शहरं
Join us  
Trending Stories
1
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
3
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
4
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
5
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
6
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
7
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
8
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
9
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
10
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
11
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
12
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
13
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
14
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
15
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
16
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
17
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
18
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
19
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात

राज्यात जात पडताळणीचे एक लाख अर्ज प्रलंबित

By admin | Updated: February 14, 2015 23:50 IST

ग्रामपंचायत निवडणुकामुळे अर्जांची संख्या वाढली

ग्रामपंचायत निवडणुकामुळे अर्जांची संख्या वाढली
पुणे: शासनाने जात पडताळणी प्रमाणपत्रासाठी प्रत्येक जिल्ह्यासाठी अतिरिक्त जिल्हाधिका-यांच्याअध्यक्षतेखाली समिती नियुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु याबाबत अद्यापही शासनाने अद्यादेश न काढल्याने आज अखेर राज्यातील विविध जात पडताळणी समित्यांकडे विद्यार्थी आणि कर्मचा-यांचे तब्बल एक लाख अर्ज प्रलंबित आहेत.
शिक्षण, शासकीय आणि निमशासकीय सेवेत आरक्षित जागांचा लाभ घेण्यासाठी जात वैधता प्रमाणपत्र आवश्यक असते. या शिवाया आरक्षित जागेवर निवडणूक लढविण्यासाठी देखील जात वैधता प्रमाणपत्र बंधनकारक केले आहे. यामुळे जात पडताळणी कार्यालयाकडे विद्यार्थी, नोकरदार, राजकीय व्यक्तीचे दररोज हजारो अर्ज येतात.याप्रमाणेच शासनाने कार्यरत असलेल्या अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त भटक्या जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्गातील कमर्चा-यांनी ३१ जुलै २०१३ पर्यंत जात वैधता प्रमाणपत्र सादर न केल्यास नोकरीतून काढून टाकण्याबाबत शासनाने आदेश काढले होते. यामुळे जात पडताळणी विभागाकडे मोठ्या प्रमाणात अर्ज आले आहेत. राज्यातील १५ जात पडताळणी समितीपैकी सहा समितीवर अध्यक्ष नाही.तरी गेल्या वर्ष भरात जवळपास दोन लाख अर्ज निकाली काढले.आता फक्त शैक्षणिक ४९ हजार १३५ आणि शासकीय नोकरदारांचे ४३ हजार ६०३ आणी इतर ६ हजार असे जवळपास एक लाख अर्ज प्रलंबित आहेत. मात्र शासनाने जात पडताळणी समितीच्या बळकटीकरणाऐवजी समिती रद्द केली आहे. यापुढे जिल्हास्तरावर अतिरिक्त जिल्हाधिका-यांच्या अध्यक्षतेखाली जात पडताळणीचे काम केले जाणार आहे.पण अद्याप अध्यादेश निघाला नसल्याने जात वैधता प्रमाणपत्रांचे प्रलंबित अर्ज वाढतच आहे.
याबाबत बार्टीचे महासंचालक डॉ डी.आर.परिहार यांनी सांगितले की जिल्हास्तरावर समिती स्थापन होण्याचा निर्णय होत नाही.तोपर्यत प्रलबिंत दाखले तत्परते मार्गी काढण्याचा काम बार्टी करत आहे. गेल्या अठरा महिन्यापासून समितीचे अध्यक्ष, व सदस्याची पदे रिक्त आहेत.तरी इतर पडताळणी समितीचे अध्यक्ष व सदस्य दिवस -रात्र करून प्रलबिंत प्रकरणाचा निपटारा करत आहेत.

चौकट:-जात पडताळणी समिती निहाय प्रलबिंत अर्ज
मुंबई १२,५६०,पुणे १४,८०२,धुळे १५,२९५,अमरावती समिती-१४,०५१
औरगांबाद ७,३९५, नागपुर ६,६२०, सोलापुर ८२९२, नाशिक ६,५९८ अर्ज प्रलबिंत आहेत.