शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: मोहसीन नक्वी टीम इंडियाला ट्रॉफी द्यायला झाले तयार, पण आता ठेवली 'ही' एक अट
2
तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त
3
चांदी दीड लाख रूपये किलो, सप्टेंबरमध्ये २१,५२७ रुपयांची झेप; सोन्याचीही ११ हजारांची उडी
4
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
5
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप
6
पंतप्रधान मोदी करणार ‘मुख्यमंत्री अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ कार्यक्रमाचे उद्घाटन
7
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
8
दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना
9
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
10
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
11
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
12
अंधेरी क्रीडा संकुल महापालिकेने स्वतः उभारावे; गोपाळ शेट्टी यांची पालिका आयुक्तांकडे मागणी
13
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
14
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...
15
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
16
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
17
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
18
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
19
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
20
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?

पर्यटनाद्वारे एक लाख कोटींचे परकीय चलन!

By admin | Updated: December 30, 2014 23:31 IST

पर्यटन क्षेत्राच्या वाढीसाठी २०१४ वर्ष खूप महत्त्वाचे ठरले. जानेवारी ते नोव्हेंबरदरम्यान ६५. ८ लाख परदेशी पर्यटकांनी भारताला भेट दिली

नवी दिल्ली : पर्यटन क्षेत्राच्या वाढीसाठी २०१४ वर्ष खूप महत्त्वाचे ठरले. जानेवारी ते नोव्हेंबरदरम्यान ६५. ८ लाख परदेशी पर्यटकांनी भारताला भेट दिली व त्यातून थोडेथोडके नव्हे, तर तब्बल एक लाख कोटींचे बहुमोल परकीय चलन देशाला मिळाले. व्हिसा प्रणालीत आणखी सुटसुटीतपणा आणत केंद्राने ‘इलेक्ट्रॉनिक ट्रॅव्हल आॅथोरायझेशन’ (ईटीए) प्रणाली सुरू करून महत्त्वाचे पाऊल टाकले. पर्यटन मंत्रालयाने नोव्हेंबर २०१४ मध्ये ईटीएद्वारे ४३ देशांतील नागरिकांना व्हिसा सुविधा सुरू केली. त्यामुळे अनेक किचकट प्रक्रियांतून पर्यटकांची मुक्तता होऊन तब्बल १६ हजार व्हिजांची प्रोसेसिंग झाली. परदेशी पर्यटकांसाठी ‘स्वागत कार्ड’ योजना सुरू करण्यात आली. त्याबरोबर बहुप्रतीक्षित ‘टुरिस्ट हेल्पलाईन’ सुरू केली. ही हेल्पलाईन २४ तास सुरू राहणार आहे. सध्या दोन भाषांमध्ये असलेली ही सुविधा लवकरच १० परदेशी भाषांमध्ये सुरू होणार आहे. परदेशी पर्यटकांना विमानतळावरच ‘स्वागत कार्ड’ देण्यात येईल, त्यावर सर्व महत्त्वाचे क्रमांक देण्यात येतील. श्रीपाद नाईक यांच्याकडून महेश शर्मा यांच्याकडे पर्यटन मंत्रालयाची सूत्रे देण्यात आल्यानंतर काही महत्त्वाच्या योजनांवर काम सुरू झाले. शर्मा यांनी इटली व सौदी अरेबिया या देशांच्या धर्तीवर भारतात धार्मिक पर्यटनावर लक्ष केंद्रित करण्याचे ध्येय निश्चित केले आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)४पर्यटन मंत्रालयाने ‘स्वच्छ भारत, स्वच्छ खाद्यपदार्थ’ योजनाही सुरू केली आहे. त्यामुळे परदेशी पर्यटक आकर्षित होऊ शकतील. रस्त्यावरच्या खाद्यपदार्थांच्या स्टॉलवरही दर्जेदार खाद्यपदार्थ उपलब्ध करून देणे, हे या योजनेचे उद्दिष्ट आहे. ४मंत्रालयाने त्यासाठी ‘नॅशनल असोसिएशन आॅफ स्ट्रीट वेंडर्स आॅफ इंडिया’ (एनएएसव्हीआय) संघटनेशी करार केला आहे. संघटनेच्या सभासदांना स्वच्छ, दर्जेदार खाद्यपदार्थ तयार करण्यासाठी प्रशिक्षण देण्यात येणार आहे.४पर्यटनवाढीसाठी गंगा, बौद्ध, कृष्णा पट्ट्याबरोबरच पूर्वोत्तर राज्ये व केरळ अशी पाच मंडळे तयार करण्यात येणार आहेत. या पर्यटन स्थळांवर आधुनिक सुविधा पुरविण्यासाठी अर्थसंकल्पात ५०० कोटींची तरतूद करण्यात येणार आहे.