शहरं
Join us  
Trending Stories
1
सीरियावरील हल्ल्यांमुळे इराण संतापला; इस्रायलला जन्माची अद्दल घडवण्यासाठी आखला प्लॅन
2
ना कॉल ना गिफ्ट...! शमीची पोस्ट बघून हसीन जहाँच्या मनात आली ही गोष्ट, म्हणाली...
3
STनेच होणार विदर्भातील नागरिकांची नागद्वार यात्रा, दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची फोनवर चर्चा
4
उद्योगपती कल्याणींच्या कन्येची वडिलोपार्जित मालमत्तेवरील मालकी हक्कासाठी कराड न्यायालयात धाव
5
"आम्ही युद्धाला घाबरत नाही, आमचं संपूर्ण आयुष्य..."; सीरियाच्या राष्ट्राध्यक्षांचा इस्रायलला इशारा
6
IND vs ENG : नो रिस्क; बुमराह चौथा कसोटी सामना खेळणार हे जवळपास फिक्स! प्रशिक्षकांनीच दिली हिंट
7
VIDEO: अंबरनाथ पालिकेत दोन ठेकेदारांमध्ये पोलिसांसमोरच सुरू झाली फ्री-स्टाइल हाणामारी
8
टाटा समूहाच्या हॉटेल कंपनीला २९६ कोटींचा नफा, ५ वर्षांत गुंतवणूकदारांना केलं मालामाल; दिला बंपर परतावा!
9
"महाराष्ट्र झाले २० टक्के कमिशनचे राज्य, राज्यात सत्ताधारी टॉवेल बनियन गँगचा धुमाकूळ’’, विजय वडेट्टीवार यांची टीका  
10
"राज्यात पाच महिन्यात १ लाख ६० हजार गुन्हे, ९२४ हत्या", अंबादास दानवे यांनी मांडली धक्कादायक आकडेवारी
11
विधिमंडळात पडळकर आणि आव्हाडांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी; CM फडणवीस म्हणाले, 'हे योग्य नाही'
12
अहमदाबादमधील विमान अपघात वैमानिकांच्या चुकीमुळे? AAIBने स्पष्टच सांगितलं, ते दावे फेटाळले
13
काल पडळकर आणि आव्हाडांमध्ये वाद, आज दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते भिडले, विधानभवन परिसरात पुन्हा राडा, पाहा VIdeo
14
"भगवद्गीता वाचून हिंदू झालो, पण हिंदू होण्यासाठी...?" बाबा बागेश्वर आणि पाकिस्तानचे आरिफ अजाकिया यांच्यातील प्रश्नोत्तर व्हायरल
15
CM फडणवीस म्हणाले त्रिभाषा सूत्र लागू करणार; उद्धव ठाकरेंनी हिंदीला विरोध करणारे पुस्तकच भेट दिलं
16
Ghatkopar Wall Collapse: घराच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळल्याने कामगाराचा मृत्यू, घाटकोपर येथील घटना!
17
दिसला गं बाई दिसला... अखेर सारा तेंडुलकर अन् शुबमन गिलचा 'तो' VIDEO सापडलाच..!!
18
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   
19
यूपी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये २३८ गुन्हेगार ठार, तर ९ हजारांहून अधिक गोळीबारात जखमी
20
IND W vs ENG W : वनडेत एक नंबर कामगिरी! स्मृती-प्रतिका सलामी जोडीनं सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड

राजस्थानात बनणार एक लाख कोटींचे रस्ते - गडकरी

By admin | Updated: March 11, 2017 01:54 IST

केंद्र सरकारच्या मदतीने राजस्थानात एक लाख कोटींच्या रस्त्यांची निर्मिती करीत नवा विक्रम प्रस्थापित केला जाणार असल्याची घोषणा केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी

- धीरेंद्र जैन, जयपूर

केंद्र सरकारच्या मदतीने राजस्थानात एक लाख कोटींच्या रस्त्यांची निर्मिती करीत नवा विक्रम प्रस्थापित केला जाणार असल्याची घोषणा केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांच्या उपस्थितीत केली.स्वातंत्र्यानंतर डिसेंबर २०१३ पर्यंत राजस्थानात जेवढे महामार्ग बनले तेवढ्याच लांबीचे महामार्ग या पाच वर्षांच्या काळात बनतील, असे त्यांनी सीकर जिल्ह्णातील जुुलियासरच्या लक्ष्मणगढ येथे तसेच दौसा येथे विशाल जाहीरसभेत नमूद केले. त्यांनी २७४६ कोटींच्या पाच महामार्ग प्रकल्पाचा शिलान्यास केला.सालासर येथे १२०० कोटींचे विकासकार्य....गडकरी आणि वसुंधरा राजे यांनी १२०० कोटींच्या विकासकामांचा शुभारंभ केला. राष्ट्रीय महामार्ग ६५ च्या निर्मितीवर ६३७ कोटी रुपयांचा खर्च येणार असून या दोघांनी ११९.६ किलोमीटर लांब सालासर-नागौर तसेच नागौर-जायल- डीडवाना- सालासर- लक्ष्मणगढ- मुकुंदगड या १९६ किमी मार्गाचा शिलान्यासही केला, तसेच चुरूजवळील साहवा येथील राजकीय सामुदायिक आरोग्य केंद्राचे उद्घाटन केले.सालासर बालाजी यांचा आशीर्वादगडकरी आणि वसुंधरा राजे यांनी प्रसिद्ध सालासर धाम येथे बालाजींचे दर्शन घेतले. तेथे नारळ बांधून राज्य आणि देशाच्या प्रगतीसाठी साकडे घातले.रस्त्यावर उतरणार विमानभारतमाला प्रकल्पांतर्गत राजस्थानच्या सीमा भागात तीन ठिकाणी एअर स्ट्रीप म्हणून वापर होईल असे महामार्ग तयार केले जाणार असून तेथे विमान उतरविणे शक्य होईल, अशी माहिती गडकरी यांनी दिली.समुद्राच्या पाण्याने भागवणार तहानराजस्थानातील भीषण पाणीटंचाईवर मात करण्यासाठी जल स्वावलंबन मोहीम राबविली जात आहे. त्यातून समुद्राचे पाणी पिण्यायोग्य बनवत राज्याची तहान भागविली जाईल, असे मुख्यमंत्री राजे यांनी स्पष्ट केले.जयपूर-दिल्ली एक्स्प्रेसचे काम याच वर्षीदिल्ली- जयपूर राष्ट्रीय महामार्ग एक्स्प्रेस-वेच्या रूपाने विकसित करण्याचे काम याच वर्षी सुरू होणार असून त्यासाठी १८ हजार कोटींचा खर्च होईल. जर्मनीच्या धर्तीवरील या महामार्गामुळे दिल्ली- जयपूर अंतर दोन तासांपेक्षा कमी वेळात पूर्ण करता येईल. डिसेंबर २०१३ पर्यंत राजस्थानात ७४९८ किमी. राष्ट्रीय महामार्ग होते. या राज्यात सुमारे ७ हजार किमी राष्ट्रीय महामार्ग बनविले जाणार आहेत.