शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
4
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
5
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
6
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
7
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
8
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
9
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
10
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
11
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
12
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
13
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
14
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
15
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
16
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
17
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
18
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
19
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
20
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
Daily Top 2Weekly Top 5

राजस्थानात बनणार एक लाख कोटींचे रस्ते - गडकरी

By admin | Updated: March 11, 2017 01:54 IST

केंद्र सरकारच्या मदतीने राजस्थानात एक लाख कोटींच्या रस्त्यांची निर्मिती करीत नवा विक्रम प्रस्थापित केला जाणार असल्याची घोषणा केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी

- धीरेंद्र जैन, जयपूर

केंद्र सरकारच्या मदतीने राजस्थानात एक लाख कोटींच्या रस्त्यांची निर्मिती करीत नवा विक्रम प्रस्थापित केला जाणार असल्याची घोषणा केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांच्या उपस्थितीत केली.स्वातंत्र्यानंतर डिसेंबर २०१३ पर्यंत राजस्थानात जेवढे महामार्ग बनले तेवढ्याच लांबीचे महामार्ग या पाच वर्षांच्या काळात बनतील, असे त्यांनी सीकर जिल्ह्णातील जुुलियासरच्या लक्ष्मणगढ येथे तसेच दौसा येथे विशाल जाहीरसभेत नमूद केले. त्यांनी २७४६ कोटींच्या पाच महामार्ग प्रकल्पाचा शिलान्यास केला.सालासर येथे १२०० कोटींचे विकासकार्य....गडकरी आणि वसुंधरा राजे यांनी १२०० कोटींच्या विकासकामांचा शुभारंभ केला. राष्ट्रीय महामार्ग ६५ च्या निर्मितीवर ६३७ कोटी रुपयांचा खर्च येणार असून या दोघांनी ११९.६ किलोमीटर लांब सालासर-नागौर तसेच नागौर-जायल- डीडवाना- सालासर- लक्ष्मणगढ- मुकुंदगड या १९६ किमी मार्गाचा शिलान्यासही केला, तसेच चुरूजवळील साहवा येथील राजकीय सामुदायिक आरोग्य केंद्राचे उद्घाटन केले.सालासर बालाजी यांचा आशीर्वादगडकरी आणि वसुंधरा राजे यांनी प्रसिद्ध सालासर धाम येथे बालाजींचे दर्शन घेतले. तेथे नारळ बांधून राज्य आणि देशाच्या प्रगतीसाठी साकडे घातले.रस्त्यावर उतरणार विमानभारतमाला प्रकल्पांतर्गत राजस्थानच्या सीमा भागात तीन ठिकाणी एअर स्ट्रीप म्हणून वापर होईल असे महामार्ग तयार केले जाणार असून तेथे विमान उतरविणे शक्य होईल, अशी माहिती गडकरी यांनी दिली.समुद्राच्या पाण्याने भागवणार तहानराजस्थानातील भीषण पाणीटंचाईवर मात करण्यासाठी जल स्वावलंबन मोहीम राबविली जात आहे. त्यातून समुद्राचे पाणी पिण्यायोग्य बनवत राज्याची तहान भागविली जाईल, असे मुख्यमंत्री राजे यांनी स्पष्ट केले.जयपूर-दिल्ली एक्स्प्रेसचे काम याच वर्षीदिल्ली- जयपूर राष्ट्रीय महामार्ग एक्स्प्रेस-वेच्या रूपाने विकसित करण्याचे काम याच वर्षी सुरू होणार असून त्यासाठी १८ हजार कोटींचा खर्च होईल. जर्मनीच्या धर्तीवरील या महामार्गामुळे दिल्ली- जयपूर अंतर दोन तासांपेक्षा कमी वेळात पूर्ण करता येईल. डिसेंबर २०१३ पर्यंत राजस्थानात ७४९८ किमी. राष्ट्रीय महामार्ग होते. या राज्यात सुमारे ७ हजार किमी राष्ट्रीय महामार्ग बनविले जाणार आहेत.