शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
5
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
6
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
7
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
8
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
9
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
10
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
11
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
12
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
13
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
14
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
15
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
16
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
17
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
18
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
19
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
20
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!

दुष्काळी भागातील शेतकर्‍यांना १ लाख क्विंटल बियाणे मोफत एकनाथराव खडसे : पंतप्रधान पीक विमा योजनेसाठी दोन हजार कोटींची तरतूद

By admin | Updated: May 16, 2016 00:40 IST

जळगाव : दुष्काळग्रस्त भागातील शेतकर्‍यांना यावर्षी शासनातर्फे एक लाख क्विंटल बियाणे मोफत देण्यात येणार आहे. तसेच पंतप्रधान पीक विमा योजनेसाठी शासनाने दोन हजार कोटी रुपयांची तरतूद केल्याची माहिती कृषी तथा महसूल मंत्री एकनाथराव खडसे यांनी रविवारी संध्याकाळी ५ वाजता शासकीय विश्रामगृहावर पत्रकारांशी बोलताना दिली.

जळगाव : दुष्काळग्रस्त भागातील शेतकर्‍यांना यावर्षी शासनातर्फे एक लाख क्विंटल बियाणे मोफत देण्यात येणार आहे. तसेच पंतप्रधान पीक विमा योजनेसाठी शासनाने दोन हजार कोटी रुपयांची तरतूद केल्याची माहिती कृषी तथा महसूल मंत्री एकनाथराव खडसे यांनी रविवारी संध्याकाळी ५ वाजता शासकीय विश्रामगृहावर पत्रकारांशी बोलताना दिली.
राज्यामध्ये बियाण्यांची एकूण गरज ही १४.९९ लाख क्विंटल इतकी आहे. त्यासाठी १७.९० लाख क्विंटल बियाणे उपलब्ध आहे. बी.टी.कपाशी लागवडीसाठी १६० लाख पाकिटांची गरज असून त्यासाठी २०० लाख पाकिटे उपलब्ध असल्याचे त्यांनी सांगितले.
आंतरराष्ट्रीय कडधान्य वर्ष
२०१६/१७ हे वर्ष आंतरराष्ट्रीय कडधान्य वर्ष घोषित करण्यात आले आहे. पीक प्रात्याक्षिकासाठी ५४ हजार क्विंटल बियाणे १०० टक्के अनुदानावर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तर एक लाख ५५ हजार क्विंटल बियाणे वितरणावर ३६ कोटीचे अनुदान वितरीत करण्यात येणार आहे. नवीन वाणांचे १.५० लाख क्विंटल बियाणे उत्पादन करण्यासाठी ३६ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. तुरीची उत्पादकता वाढीसाठी इक्रीसॅट संस्थेच्या पिकाचे संकरीत वाण आयसीपीएच २७४० चे १२०० क्िंवटल बियाणे शेतकर्‍यांना १०० टक्के अनुदानावर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तेलबिया पिका अंतर्गत २१००० क्विंटल सोयाबीण बियाणे पीक प्रात्यक्षिकांसाठी १०० टक्के अनुदानावर देण्यात येईल.
राज्यामध्ये खरीप हंगामात रासायनिक खतांचा वापर ३० ते ३२ लाख मे.टन आहे. यावर्षी खरीपासाठी ४० लाख मे.टन रासायनिक खते उपलब्ध आहेत. सद्यस्थितीत ११.८८ लाख मे.टन साठा शिल्लक असल्याचे त्यांनी सांगितले.
बियाणे, खते व किटकनाशके यासाठी ५७१ उत्पादक असून १.२४ लाख वितरक आहेत. गुणवत्ता नियंत्रणासाठी ३९५ भरारी पथकांची स्थापना केली आहे.
पीक विमा आता सर्व शेतकर्‍यांचा
खरीप हंगामात पंतप्रधान पीक विमा योजनेच्या अंमलबजावणीसाठी राज्यशासनाने मंजुरी दिली आहे. पिक विम्यासाठी शासनाने दोन हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे. पूर्वी केवळ कर्जदार शेतकर्‍यांचा पीक विमा काढण्यात येत होता. आता तो सर्व शेतकर्‍यांचा काढण्यात येणार आहे. शेतकर्‍यांना केवळ दोन टक्के दराने विमा हप्ता भरायचा असून उर्वरित हप्त्याची रक्कम केंद्र व राज्य शासन भरणार असल्याचे त्यांनी सांगितले.