकांची बैठक झाली. त्यात स्वत:हून मुदतपूर्व निवृत्ती घेतल्यानंतरही सैनिकांना पेन्शन देण्याबाबत सरकार सकारात्मक विचार करणार असल्याची ग्वाही संरक्षणमंत्र्यांनी दिली आहे. यासंबंधी अधिकृत स्पष्टीकरण करण्याची खात्री संरक्षणमंत्र्यांनी दिल्याने आंदोलन सुरू ठेवायचे की नाही याचा निर्णय रविवारी सकाळी कोअर कमिटीच्या बैठकीनंतर घेऊ, असे आंदोलनकर्त्यांचे नेते सेवानिवृत्त मेजर जनरल सतबीरसिंग यांनी बैठकीनंतर सांगितले.योजनेची ठळक वैशिष्ट्ये- वन रँक वन पेन्शनची रिव्हिजन दर पाच वर्षांनी करणार, म्हणजे दर पाच वर्षांनी सैनिकांचे निवृत्तिवेतन वाढणार. - वन रँक वन पेन्शन १ जुलै २०१४पासून लागू होणार. तेव्हापासून आतापर्यंतची थकबाकी चार हप्त्यांत दिली जाईल; तर शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबीयांना एकाच हप्त्यात थकबाकी मिळेल.- केवळ थकबाकीपोटी सरकारवर जवळपास १० ते १२ हजार कोटी रु पयांचा बोजा पडणार आहे.ं-तांत्रिक व आर्थिक कारणांसाठी हा प्रश्न प्रलंबित होता. आधीच्या सरकारांनी ५०० कोटी रु पयांचा भार पडेल, असे सांगितले. परंतु हा भार प्रत्यक्षात ८ हजार कोटी रु पयांचा आहे आणि तो पुढे वाढेल.- अंमलबजावणीसाठी अंदाजे खर्च ८ ते १० हजार कोटी रुपये - सुमारे २६ लाख सेवानिवृत्त सैनिक आणि ६ लाखांवर शहिदांच्या विधवांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.वन रँक वन पेन्शन हा एक किचकट मुद्दा आहे. वेगवेगळ्या वेळी वेगवेगळ्या पदांवरून सेवानिवृत्त होणाऱ्या सैनिकांच्या हिताची सखोल पडताळणी करणे गरजेचे आहे. हा केवळ प्रशासकीय मुद्दा नसून सैन्यदलातील अंतर्गत सेवांचाही विचार करावा लागणार आहे. आता वन रँक वन पेन्शनचा प्रश्न निकालात निघाला असल्याने सैनिकांनी पुन्हा देशसेवेमध्ये झोकून द्यावे.- मनोहर पर्रीकर, संरक्षणमंत्रीहा एक ऐतिहासिक निर्णय आहे. नरेंद्र मोदी यांनी २०१४च्या लोकसभा निवडणूक प्रचारात वन रँक वन पेन्शनचे वचन दिले होते. त्यांनी दिलेल्या वचनाची पूर्तता करून दाखविली. - अमित शहा, भाजपाध्यक्षसरकारची घोषणा अत्यंत निराशाजनक आहे. सरकार ओआरओपीच्या मुद्द्याचे राजकारण करीत असून, या योजनेतील मुख्य तरतुदी कमकुवत करण्यात आल्या आहेत.- ए.के. अ‍ॅन्टनी, माजी संरक्षणमंत्री व काँग्रेस नेते