शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
3
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
4
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
5
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
6
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
7
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
8
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
9
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
10
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
11
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
12
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
13
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
14
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
15
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
16
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
17
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
18
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
19
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
20
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
Daily Top 2Weekly Top 5

पर्यटनाद्वारे एक लाख कोटींचे परकीय चलन!

By admin | Updated: December 30, 2014 23:31 IST

पर्यटन क्षेत्राच्या वाढीसाठी २०१४ वर्ष खूप महत्त्वाचे ठरले. जानेवारी ते नोव्हेंबरदरम्यान ६५. ८ लाख परदेशी पर्यटकांनी भारताला भेट दिली

नवी दिल्ली : पर्यटन क्षेत्राच्या वाढीसाठी २०१४ वर्ष खूप महत्त्वाचे ठरले. जानेवारी ते नोव्हेंबरदरम्यान ६५. ८ लाख परदेशी पर्यटकांनी भारताला भेट दिली व त्यातून थोडेथोडके नव्हे, तर तब्बल एक लाख कोटींचे बहुमोल परकीय चलन देशाला मिळाले. व्हिसा प्रणालीत आणखी सुटसुटीतपणा आणत केंद्राने ‘इलेक्ट्रॉनिक ट्रॅव्हल आॅथोरायझेशन’ (ईटीए) प्रणाली सुरू करून महत्त्वाचे पाऊल टाकले. पर्यटन मंत्रालयाने नोव्हेंबर २०१४ मध्ये ईटीएद्वारे ४३ देशांतील नागरिकांना व्हिसा सुविधा सुरू केली. त्यामुळे अनेक किचकट प्रक्रियांतून पर्यटकांची मुक्तता होऊन तब्बल १६ हजार व्हिजांची प्रोसेसिंग झाली. परदेशी पर्यटकांसाठी ‘स्वागत कार्ड’ योजना सुरू करण्यात आली. त्याबरोबर बहुप्रतीक्षित ‘टुरिस्ट हेल्पलाईन’ सुरू केली. ही हेल्पलाईन २४ तास सुरू राहणार आहे. सध्या दोन भाषांमध्ये असलेली ही सुविधा लवकरच १० परदेशी भाषांमध्ये सुरू होणार आहे. परदेशी पर्यटकांना विमानतळावरच ‘स्वागत कार्ड’ देण्यात येईल, त्यावर सर्व महत्त्वाचे क्रमांक देण्यात येतील. श्रीपाद नाईक यांच्याकडून महेश शर्मा यांच्याकडे पर्यटन मंत्रालयाची सूत्रे देण्यात आल्यानंतर काही महत्त्वाच्या योजनांवर काम सुरू झाले. शर्मा यांनी इटली व सौदी अरेबिया या देशांच्या धर्तीवर भारतात धार्मिक पर्यटनावर लक्ष केंद्रित करण्याचे ध्येय निश्चित केले आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)४पर्यटन मंत्रालयाने ‘स्वच्छ भारत, स्वच्छ खाद्यपदार्थ’ योजनाही सुरू केली आहे. त्यामुळे परदेशी पर्यटक आकर्षित होऊ शकतील. रस्त्यावरच्या खाद्यपदार्थांच्या स्टॉलवरही दर्जेदार खाद्यपदार्थ उपलब्ध करून देणे, हे या योजनेचे उद्दिष्ट आहे. ४मंत्रालयाने त्यासाठी ‘नॅशनल असोसिएशन आॅफ स्ट्रीट वेंडर्स आॅफ इंडिया’ (एनएएसव्हीआय) संघटनेशी करार केला आहे. संघटनेच्या सभासदांना स्वच्छ, दर्जेदार खाद्यपदार्थ तयार करण्यासाठी प्रशिक्षण देण्यात येणार आहे.४पर्यटनवाढीसाठी गंगा, बौद्ध, कृष्णा पट्ट्याबरोबरच पूर्वोत्तर राज्ये व केरळ अशी पाच मंडळे तयार करण्यात येणार आहेत. या पर्यटन स्थळांवर आधुनिक सुविधा पुरविण्यासाठी अर्थसंकल्पात ५०० कोटींची तरतूद करण्यात येणार आहे.